शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पावसाळ्यात दिसणाऱ्या बेडकाची गोष्ट शिकवेल आयुष्याचा मोठा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 07:00 IST

ही बोध कथा आपल्याला आपल्या आयुष्यातील नैराश्यातून बाहेर पडायला मदत करेल, ती मन लावून वाचा!

आपल्याकडे काय आहे, त्यापेक्षा आपल्याकडे काय नाही, हे पाहण्यात आपला बराच वेळ खर्च होतो. वरून दुसऱ्याकडे असलेले सुख माझ्याकडे का नाही, या विचारात दैवाला, नशिबाला दोष देण्यात आपली बरीचशी ऊर्जा वाया जाते. वरून नैराश्य येते ते वेगळे! 

परंतु यात दोष दैवाचा नसून आपला आहे, हे लक्षात घ्या. आपण जे आहोत, जसे आहोत, आपली जी परिस्थिती आहे, त्याला आपण जबाबदार आहोत, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. कारण यश मिळवण्यात नशीबाची साथ वीस टक्के आणि आपल्या श्रमांची साथ ८० टक्के असावी लागते. हे गुणोत्तर आपल्याला साधता आले, तर आपण लढाई जिंकलीच म्हणून समजा! त्यासाठी पुढे दिलेली गोष्ट लक्षपूर्वक वाचा. 

एक विज्ञानाचे शिक्षक असतात. बऱ्याच वर्षांनी त्यांना त्यांचा जुना विद्यार्थी भेटतो. ते त्याला आग्रहाने घरी घेऊन येतात. त्याची चौकशी करतात. विद्यार्थी नन्नाचा पाढा सुरू करतो. मला संधी मिळाली नाही, दैवाने मला साथ दिली नाही, जे मिळाले त्यात गुजराण करावी लागली, त्यामुळे माझी परिस्थती आज साधारण मनुष्यासारखी आहे.

शिक्षक आपल्या भूमिकेत गेले आणि म्हणाले, 'चल तुला आज एक प्रयोग दाखवतो!'विद्यार्थी शिक्षकांपाठोपाठ त्यांच्या स्वयंपाकघरात गेला. शिक्षकांनी एक पातेले घेतले आणि त्यात एक बेडूक पकडून टाकला. बेडून मस्त पाण्यात खेळत होता. शिक्षकांनी ते पातेले गॅसवर ठेवले आणि आच सुरू केली. पाणी हळू हळू गरम होऊ लागले. बेडूक अस्वस्थ होऊ लागले. पाणी उकळू लागले आणि त्या गरम पाण्यात बेडूक हकनाक मेले. 

विद्यार्थी ओरडला. `सर हे काय करताय? हा कसला प्रयोग करताय. तुमच्यामुळे तो बेडूक अकारण जिवानीशी मेला. का मारले तुम्ही त्याला?'शिक्षक म्हणाले, `त्याला मी नाही मारला, तो त्याच्या कर्माने मेला. पाण्याचे तपमान वाढू लागल्यावर पाण्याबाहेर उडी मारायची सोडून तो मदतीची वाट पाहत राहीला. याऐवजी सगळे बळ एकवटून त्याने पाण्याबाहेर उडी घेतली असती, तर तो वाचला असता. पण दैवावर विसंबून राहिला आणि मेला...!'

विद्यार्थ्याचे डोळे खाडकन उघडले. त्याने शिक्षकांचे पाय धरले आणि म्हणाला, `सर माझं बेडूक होण्याआधी मला पाण्याबाहेर उडी मारायला शिकवलेत त्याबद्दल आयुष्यभर ऋणी राहिन!'

या शिकवणुकीपायी एका बेडकाचा जीव गेला, हे या गोष्टीचे तात्पर्य नाही. या कथेकडे रुपक कथेच्या नजरेतून बघा आणि पाणी नाकातोंडाशी येण्याआधी उडी मारून नैराश्यातून, अपयशाच्या गर्तेतून बाहेर निघा! कारण तुम्हीच तुमचे भाग्य घडवू शकता, अन्य कोणीही नाही!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी