शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरीण आणि उंटाची 'ही' बोधकथा शिकवते सुखापेक्षा समाधान मिळवण्याचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:00 IST

सद्यस्थितीत आपण सगळेच मृगजळामागे धावत आहोत, पण ते कधी हाती लागणार नाही; सुख हेदेखील मृगजळच आहे!

जीवघेण्या उन्हाने तो वाळवंटी परिसर अतिशय उजाड, रखरखीत, दयामाया नसलेल्या निष्ठुर काळासारखा वाटत होता. त्या गरीब बिचाऱ्या  हरणाची अवस्था अत्यंत शोकाकुल होती. तृष्णेमुळे विचारबुद्धी जणू नष्टच झाली होती. 

पाण्याच्या शोधार्थ भटकत असताना, त्याला एके ठिकाणी पाण्याचा साठा दिसला. ते आनंदातिशयाने त्याच्या रोखाने धावू लागले आणि आता ते पाणी आपणास प्राप्त होणार असे त्याला वाटले, पण तिथे होता केवळ भास! 

कधीही तहान न भागवणाऱ्या मृगजळामागे ते धावले होते. इतक्यात त्या हरणाला वाटले की त्या वृक्षाजवळ पाणी आहे. बिचारे, त्या विचाराने पुलकीत होऊन त्या जवळ गेले. परंतु पदरी पुन्हा निराशाच आली. मुळात तो वृक्ष नव्हताच. तर कोणीतरी टाकलेल्या फांद्या असलेला लाकडी ओंडका होता. जलाचे भास त्या अज्ञानी मृगाला होत राहिले आणि त्यांना बळी पडून तो वेडापिसा धावत राहिला. पाण्यासाठी व्याकुळ झालेले त्याचे शरीर जणू मृत्यूपंथाला लागले.

एवढ्यात एक उंट त्याच्याजवळ आला व त्याला म्हणाला, 

'रे मृगा, मगापासून मी पाहतो आहे, किती मैल तू या परिसरात धावत आहेस. त्याऐवजी योग्य विचाराने, रस्त्याने तू जर या वाळवंटी परिसरातून बाहेर पडला असतास तर एवढ्याच धावपळीत पलीकडेच एक कधीही न आटणारा लहानसा झरा आहे तो तुला नक्की दिसला असता. अरे केवळ आभासामुळे तुझी भयंकर दिशाभूल झाली. 

या हरणाप्रमाणे आपणही आयुष्यभर मृगजळाप्रमाणे धावत राहतो आणि हाती काहीच लागले नाही म्हणून उद्विग्न होतो. मृगजळ आभासी असते. हे माहीत असतानाही त्यामागे धावणे, हे स्वत:चीच फसवणूक करण्यासारखे आहे. अशी दिशाभूल होऊ नये, म्हणून वेळोवेळी त्या त्या क्षेत्रातील उंटासारख्या अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यायला हवे, म्हणजे पश्चात्तापाची वेळ येत नाही. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन करतात-

असे सार साचार ते चारिलेसे,इही लोचनी पाहता दृश्य भासे,निराभास निर्गुण ते आकळेना,अहंतागुणे कल्पिताही कळेना।

चित्त, मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिय हे भ्रामक जग मृगजळाप्रमाणे आहे. त्या वर्तुळात आपण फिरत राहतो आणि निराश होतो. परंतु खरे सुख, आनंद, समाधान ज्या परमतत्त्वात आहे, त्याला आपण ओळखत नाही. कारण त्याच्याकडे या चर्मचक्षूंनी नाही, तर ज्ञानचक्षूंनी पाहता येते.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी