शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Think Positive: आयुष्य भरभरून जगायचे म्हणजे नेमके काय करायचे? वाचा आणि स्वत:मध्ये बदल करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 07:05 IST

आयुष्य आनंदाने जगायची इच्छा असते, पण आनंद नेमका कोणत्या गोष्टीत शोधावा हा संभ्रम निर्माण झाला असेल तर हा लेख नक्की वाचा.

>> सौ. अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक

संदीप खरे ह्यांचे सुंदर काव्य “ मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यांत...” कानावर पडले. इतके सुंदर काव्य रचणाऱ्या कवीचे मन किती कोमल मृदू असेल नाही. मग मी माझ्याच मनाचा शोध घेवू लागले ..माझे मन कश्यात असते किंवा कश्यात रमते ? गाणी ऐकण्यात ? प्रवास करण्यात ? स्वतःचे छंद जोपासण्यात कि आवडत्या पदार्थांवर तावमारण्यात ? माझे मलाच हसू आले. मन कश्यात रमते त्याहीपेक्षा ते वास्तव जगतात नक्की कुठे असते ? हा प्रश्न योग्य वाटला. ज्योतिष समुपदेशन करताना प्रत्येक वेळी आपण पत्रिकेतील चंद्राची स्थिती पाहतो कारण चंद्र हाच आपल्या पत्रिकेचा “ करता करविता “ . मनाने हिरवा सिग्नल दिला कि आपण करत असलेल्या कामात जीव ओततो , समरसून जातो . मनाचा कौल मिळाला कि जग सुंदर वाटू लागते आणि मन प्रफुल्लीत होते पण हेच मन उदास झाले तर नाही नाही त्या व्याधी शरीर पोखरू लागतात आणि हेच जग निरस वाटू लागते अगदी जीवनाचा प्रवास संपवून टाकण्यापर्यंत विचारांची मजल जाते . अनेकदा मनावरील दडपण so called guilt सुद्धा त्याला कारणीभूत असते.

आज ह्या मनाबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून जाणून घेण्याचा लहानसा प्रयत्न करुया . आजच्या जीवन शैलीचा विचार करता घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे आपण सर्व कमी जास्त मानसिक तणाव घेत असतो किबहुना तो अपोआप येतच असतो . कार्यालय , घर , प्रपंच , आर्थिक घडी , मुलांची शिक्षणे त्यांचे विवाह ह्या सर्वातून प्रवास करताना आपल्या आयुष्याची संध्याकाळ कधी होते समजत नाही आणि ह्या सर्वच अगदी वयाच्या तरुण अवस्थेपासून आपल्यासोबत कित्येक वर्षाचा सहप्रवासी “ तणाव “ हा एक दिवस हळूहळू डोके वर काढू लागतो . मानसिक ताणताणाव शरीरावर एका रात्रीत प्रभाव टाकत नाही तर कित्येक वर्ष मनाच्या कोपर्यात दडलेला हा तणाव शरीराला आणि मनालाही असह्य झाला कि मगच त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात 

आज मनाच्या विविध अवस्थांचे कंगोरे बघुया. आजचा प्रगत सोशल मिडीया आपल्या आयुष्यावर अधिराज्य गाजवत आहे. दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सोशल मिडीया मुळे सहजप्राय झाल्या आहेत . आपली एखादी कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्माण झालेले उत्कृष्ट मध्यम आहे. मग ती एखादी रचलेली चारोळी असो , लेखन असो , सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा असो किंवा सहलीची जाहिरात असो. अनेकांपर्यंत क्षणात पोहोचते . आपल्या अंगातील सुप्तगुणांना अनेकां कडून मिळालेली शाबासकीची थाप मनाला आनंद देते आणि कदाचित त्याचमुळे आता शेअरिंग वाढत आहे. कुठलीही गोष्ट मनात साचवून ठेवले कि आजार आलेच म्हणून समजा , पण त्या मनातील विचारांचा निचरा केला तर मन धबधब्यासारखे प्रवाहित होईल आणि आजारपणाचा लवलेश सुद्धा आपल्याला शिवणार नाही . पण आजकाल कुणाशी बोलायचे ते समजत नाही कारण नात्यातील विश्वास कमी होत आहे. 

आज दुःख , मनातील सल लपवून मी किती आनंदी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास सुरु आहे हेही प्रकर्षाने जाणवते . मनातील सल , एकटेपणा शेअर करायलाच पाहिजे . तो प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात असतो. मनमोकळे बोलणे , हसणे आपण विसरून गेलो आहोत .आपण जे काही आहोत जसे आहोत ते सर्वप्रथम आपण स्वतः स्वीकारले पाहिजे , ते लपवून ठेवले तर त्याचा त्रास आपल्यालाच कालानुरूप होणार आहे. जग पुढे जातंय , नवनवीन शोध लागत आहेत , वयोमर्यादा वाढत आहे पण माणसाच्या आयुष्यातील स्ट्रेस कमी न होता वाढत चाललेला आहे आणि त्यातून अनेक मानसिक आजार जन्म घेत आहेत . कुणाशीही मोकळेपणाने न बोलणे, घुसमटत राहणे , नात्यातील संपणारा विश्वास त्यामुळे पोटातील शब्द ओठापर्यंत येत येत राहतात अशी काहीशी स्थिती निर्माण झालेली दिसते . पूर्वीच्या लोकांकडे भौतिक सुखाची रेलचेल नव्हती पण समाधान होते . आज सर्व सुखे पायाशी असूनही डीमेंशिया , अल्झायमर, मधुमेह , हृदयरोग ह्यांचे प्रमाण अगदी लहान वयातील लोकांमध्ये सुद्धा वाढताना दिसतंय .आपले शरीर कमकुवत करणारा आणि झोप उडवणारी सुखे शेवटी काय कामाची नाही का? 

मानवी शरीरातील प्रगल्भ अवयव म्हणजे मेंदू . मेंदूवर संपूर्ण ताबा हा मनाचा असतो म्हणूनच मन शुद्ध सात्विक आणि सशक्त असेल तर मेंदू हा व्यवस्थित कार्यरत असणारच . अनेक आजारांचा उगम हा मनातूनच होत असल्यामुळे थोडक्यात आजारांचे मूळ मनातच आहे त्यामुळे मनाचे आरोग्य उत्तम असणे आपल्यासाठी अति अति महत्वाचे आहे. मन निरोगी नसेल स्वछ्य नसेल तर ते आजारपणाने घेरले जाते . आपला मेंदू हा अनेक केमिकल्स चे मिश्रण आहे आणि त्यांचा योग्य समतोल राखला गेला तर मेंदू सतेज असतो योग्यपणे कार्यरत होतो . एखाद्याशी भांडणे , प्रेमाची प्रीतीची भावना प्रगट करणे , काळजी करणे, एकमेकातील स्नेह वृद्धिंगत करणे ह्या अश्या विविध भावना जेव्हा प्रगट होतात तेव्हा त्याच्या मागे मेंदूतील विशिष्ठ रसायन काम करत असते . ह्या भावभावना जश्या कमी अधिक होतील तसे ह्या रसायनाची निर्मिती सुद्धा होत असते. आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे ह्या रसायनाच्या निर्मितीची प्रक्रिया कमी होते आणि म्हणूनच आपला स्ट्रेस वाढतो आणि त्याचे अगणित परिणाम मनावर आणि पर्यायाने शरीरावर होताना दिसतात . 

मेंदूतून स्त्रवणार्या ह्या रसांचा समतोल राखायचा असेल तर आनंदी जीवन शैली असणे गरजेचे आहे . घरातील नात्यातील मोकळेपणा , नात्यातील ओढ , एकमेकांसाठी जगणे आणि आणि नात्यातील विश्वास असेल तर जगण्याची मजा और असते आणि हेच सर्व आजकाल संपुष्टात आले आहे. एकमेकांकडे जावेसे न वाटणे , लहान सहन गोष्टीत अगदी घरातल्या घरात सुद्धा लपवाछपवी ह्यात नाती आणि माणसे हरवून गेली आहेत . पूर्वीचा काळ आणि माणसे सुद्धा साधी सरळ भोळी होती , पैशाने फार साधन नव्हती पण मनाची श्रीमंती खूप होती , कुटुंबात एकोपा होता , मोठ्यांना मान देणे , कुटुंबप्रमुखाचे निर्णय एकमताने मान्य होत असत. अलीकडच्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबात अनेक कुटुंब प्रमुख निर्माण झाले. प्रत्येक जण आपापल्या पुरतेच जगतोता दिसतो आता . माझे मी बघीन त्याचे तो बघेल हीच भावना मनात खतपाणी घालायला लागली आहे. 

मन आनंदी ठेवण्यासाठी खूप मोठ्या खर्चाची गरज नसते लहान सहान घटना सुद्धा पर्वता इतकं आनंद देतात . जीवनाकडे बघण्याच्या संकल्पना आणि दृष्टीकोण आजकाल फार संकुचित झालाय आणि काहीतरी मिळवण्याचा सततचा ध्यास त्यासाठी जीवाची चाललेली सततची धडपड तसेच ह्या सर्वातून निर्माण होणारी असुरक्षित पणाची भावना ह्यामुळे मनाचा एकंदरीत समतोल नाही गेला तरच नवल.

पूर्वीचा काळ परत येणार नाही कदाचित नव तेच स्वीकारून पुढे जाणे सर्वार्थाने इष्ट ठरेल पण त्यातही पूर्वीचा एकोपा गोडवा निदान सणासुदीला किंवा समारंभातून जपला गेला पाहिजे. आजच्या पिढीतील मुलांना घरात चार पाहुणे यायची सवयच राहिलेली नाही. मग एकमेकांकडे राहायला जाणे तर फार दूर . अपवाद म्हणून आजही अनेक कुटुंब एकोप्याने नांदत आहेत नाही असे नाही पण हे उदा फार विरळ आहेत . आज सगळीकडे काहीतरी लपवण्याकडे कल असतो . घर घेतले गाडी घेतली कुणालाही सांगायचे नाही समजेल तेव्हा समजेल. पूर्वी असे नव्हते . आवर्जून सर्वांचे आशीर्वाद घेतले जात असत. सगळ्यांना मान देवून एखाद्या गोष्टीत सल्ला त्यांचे मत विचारले जात असे. कुणाची दृष्ट लागण्यासारखे कुणीही इथे मोठे नाही सगळे आपलेच असतात आणि राहतात . पण आजकाल मत्सर , विघ्नसंतोषी वृत्ती ,दुसर्याचे चांगले न पहावाने हे गुण वाढीस लागले आहेत ते निव्वळ हव्यासापोटी , सतत काहीतरी मिळवणे जे कधीच पुरे न पडणारे आहे. आणि मग त्यातूनच हि तुलना निर्माण होते . 

लहानपणी आपण खूप खेळायचो पण आता तेही विसरून गेलो आहोत त्यामुळे आता ट्रेन बस पकडायला सुद्धा दमछाक होते. गाणी ऐकणे , आपले छंद जोपासणे , पुस्तके वाचणे ,चित्रकला किंवा इतर गोष्टीत आपण दिवसातला काही वेळ तर नक्कीच देऊ शकतो त्यामुळे आपले मन आणि मेंदू सुद्धृढ राहील पण आपल्याला फक्त काम काम आणि काम ह्यातच मोठेपणा वाटतो. जीवनातील हे हलके फुलके आंनद जे तुमचे शारीरिक आणि मानसिक आजार दूर ठेवू शकतात पण दुर्दैवाने त्यालाच आपण मुकलेले आहोत .

