शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

आठवड्याभरात घडलेल्या या दोन ताज्या घटनांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलून टाकली!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 28, 2021 12:16 IST

आजचा काळ सर्वांची परीक्षा पाहणारा आहे. माणूस तर आपण आहोतच, थोडी माणुसकीही दाखवूया. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

पहिली घटना : मध्य रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके मुबंई पुणे मार्गावरील वागंणी स्टेशनवर कर्तव्य बजावत होता. १७ एप्रिलला वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह प्लॅटफॉर्मवर चालत असताना तीच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रॅकवर पडला. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने एक्सप्रेस येत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या ७ सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पॉईंटमनने लहान मुलाचा जीव वाचवला. ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्हीवर कैद झाली. पुढे काही तासातच मयुर शेळके यांनी त्या मुलाला वाचवलेल्या थराराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.आणि काही तासातच मयुर शेळके च्या पराक्रमाची चर्चा पूर्ण देशभरात सुरु झाली. कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव झाला. त्यानतंर मयुर शेळकेचा रेल्वेतर्फे सत्कार करण्यात आला. 

दुसरी घटना : ८५ वर्षांचे नारायण दाभाडकर. नागपूरचे रहिवासी. त्यांच्यासकट सगळं कुटुंब कोरोनाग्रस्त असताना महत्प्रयासाने त्यांना बेड उपलब्ध होतो. ऑक्सिजन पातळी ५५ पर्यंत गेलेली असते. तेव्हाच त्यांना एका बाईची तिच्या नवऱ्याला ऑक्सिजन मिळवण्याची धडपड दिसते. ते जावयांना बोलावून घेतात. आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या असे सांगतात. आपला बेड रिकामा करून त्या बाईच्या नवऱ्याला तो बेड उपलब्ध करून द्यावा अशी तजवीज करायला सांगतात. त्यांचे कुटुंबीय आणि उपचार करणारे डॉक्टर त्यांना तसे करण्यास नकार देतात. पण स्वतःच्या जीवाची जोखीम पत्करून ते दुसऱ्या जीवाला जीवदान देऊ पाहतात. तशी लेखी विनंती करतात. पुढच्या दोन तासात नारायणराव स्वगृही परत जातात आणि दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतात.

या दोन्ही घटना जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकतात. त्यांच्या जागी आपण असतो, तर आपल्याला तसे करणे जमले असते का? हा साधा विचार केला तरी मनाचा थरकाप होतो. त्यांनी तर प्रत्यक्ष कृती करून समाजाला आदर्श घालून दिला. यातून आणखी एक बोध मिळाला, की दान करण्यासाठी प्रत्येकाला रतन टाटा होणे शक्य नाही, परंतु दानत अंगात असेल तर कुठल्याही पद्धतीने दान किंवा मदत करता येते. या दोहोंनी त्यांच्या परीने मदत केली. आपल्याला कदाचित मयूरसारखे शौर्य दाखवता येणार नाही, किंवा नारायण रावांसारखे उदार होता येणार नाही, पण अडल्या नडलेल्याला जमेल तसा मदतीचा हात नक्कीच पुढे करता येईल. आजचा काळ सर्वांची परीक्षा पाहणारा आहे. माणूस तर आपण आहोतच, थोडी माणुसकीही दाखवूया. 

एका दोह्यात वर्णन केले आहे, पशूंच्या शरीराचा मृत्युपश्चातही उपयोग होतो, तर मानव देहाचा जिवंतपणी आणि मरणोत्तर सदुपयोग झाला, तर नर देखील नारायण होईल. निरपेक्ष बुद्धीने तोच प्रयत्न आपल्याला करायचा आहे. 

पशु कि पनिया बने नर का कछु नहीं होएजो नर करनी करे तो नर से नारायण होए।