शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

प्रत्येक समस्येवर उत्तर असतंच, ते कसं शोधायचं हे सांगताहेत गौर गोपाल दास प्रभू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 10:54 IST

प्रत्येकाजवळ समस्यांतून बाहेर निघण्याची चावी आहे. स्वतः जवळ चाचपून बघा. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'

समाजात अनेक व्यक्ती आपल्याला नेहमी हसतमुख दिसतात. त्यांना पाहता आपल्याला प्रश्न पडतो की या लोकांच्या आयुष्यात समस्या आहेत की नाही? त्यांच्याकडे पाहून आपल्याला असूया वाटते. मात्र समस्या नाहीत असा एकही मनुष्य नाही. समाजाचे हे अवलोकन करूनच समर्थ रामदास स्वामी म्हणाले, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे!' याचाच अर्थ समस्या त्यांनाही असतातच, तरी ते खुश कसे राहतात याचे उत्तर देत आहेत अध्यात्मिक व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू!

प्रभुजी सांगतात, 'या जगात असे एकही कुलूप नाही ज्याची चावी नाही. ज्यावेळी कुलूप बनवले जाते त्यावेळी त्याची चावीसुद्धा बनवली जातेच! हे कुलूप म्हणजेच आपल्या समस्या. या समस्यांवर मार्ग असतोच. तो शोधणाऱ्यांना मिळतो. तो शोधायचा कसा ते समजून घ्या.

या जगात प्रत्येकाला समस्या आहेत. मात्र काही जण फक्त समस्यांचा विचार करत बसतात तर काही जण समस्यांतून निघण्याचा मार्ग शोधण्यावर भर देतात. हिंदीत सांगायचे तर समस्यांच्या बाबतीत 'भागलो' म्हणजे पळून जा नाहीतर 'भाग लो' म्हणजे भाग घ्या! समस्येपासून पळून जाणं हा काही उपाय ठरत नाही. आपण जेवढे प्रश्नांपासून दूर पळू तेवढे प्रश्न आपल्या जास्त मागे लागतात. त्यामुळे हुशारी यातच आहे की त्या समस्यांचा सामना करा. समस्यांपासून दूर पळून नाही तर समस्यांना सामोरे जाऊन त्यातून मार्ग शोधा!

मात्र अनेकदा समस्यांतून मार्गही मिळेनासा होतो, अशा वेळी हुशार लोक काय करतात? तर समस्यांपासून आपले लक्ष विचलित करतात. अर्थात दुसऱ्या विषयांत आपले मन गुंतवतात. तसे केल्याने समस्यांचे ओझे वाटत नाही तर समस्यांशी लढण्याचे बळ मिळते. अनेक प्रश्न असे असतात जे पटकन सुटत नाहीत. अशा वेळी त्याला धीराने सामोरे जाणे हा एकमेव पर्याय उरतो. उदा. एखाद्या कुटुंबात दिव्यांग, मतिमंद, आजारी बाळ जन्माला आले, तर बाळ झालं या सुखापेक्षा पालकांना बाळाच्या व्याधींची चिंता सतावते. अशा वेळी बाळाला सोडून देणे हा पर्याय नसतो, तेव्हा पालक मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम बनवतात आणि आपल्या पोटच्या गोळ्याचे सर्वतोपरी पालन पोषण करतात. हे मानसिक बळ, सामना करण्याची वृत्ती म्हणजेच कुलुपाची चावी आहे हे लक्षात ठेवा. 

प्रत्येकाजवळ समस्यांतून बाहेर निघण्याची चावी आहे. स्वतः जवळ चाचपून बघा. तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलाशी!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी