शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही; वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 20, 2021 15:54 IST

सुरीने केलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतु जिभेने अर्थात धारदार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाहीत. त्याचे व्रण कायमस्वरूपी मनावर राहतात. म्हणून बोलताना शेकडो वेळा विचार करून बोलले पाहिजे. 

आपल्यापैकी अनेकांना पटकन व्यक्त होण्याची खोड असते. परंतु समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय बोलू नये, हा नियम आहे. मात्र आपल्या एका वाईट सवयीमुळे अनेक गैरसमज, वाद, अपमान होतात. परिस्थिती वेगळीच असते आणि आपण चुकीचे व्यक्त होतो. नंतर मागितलेल्या माफीला किंमत उरत नाही. कारण शब्दांमुळे झालेले घाव सहसा भरून निघत नाहीत. यासाठीच शब्द जपून वापरा आणि वापरण्याआधी विचार करा, वापरून झाल्यावर नाही. 

एका आश्रमात काही शिष्य अध्ययनन करत होते. गुरुदेव त्यांना विविध विषय शिकवत असत. शिष्यांना सर्व विद्या व कला अवगत व्हाव्यात यादृष्टीने ते सतत प्रयत्नशील असत. त्या शिष्यांमध्ये शामल नावाचा एक शिष्य होता. तो कोणालाही उद्धटपणे बोलून जात असे. दुसऱ्याला काय वाटेल, कुणाचे अंत:करण दुखावले जाणार नाही ना, याची त्याला पर्वा नसे. गुरुदेवांनाही त्याची काळजी वाटू लागली. परंतु ते त्याच्यावर कधी रागावले नाहीत.

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

गुरुदेवांनी एकदा त्याला आपल्या जवळ बोलावून सांगितले, 'शामल, बेटा एक काम करशील का?'तो हो म्हणाला.

मऊमऊ पिसांची गच्च भरलेली एक पिशवी त्याच्या हाती देत गुरुदेव म्हणाले, 'बाळ ही पिशवी मोकळ्या मैदानात जाऊन रिकामी करून ये.'गुरुदेवांच्या आज्ञेनुसार शामलने मैदानात जाऊन पिसांची पिशवी रिकामी केली नि तो परत गुरुदेवांकडे आला. दुसऱ्या दिवशी गुरुदेवांनी त्याला सांगितले, 'शामल, ही पिशवी घे आणि सगळी पिसं पुन्हा यात भरून आण.' 

शामल मैदानात गेला. तिथे ढिगारा नव्हता. सगळी पिसं वाऱ्याने दूरवर इतरत्र उडून गेलेली आढळली. रिकामी पिशवी घेऊन तो परत आला. म्हणाला,` गुरुदेव, क्षमा करा. एकही पिस मैदानात नाही. सगळी पिसं वाऱ्याने विखुरली गेली.'

गुरुदेव त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, `बाळा, एकदा उडून गेलेली पिसं जशी पुन्हा आणणे कठीण आहे, तसे बोलून गेलेले शब्द परत येत नाहीत. आपण उच्चारलेला शब्द कोणाच्या जिव्हारी लागू नये यासाठी आपण नेहमी विचार करूनच बोलावे. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणे चांगले. शामलला आपली चूक समजली. पुढे तो नम्र शिष्य म्हणून गणला जाऊ लागला.

म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर लिहितात, 'शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी..!'

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.