शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

'या' तीन राशींनी शनी देवांपासून सदैव राहावे सतर्क, कारण त्यांच्यावर असते शनिदेवाची वक्र दृष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 14:19 IST

शनी देवाची साथ ज्यांना लाभते त्यांचे नशीब फळते आणि ज्यांच्यावर वक्र दृष्टी असते त्यांना सत्त्वपरीक्षा द्यावी लागते. 

शनि हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांमध्ये शनिला सूर्यपुत्र आणि कर्माचा दाता म्हटले गेले आहे. कलियुगात केवळ शनिच मानवाच्या कर्माचा लेखाजोखा करतो. यामुळेच लोक शनिदेवाला घाबरतात. पण असे नाही की शनिदेव नेहमीच वाईट फळ देतात. तो शिस्त लावण्यासाठी परीक्षा घेतो. मात्र काही राशींवर त्याची कायम वक्र दृष्टी असते, ती केवळ त्यांच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी. म्हणून घाबरून न जाता शनी महाराजांच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहू. विशेषतः पुढील तीन राशींनी याबाबत खबरदारी घ्या. 

मेष : शनीचे मंगळाशी वैर आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो. शनी आणि मंगळाचे परस्पर नाते चांगले नसल्यामुळे मेष राशीवर शनीचा प्रभाव पडल्यास किंवा साडे साती असतानाच्या काळात अनेक कामांत अडचणी वाढतात. कामे पूर्ण होण्यात विलंब होतो. धनहानी होते आणि प्रगतीत अडथळे येतात. म्हणून मेष राशीने गणेश उपासने बरोबर हनुमंताची किंवा शनीची उपासना करावी. शनिवारी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, दानधर्म करावा आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवून कोणाचा अपमान आपल्याकडून होणार नाही ना, याबद्दल दक्षता घ्यावी. 

कर्क : ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना शनि त्यांच्या विशिष्ट अवस्थेत त्रास देतो. चंद्राला या राशीचा स्वामी म्हटले जाते. शनिदेवाचे चंद्राशी वैर आहे. यामुळेच जेव्हा कुंडलीत शनि आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा विष योग तयार होतो. ज्या कुंडलीमध्ये हा योग तयार होतो, त्या राशीमध्ये मानसिक त्रास आणि अज्ञात भीतीची समस्या कायम राहते. यामुळे व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याचे नुकसान होते. अशा वेळी कर्क राशीने सतर्क राहून शनी उपासनेला प्राधान्य द्यावे. आपल्या उपास्य देवतेच्या जपाबरोबर शनी महाराजांचा जप करावा. अडचणीच्या काळात कोणाशी वाईट बोलून वैर घेऊ नये. 

सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे असे म्हणतात. शनी हा सूर्यपुत्र असूनही या पिता पुत्रांमध्ये जन्मतः वैर भाव आहे. दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. या कारणांमुळे शनिदेव सिंह राशीच्या लोकांना साडेसती आणि राशी स्थलांतराच्या वेळी विशेष त्रास देतात. अशा वेळी घाबरून न जाता सिंह राशीच्या लोकांनी आपल्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून व्यवहार करावा, म्हणजे संकट काळात कोणाचा अपमान होणार नाही, वाद होणार नाही, कोणाला दुखावले जाणार नाही आणि परीक्षेचा काळ सुखासुखी पार पडेल. याचबरोबर दर शनिवारी शनी देवाचे दर्शन आणि यथाशक्ती दानधर्म करणे हितावह ठरेल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष