शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आम्रवृक्ष आणि गवताच्या पातीचे झाले भांडण, यात जिंकले कोण? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 08:00 IST

अहंकारी माणसाचा टिकाव कधीच लागू शकत नाही, जो नम्र असतो तोच शेवपर्यंत टिकून राहतो!

एक आम्रवृक्ष मोठ्या डौलात उभा होता. त्याच्यासभोवती गवत उगवले होते. वाऱ्याची एक लहानशी झुळूक येताच गवताचे पाते हलले, त्याबरोबर आम्रवृक्षाला हसू फुटले. ते छद्मीपणाचे हसू होते. त्यात अहंकार डोकावत होता. आपल्याला कोण हसले म्हणून गवताने मान उंचावून पाहिले. 

आम्रवृक्ष त्याला म्हणाला, `किती नाजूक रे तू! मी मात्र लहानपणापासून कणखर. वाकणं, घाबरणं मला ठाऊक नाही!'त्यावर गवताचे पाते हळू आवाजात म्हणाले, `भीती वाटत नाही हे ठीक आहे रे, परंतु विश्वातील सर्वोच्य शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.'यावर तो आम्रवृक्ष खदखदा हसू लागला आणि म्हणाला, `कसला देव आणि कसले काय? काऽऽऽही खरं नसतं बघ! सगळं काही मीच! आता हेच बघ ना. माझी इच्छा नव्हती, मी नाही हललो, नाहीतर तू! पण आता मी माझ्या इच्छेने हलून दाखवतो बघ!'

असे म्हणत तो महाकाय आम्रवृक्ष गदागदा हलू लागला. गवताच्या पात्याच्या लक्षात आले, की अचानक जोरात वारा वाहू लागल्यामुळे आम्रवृक्ष हलू लागला आहे. परंतु याचे श्रेय वाऱ्याला न देता, आम्रवृक्षाला लाटायचे होते. कारण तो त्याच्या अहंकारात मस्त होता. एकाएक वाऱ्याचे पर्यवसान वादळात झाले आणि पाहता पाहता तो आम्रवृक्ष मूळासकट उन्मळून पडला. परंतु त्याचवेळेस परमेश्वरावर विसंबून असलेले गवताचे नाजूक पाते नम्रतेने परंतु तग धरून उभे होते. या प्रसंगाचे वर्णन करताना संत शिरोमणी तुकोबाराय लिहीतात-

महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती!

अहंकारी माणसाचा टिकाव कधीच लागू शकत नाही, जो नम्र असतो तोच शेवपर्यंत टिकून राहतो, हेच या गोष्टीचे तात्पर्य!