शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांची साडेसाती सुरू आहे त्यांनी 'या' चुका करून शनिपीडा ओढवून घेऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 16:29 IST

शनिदेव शिस्तप्रिय आहेत, शिस्तीने वागणाऱ्याला ते कधीच त्रास देत नाहीत. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला शिक्षेशिवाय सोडतही नाहीत!

सर्व ग्रहांमध्ये मनुष्य घाबरतो ते शनी ग्रहाला. कारण शनी महाराजांची अवकृपा झाली, तर कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याची आपल्याला भीती वाटत राहते. साडेसाती झालेल्यांना चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव येतात. या काळात कोणाचा उष्कर्ष होतो, तर कोणाला आयुष्यभराची शिकवण मिळते. साडेसाती देव दानवांनाही चुकलेली नाही, तर मानवाला तरी कशी चुकेल? या काळात आपण आपले काम प्रामाणिकपणे करणे हेच महत्त्वाचे असते. शनी महाराज आपली परीक्षा घेत असतात. त्यावेळी न डगमगता आपण तत्वाला धरून आचरण केले पाहिजे आणि या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत. 

>> शनी महाराज अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांना अभक्ष्य आणि अपेयपान करणारे लोक आवडत नाहीत. म्हणून मांसाहार आणि मदिरापान करू नये. तसेच कोणाला दुखावणे, वाईट बोलणे, दुष्कृत्य करणे टाळले पाहिजे. त्याची भयंकर शिक्षा आपल्याला मिळू शकते. कारण शनी महाराज आपल्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. 

>>  शनी महाराजांना ज्येष्ठ व्यक्ती आणि गरीब लोकांप्रती जास्त कणव असते. अशा लोकांना दुखावलेले, फसवलेले त्यांना अजिबात चालत नाही. एखाद्याची फसवणूक केली पण त्याला ती कळली नाही, तर यात आनंद मानू नका. कारण दुसऱ्याची फसवणूक केल्याची शिक्षा शनी महाराज नक्कीच देतात आणि ती शिक्षा भोगताना मात्र मनुष्य रडकुंडीला येतो. 

>> साडेसातीच्या काळात लोखंड, तेल आणि केरसुणीची खरेदी करू नये. या वस्तूंची खरेदी शनी महाराजांना अपमानास्पद वाटू शकते. या वस्तूंची खरेदी करण्याऐवजी शनिवारी या वस्तूंचे दान केले पाहिजे. तसेच काळे तीळ आणि उडीद डाळ दान केल्यास खूप लाभ होतो. 

>> पिंपळाच्या झाडावर शनी देवांचा वास असतो असे मानतात. परंतु घराच्या भिंतीवर उगवलेले पिंपळाचे रोपटे अशुभ मानले जाते, म्हणून ते वेळीच काढून टाकले जाते. परंतु साडेसातीच्या काळात पिंपळाचे मूळ उपटून शनी महाराजांचा रोष ओढवून घेऊ नये. उलट दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून यावे. 

>> ज्येष्ठ आणि गरीब व्यक्तींची सेवा सुश्रुषा केली असता शनी महाराज प्रसन्न होतात. म्हणून केवळ साडे सातीच्या काळातच नाही, तर अन्य वेळीसुद्धा ज्येष्ठांचा आदर करावा आणि गरीब, गरजू लोकांना यथाशक्ती दान करावे. त्यामुळे शनी महाराज प्रसन्न राहतात.