शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

'या' तीन राशींनी शनी देवांपासून सदैव राहावे सतर्क, कारण त्यांच्यावर असते शनिदेवाची वक्र दृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:19 IST

शनी देवाची साथ ज्यांना लाभते त्यांचे नशीब फळते आणि ज्यांच्यावर वक्र दृष्टी असते त्यांना सत्त्वपरीक्षा द्यावी लागते. 

शनि हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांमध्ये शनिला सूर्यपुत्र आणि कर्माचा दाता म्हटले गेले आहे. कलियुगात केवळ शनिच मानवाच्या कर्माचा लेखाजोखा करतो. यामुळेच लोक शनिदेवाला घाबरतात. पण असे नाही की शनिदेव नेहमीच वाईट फळ देतात. तो शिस्त लावण्यासाठी परीक्षा घेतो. मात्र काही राशींवर त्याची कायम वक्र दृष्टी असते, ती केवळ त्यांच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी. म्हणून घाबरून न जाता शनी महाराजांच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहू. विशेषतः पुढील तीन राशींनी याबाबत खबरदारी घ्या. 

मेष : शनीचे मंगळाशी वैर आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो. शनी आणि मंगळाचे परस्पर नाते चांगले नसल्यामुळे मेष राशीवर शनीचा प्रभाव पडल्यास किंवा साडे साती असतानाच्या काळात अनेक कामांत अडचणी वाढतात. कामे पूर्ण होण्यात विलंब होतो. धनहानी होते आणि प्रगतीत अडथळे येतात. म्हणून मेष राशीने गणेश उपासने बरोबर हनुमंताची किंवा शनीची उपासना करावी. शनिवारी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, दानधर्म करावा आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवून कोणाचा अपमान आपल्याकडून होणार नाही ना, याबद्दल दक्षता घ्यावी. 

कर्क : ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना शनि त्यांच्या विशिष्ट अवस्थेत त्रास देतो. चंद्राला या राशीचा स्वामी म्हटले जाते. शनिदेवाचे चंद्राशी वैर आहे. यामुळेच जेव्हा कुंडलीत शनि आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा विष योग तयार होतो. ज्या कुंडलीमध्ये हा योग तयार होतो, त्या राशीमध्ये मानसिक त्रास आणि अज्ञात भीतीची समस्या कायम राहते. यामुळे व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याचे नुकसान होते. अशा वेळी कर्क राशीने सतर्क राहून शनी उपासनेला प्राधान्य द्यावे. आपल्या उपास्य देवतेच्या जपाबरोबर शनी महाराजांचा जप करावा. अडचणीच्या काळात कोणाशी वाईट बोलून वैर घेऊ नये. 

सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे असे म्हणतात. शनी हा सूर्यपुत्र असूनही या पिता पुत्रांमध्ये जन्मतः वैर भाव आहे. दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. या कारणांमुळे शनिदेव सिंह राशीच्या लोकांना साडेसती आणि राशी स्थलांतराच्या वेळी विशेष त्रास देतात. अशा वेळी घाबरून न जाता सिंह राशीच्या लोकांनी आपल्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून व्यवहार करावा, म्हणजे संकट काळात कोणाचा अपमान होणार नाही, वाद होणार नाही, कोणाला दुखावले जाणार नाही आणि परीक्षेचा काळ सुखासुखी पार पडेल. याचबरोबर दर शनिवारी शनी देवाचे दर्शन आणि यथाशक्ती दानधर्म करणे हितावह ठरेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष