शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हात लावू तिथे सोनं करण्याची ताकद केवळ गोष्टीतल्या राजाकडे नाही, तर तुमच्याकडेही आहे ; कशी ते बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 12:20 IST

जर तुम्हाला जीवनात भरपूर पैसा कमवायचा असेल आणि श्रीमंत व आनंदी राहायचे असेल तर काही गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. जर तुम्ही पुढील गोष्टींचा अवलंब केलात तर तुम्हाला नेहमीच अपार संपत्ती आणि सन्मान मिळेल.

मिडास राजाची गोष्ट आपण बालपणापासून ऐकली आहे. तो राजा जिथे हात लावी त्या वस्तूचे सोने होत असे. तेव्हापासून ती म्हणच बनली. त्या म्हणीचा गर्भितार्थ असा की एखादा प्रयत्नवादी किंवा भाग्यवंत असा असतो की त्याला अपयशाचे तोंड बघावेच लागत नाही. त्याच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळते. ती व्यक्ती मिडास राजासारखी एखाद्या वस्तूची, परिस्थीची किंमत सोन्यासारखी करून टाकते. तुम्हालाही अशा भाग्यवंतांपैकी एक व्हायचे असेल तर काही नियम पाळावे लागतील. 

महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीती यशस्वी आणि आनंदी जीवन कसे मिळवायचे ते सांगते. श्रीमंत कसे व्हावे हे देखील त्यांनी सांगितले आहे आणि पैशाचे नुकसान टाळण्यासाठी काही गोष्टींबद्दल इशारा देखील दिला आहे. चाणक्य नीतीच्या या गोष्टी जीवनात आचरणात आणल्या तर व्यक्ती कधीही अडचणीत येत नाही. तसेच धनवान होऊन आनंदी आयुष्य जगते. 

चला जाणून घेऊया चाणक्य नीतीच्या त्या गोष्टींबद्दल, ज्या व्यक्तीला केवळ अपार संपत्तीच देत नाहीत, तर त्याला नेहमी श्रीमंतही ठेवतात. समाजात आदर मिळवून देतात. आपणही उघडूया आपल्या भाग्याची द्वारे!

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या लोकांच्या मनात नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगली भावना असते, इतरांना मदत करण्याची वृत्ती असते, त्यांच्या जीवनातील सर्व संकटे आपोआप नष्ट होतात. असे लोक टप्प्याटप्प्याने पैसा कमावतात आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक सुखाचा आनंद घेतात. त्यांना आयुष्यात कसलीही कमतरता जाणवत नाही. 

जे लोक धर्मादाय कार्यात व्यस्त आहेत. समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडतात. गरजूंना मदत करतात, त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते. असे लोक कोणतेही काम, व्यवसाय करतात, त्यात त्यांना भरपूर यश मिळते आणि समाजात त्यांना खूप सन्मानही मिळतो.

ज्यांनी केवळ आपले शरीर आणि मनच नाही तर पैसाही परोपकारात गुंतवला, त्यांच्या घरात पैशाची तिजोरी नेहमीच भरलेली असते. त्यांच्या आयुष्यात अडचणी येत नाहीत, आल्या तरी त्या सहज पार केल्या जातात. त्यांचा वंशही वृद्धिंगत होतो. 

थोडक्यात जो स्वतःच्या कर्तव्याबरोबर दुसऱ्यांच्या मदतीला धावतो त्याला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा, आनंद, समाधान यापैकी कसलीही उणीव भासत नाही. त्यांची प्रगती भले कासवाच्या गतीने होत असली तरी ते इतर सशांच्या तुलनेत सातत्य ठेवून स्पर्धा जिंकतात आणि आपले ध्येयदेखील गाठतात!