शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

वास्तूतील नकारात्मकता दूर करण्यासाठी 'ही' चित्रे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 08:00 IST

आपण सतत काय पाहतो, काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. यासाठी दिलेल्या चित्रांचा वापर करा!

वास्तू शास्त्रात वाईट शक्तीला नकारात्मक ऊर्जा आणि चांगल्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा म्हटले जाते. ऊर्जेचा प्रभाव घरच्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होत असतो. यात वास्तूतुन निघणाऱ्या उर्जेचाही मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा पेरायची असेल तर वास्तुदोष दूर करावे लागतात. त्यासाठी वास्तू टिप्स उपयोगी पडतात. 

>>अनेक लोकांच्या घरात भिंतीवर शोभेसाठी रंगीबेरंगी चित्रे असतात. परंतु या चित्रांमध्येही योग्य निवड केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. जसे की धावत्या घोड्यांचे छायाचित्र!

>>घोडा सळसळता उत्साह, चैतन्य आणि प्रचंड ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. घोड्याचे छायाचित्र व्यावसायिक प्रगतीला हातभार लावते. 

>>छायाचित्रात घोड्यांची संख्या सात असेल तर ती अधिक लाभदायी मानली जाते. सात या अंकाला प्राकृतिक आणि सार्वभौम महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला सात घोडे असतात, इंद्र धनुष्यात सात रंग असतात, लग्नात सात फेरे घेतले जातात, नवरा बायकोचे नाते सात जन्माचे मानले जाते यावरून सात या अंकाचे महत्त्व अधोरेखित होते. म्हणून सात घोड्यांचे छायाचित्र सर्वोत्तम मानले जाते. केवळ घोड्यांचे छायाचित्र लावायचे नसेल, तर सात घोड्यांच्या रथावर स्वार झालेल्या सूर्य देवांची प्रतिमा लावावी. ती देखील नक्कीच लाभदायक ठरेल. 

>>घराची पूर्व दिशा धनप्राप्तीची मानली जाते. धावत्या घोड्यांचे छायाचित्र पूर्व दिशेला लावल्यास धनवृद्धीस चालना मिळते. 

>>एका घोड्याचे छायाचित्र न लावता घोड्यांच्या समूहाचे छायाचित्र लावावे आणि तेही धावत्या घोड्यांचेच लावावे. 

>>आपण सतत काय पाहतो, काय विचार करतो यानुसार आपली कृती ठरत असते. म्हणून धावत्या घोड्यांचे छायाचित्र आपल्याला नेहमी उत्साह, जोश आणि ऊर्जा देत राहील, त्यामुळे आळस झटकून कामाचा वेग वाढेल आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र