शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

डोळा लवण्यामागे शुभ-अशुभ कारण असते की वैज्ञानिक कारण? चला जाणून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 13:18 IST

आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

कधी कधी कोणाच्या विश्वासावर विश्वास ठेवावा. नाही म्हणजे, हे काही शास्त्रात सांगितले नाही, पण मानसशास्त्रात नक्कीच सांगितले आहे. एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम नसतील आणि आपण 'हो' म्हटल्याने कोणाला दिलासा मिळत असेल, तर सूरात सूर मिसळायला काहीच हरकत नाही. 'असे काही नसते' म्हणत समोरच्याच्या भावना दुखावण्यापेक्षा 'मम' म्हणत एखाद्या गोष्टीला पुष्टी द्यावी. याला अंधश्रद्धेला खतपाणी घालणे म्हणत नाहीत, तर मन राखणे असे म्हणतात. अशीच एक भोळी भाबडी समजूत,

डावा डोळा लवतोय, म्हणजे शुभवार्ता समजणार?

डोळा लवणे, याचे शास्त्रीय कारण अगदी क्षुल्लक आहे. कामाचा ताण, डोळ्याचा कोरडेपणा किंवा एखादा जंतूसंसर्ग झाला, तर काही क्षणांसाठी डोळा लवतो. मात्र, या एका घटनेमागे जोडलेला मानसिक विचार खूप आधार देणारा ठरतो. 

मनुष्याला जगायला आशेचा एक किरण पुरेसा असतो. कधी न घडणारी गोष्ट अचानक घडू लागली, की आपण त्या कृतीमागचा अर्थ शोधू लागतो. त्यातही सोयीस्कर सकारात्मक अर्थ काढून मनाची समजूत घालणे, हा तर मनुष्यस्वभाव! डावा डोळा लवणे, या क्रियेचा संबंध शुभवार्तेशी लावून मनुष्य मोकळा झाला. पण, बिचाऱ्या  उजव्या डोळ्याची आपबिती ऐकून, तो पुरुषांसाठी शुभ ठरवला गेला. यात तथ्य किती हा भाग वेगळा, परंतु, चांगल्या विचारांनी काही चांगले घडावे, एवढाच त्यामागचा हेतू. 

कवयित्री शांता शेळकेसुद्धा लवणाऱ्या डाव्या डोळ्यामागील स्त्रीमन आपल्या काव्यातून रेखाटतात, 

माजो लवतोय डावा डोळा, जाई-जुईचो गजरो माळता,रतन अबोली केसात फुलता, काय शकुन गो सांगताय माका...!

काहीतरी छान घडणार, ही आशा माणसाला जगायला बळ देते. वाईट गोष्टी घडतच असतात, परंतु चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वाट बघावी लागते. सुख-दु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणारे आपले मन शुभ शकुनांमुळे अधिक वेग घेते. आकाशाला हात लावू पहाते. याउलट, काही विपरित घडले, की आधीच बिथरलेले मन संशयानी झाकोळून जाते. अशा वेड्या मनाला उभारी मिळावी, म्हणून या समजुती...

एकदा, एका लहान मुलाच्या धक्क्याने पाहुण्यांच्या घरी, परदेशातून आणलेली काचेची फुलदाणी फुटली. रंगात आलेल्या गप्पा-गोष्टींना खळ्ळ्खट्याक झाल्यामुळे एकाएक थांबल्या. टाचणीच्या आवाजानेही कानठळ्या बसतील, एवढी शांतता घरात पसरली. चुप्पी कोण तोडणार, सगळे याच विचारात होते. लहान मुलाला तर आज आपली कोणीही गय करणार नाही, हे चित्र स्पष्टच दिसत होते. त्यावेळी, त्या घरातल्या आजी पुढे सरसावल्या आणि मुलाला जवळ घेत त्यांनी म्हटले, 'तुझ्यामुळे घरावर येणारे मोठ्ठे अरिष्ट टळले.' आजींच्या एका वाक्याने वातावरणात सहजता आली. राग, द्वेष, नुकसान सर्व गोष्टींचा क्षणात निचरा झाला. आता, याला अंधश्रद्धा म्हणाल, की समजुतदारपणा? तीच बाब डाव्या डोळ्याची आहे. डोळ्याच्या लवण्याने कोणाचे भले होत असेल, तर होऊ द्या, त्यांच्यावर तुम्ही डोळे काढू नका.