शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

घरातील देवघराबाबतीत 'या' गोष्टी तुम्हाला माहितेयत का? या वास्तू टिप्समुळे होईल भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:33 IST

देवघरही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. आपण देवाची पूजा, आराधना देवघरासमोरच बसून करतो, शुभकार्य करतो. ही सर्व सकारात्मक कामं करण्यासाठी देवघर योग्य दिशेला असणं आवश्यक आहे.

आपल्यापैकी अनेकजणांचा वास्तुशास्त्रावर विश्वास असतो. या वास्तुशास्त्रानुसार जर घरात किंवा ऑफिसमध्ये आपण रचना केली असेल तर त्याचा फायदा होतो असं म्हटलं जातं. घरातील देवघराबाबतही ही काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेचं एक वैशिष्ट्य असतं. त्याचा प्रभाव त्या घरातील व्यक्तींच्या आयुष्यावर पडतो असं मानलं जातं. त्यामुळे देवघरही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. आपण देवाची पूजा, आराधना देवघरासमोरच बसून करतो, शुभकार्य करतो. ही सर्व सकारात्मक कामं करण्यासाठी देवघर योग्य दिशेला असणं आवश्यक आहे.

- वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर नेहमी ईशान्य दिशेला असलं पाहिजे. देवघरासाठी ही योग्य दिशा आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं याची काळजी घ्यावी. देवघर दक्षिण दिशेला असेल तर आपल्या अनेक कामांमध्ये अडथळे येतात असं म्हटलं जातं.

- देवघराच्या दिशेबरोबरच पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे.

- घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये असं वास्तुशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

- देवघरात कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये. लाल रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात. देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते.

- देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. शिवलिंगही घरामध्ये दोनपेक्षा जास्त ठेवली जाऊ नयेत असं वास्तूशास्त्र सांगतं. तसंच शंख आणि सुर्याच्या प्रतिमाही दोनपेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत. ही काळजी घेतली नाही तर घरातील शांतता नष्ट होते.

घरातील देव्हारा -वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू. त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. तसेच देव्हारा थोड्या उंचीवर असावा.- त्याचबरोबर देवघरात कोणत्याही देवाच्या भंगलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नयेत. अशा मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा राहते. अशा भंगलेल्या मूर्ती लगेचच वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात.

- देवांना कधीही शिळी फुलं वाहू नयेत. तसंच देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटोही ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. देवघरात वापरली भांडी रोज स्वच्छ धुवून वेगळी ठेवली जावीत.

- घरात सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो, तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही मिळतात असं मानलं जातं.

तुमचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर देवघरासाठी या साध्यासोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र