आपले मन कश्यात आहे ते ओळखता आले पाहिजे. आपल्याला देवाने भरपूर वेळ दिलाय . रोजच्या जीवनशैलीतील जरासा वेळ आणि केलेला बदल सुद्धा आपल्याला आनंदाची कवाडे उघडून देयील. “ मी आनंदी आहे “ हे दाखवणे आणि “ मी खरच आनंदी आहे ”  ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . दाखवण्यापेक्षा खरच असणे निरोगी मनाचे लक्षण आहे. मी आनंदी नाही आहे , तरीपण ते दाखवत राहायचे कुणाला ? आणि कश्यासाठी ? त्यापेक्षा आपण आपल्याशी प्रतारणा न करता ते सत्य स्वीकारले तर आपण निश्चित आनंदी होऊ ह्यात दुमत नाही. प्रेमाचा दिखावा नको तर खरच ओलावा हवा .

आपल्या जीवनाचा लगाम आपल्या हातात असेल तेव्हाच खर्या अर्थाने आपण आनंदी होऊ , स्वछंदी पाखराप्रमाणे आकाशात इथून तिथे तिथून इथे मस्त भटकंती करू आणि जीवनाचा खरा आस्वाद घेवू . ह्याला काय वाटत आणि त्याला काय वाटत हे विचार खूप झाले आता मला स्वतःला काय वाटत हे महत्वाचे आहे . नकारात्मक लहरी आपल्याला त्रास देतात म्हणून नकारात्मक लोकांना दूर ठेवा , नकारात्मक मेसेज , घटना आणि अश्या प्रकारे बोलणारी लोक सुद्धा दूर असलेलीच बरी .जगातील सगळ्या घटना आपल्याला समजल्याच पाहिजेत हा नियम नाही. आपल्याला जे समजायला पाहिजे ते कळले कि पुरे , जराजाराश्या गोष्टीनी आपल्या इगो दुखावतो . सगळ्यांनी आपल्यालाच महत्व दिले पाहिजे आणि मी नसेन तर हे जग सुद्धा चालणार नाही माझ्याशिवाय सगळ्यांचे अडते  ह्या भ्रामक कल्पना विश्वातून बाहेर या. आपण जन्माला आलो त्याच्या आधीही हे विश्व होते आणि आपल्या नन्तर पण असणार आहे तेव्हा स्वतःला महत्व देवून “ मी “ पणा जोपासणे पुरे . जितके वास्तव लवकर स्वीकारू तितके अधिक आनंदी होऊ . 

आज हसणे विसरलो आहोत आपण . म्हणून तर हास्य क्लब ची निर्मिती झाली . पूर्वी कुठे होते असे. लोक मोकळ्या आकाशासारखी मोकळ्या मानाने जगत. विज्ञानाने प्रगती केली आपण चंद्रावर गेलो पण आपले मन कश्यात आहे ते अजूनही आपल्याला ओळखता येत  हे दारूण सत्य आहे.  मन मारून जगू नका . माझ्या एका मैत्रिणीला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात पण घालत नाही लोक काय म्हणतील ? मला कसे दिसेल ? आमच्या घरात सगळे ड्रेस साडी नेसतात . मी तिला म्हंटले लोक ? कुठली लोक? आणि तू घालायला सुरवात केलीस कि तुझ्या घरातील सुद्धा सर्व स्त्री वर्ग तुझी कॉपी करतील आणि घालतील. तू तुझे मन मारून अजिबात जगू नकोस.

लहानपणी आपण किती कला शिकलो मग मोठे झाल्यावर प्रपंचात अडकलो आणि विसरलो. शाळेत सुद्धा 8 तास सतत अभ्यास करून मेंदूवर ताण येऊ नये म्हणून चित्रकला , संगीत हे आपले सर्व शिकवले जात असे. आता नव्याने सुरवात करुया .

चला तर मग शोध घेवूया आपले मन नक्की कश्यात आहे ? जीवनातील अगदी जवळच असलेले अनेक आनंदाचे स्त्रोत नव्याने उमगतील.