शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
4
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
5
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
6
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
7
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
8
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
9
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
11
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
13
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
14
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
15
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
16
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
17
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
18
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
19
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
20
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

प्रत्येक समस्येवर उत्तर असतंच, ते कसं शोधायचं हे सांगताहेत गौर गोपाल दास प्रभू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 10:54 IST

प्रत्येकाजवळ समस्यांतून बाहेर निघण्याची चावी आहे. स्वतः जवळ चाचपून बघा. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'

समाजात अनेक व्यक्ती आपल्याला नेहमी हसतमुख दिसतात. त्यांना पाहता आपल्याला प्रश्न पडतो की या लोकांच्या आयुष्यात समस्या आहेत की नाही? त्यांच्याकडे पाहून आपल्याला असूया वाटते. मात्र समस्या नाहीत असा एकही मनुष्य नाही. समाजाचे हे अवलोकन करूनच समर्थ रामदास स्वामी म्हणाले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे!' याचाच अर्थ समस्या त्यांनाही असतातच, तरी ते खुश कसे राहतात याचे उत्तर देत आहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

प्रभुजी सांगतात, 'या जगात असे एकही कुलूप नाही ज्याची चावी नाही. ज्यावेळी कुलूप बनवले जाते त्यावेळी त्याची चावीसुद्धा बनवली जातेच! हे कुलूप म्हणजेच आपल्या समस्या. या समस्यांवर मार्ग असतोच. तो शोधणाऱ्यांना मिळतो. तो शोधायचा कसा ते समजून घ्या.

या जगात प्रत्येकाला समस्या आहेत. मात्र काही जण फक्त समस्यांचा विचार करत बसतात तर काही जण समस्यांतून निघण्याचा मार्ग शोधण्यावर भर देतात. हिंदीत सांगायचे तर समस्यांच्या बाबतीत 'भागलो' म्हणजे पळून जा नाहीतर 'भाग लो' म्हणजे भाग घ्या! समस्येपासून पळून जाणं हा काही उपाय ठरत नाही. आपण जेवढे प्रश्नांपासून दूर पळू तेवढे प्रश्न आपल्या जास्त मागे लागतात. त्यामुळे हुशारी यातच आहे की त्या समस्यांचा सामना करा. समस्यांपासून दूर पळून नाही तर समस्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग शोधा!

मात्र अनेकदा समस्यांतून मार्गही मिळेनासा होतो, अशा वेळी हुशार लोक काय करतात? तर समस्यांपासून आपले लक्ष विचलित करतात. अर्थात दुसऱ्या विषयांत आपले मन गुंतवतात. तसे केल्याने समस्यांचे ओझे वाटत नाही तर समस्यांशी लढण्याचे बळ मिळते. अनेक प्रश्न असे असतात जे पटकन सुटत नाहीत. अशा वेळी त्याला धीराने सामोरे जाणे हा एकमेव पर्याय उरतो. उदा. एखाद्या कुटुंबात दिव्यांग, मतिमंद, आजारी बाळ जन्माला आले, तर बाळ झालं या सुखापेक्षा पालकांना बाळाच्या व्याधींची चिंता सतावते. अशा वेळी बाळाला सोडून देणे हा पर्याय नसतो, तेव्हा पालक मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम बनवतात आणि आपल्या पोटच्या गोळ्याचे सर्वतोपरी पालन पोषण करतात. हे मानसिक बळ, सामना करण्याची वृत्ती म्हणजेच कुलुपाची चावी आहे हे लक्षात ठेवा. 

प्रत्येकाजवळ समस्यांतून बाहेर निघण्याची चावी आहे. स्वतः जवळ चाचपून बघा. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी