शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

बोलण्याआधी विचार करा, बोलून झाल्यावर नाही; वाचा ही गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 20, 2021 15:54 IST

सुरीने केलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतु जिभेने अर्थात धारदार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाहीत. त्याचे व्रण कायमस्वरूपी मनावर राहतात. म्हणून बोलताना शेकडो वेळा विचार करून बोलले पाहिजे. 

आपल्यापैकी अनेकांना पटकन व्यक्त होण्याची खोड असते. परंतु समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय बोलू नये, हा नियम आहे. मात्र आपल्या एका वाईट सवयीमुळे अनेक गैरसमज, वाद, अपमान होतात. परिस्थिती वेगळीच असते आणि आपण चुकीचे व्यक्त होतो. नंतर मागितलेल्या माफीला किंमत उरत नाही. कारण शब्दांमुळे झालेले घाव सहसा भरून निघत नाहीत. यासाठीच शब्द जपून वापरा आणि वापरण्याआधी विचार करा, वापरून झाल्यावर नाही. 

एका आश्रमात काही शिष्य अध्ययनन करत होते. गुरुदेव त्यांना विविध विषय शिकवत असत. शिष्यांना सर्व विद्या व कला अवगत व्हाव्यात यादृष्टीने ते सतत प्रयत्नशील असत. त्या शिष्यांमध्ये शामल नावाचा एक शिष्य होता. तो कोणालाही उद्धटपणे बोलून जात असे. दुसऱ्याला काय वाटेल, कुणाचे अंत:करण दुखावले जाणार नाही ना, याची त्याला पर्वा नसे. गुरुदेवांनाही त्याची काळजी वाटू लागली. परंतु ते त्याच्यावर कधी रागावले नाहीत.

हेही वाचा : संन्याशाच्या झोळीत हात घाला, श्रीमंत व्हाल!

गुरुदेवांनी एकदा त्याला आपल्या जवळ बोलावून सांगितले, 'शामल, बेटा एक काम करशील का?'तो हो म्हणाला.

मऊमऊ पिसांची गच्च भरलेली एक पिशवी त्याच्या हाती देत गुरुदेव म्हणाले, 'बाळ ही पिशवी मोकळ्या मैदानात जाऊन रिकामी करून ये.'गुरुदेवांच्या आज्ञेनुसार शामलने मैदानात जाऊन पिसांची पिशवी रिकामी केली नि तो परत गुरुदेवांकडे आला. दुसऱ्या दिवशी गुरुदेवांनी त्याला सांगितले, 'शामल, ही पिशवी घे आणि सगळी पिसं पुन्हा यात भरून आण.' 

शामल मैदानात गेला. तिथे ढिगारा नव्हता. सगळी पिसं वाऱ्याने दूरवर इतरत्र उडून गेलेली आढळली. रिकामी पिशवी घेऊन तो परत आला. म्हणाला,` गुरुदेव, क्षमा करा. एकही पिस मैदानात नाही. सगळी पिसं वाऱ्याने विखुरली गेली.'

गुरुदेव त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, `बाळा, एकदा उडून गेलेली पिसं जशी पुन्हा आणणे कठीण आहे, तसे बोलून गेलेले शब्द परत येत नाहीत. आपण उच्चारलेला शब्द कोणाच्या जिव्हारी लागू नये यासाठी आपण नेहमी विचार करूनच बोलावे. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलणे चांगले. शामलला आपली चूक समजली. पुढे तो नम्र शिष्य म्हणून गणला जाऊ लागला.

म्हणूनच कविवर्य मंगेश पाडगावकर लिहितात, 'शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी..!'

हेही वाचा : मनाचा कोपरा दररोज आवरा.