शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

घरातील देवघराबाबतीत 'या' गोष्टी तुम्हाला माहितेयत का? या वास्तू टिप्समुळे होईल भरभराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:33 IST

देवघरही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. आपण देवाची पूजा, आराधना देवघरासमोरच बसून करतो, शुभकार्य करतो. ही सर्व सकारात्मक कामं करण्यासाठी देवघर योग्य दिशेला असणं आवश्यक आहे.

आपल्यापैकी अनेकजणांचा वास्तुशास्त्रावर विश्वास असतो. या वास्तुशास्त्रानुसार जर घरात किंवा ऑफिसमध्ये आपण रचना केली असेल तर त्याचा फायदा होतो असं म्हटलं जातं. घरातील देवघराबाबतही ही काळजी घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशेचं एक वैशिष्ट्य असतं. त्याचा प्रभाव त्या घरातील व्यक्तींच्या आयुष्यावर पडतो असं मानलं जातं. त्यामुळे देवघरही वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असणं गरजेचं आहे. आपण देवाची पूजा, आराधना देवघरासमोरच बसून करतो, शुभकार्य करतो. ही सर्व सकारात्मक कामं करण्यासाठी देवघर योग्य दिशेला असणं आवश्यक आहे.

- वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर नेहमी ईशान्य दिशेला असलं पाहिजे. देवघरासाठी ही योग्य दिशा आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर देवघर कधीही दक्षिण दिशेला नसावं याची काळजी घ्यावी. देवघर दक्षिण दिशेला असेल तर आपल्या अनेक कामांमध्ये अडथळे येतात असं म्हटलं जातं.

- देवघराच्या दिशेबरोबरच पूजा करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असणं आवश्यक आहे.

- घरातल्या देवघरामध्ये लाल रंगाचं कापड घालू नये असं वास्तुशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

- देवघरात कधीही लाल रंगाचा बल्ब लावू नये. लाल रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या सतत अस्वस्थ राहतात. देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावल्यास त्या घरात सकारात्मकता येते.

- देवघरात एकाच देवाच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. शिवलिंगही घरामध्ये दोनपेक्षा जास्त ठेवली जाऊ नयेत असं वास्तूशास्त्र सांगतं. तसंच शंख आणि सुर्याच्या प्रतिमाही दोनपेक्षा जास्त ठेवल्या जाऊ नयेत. ही काळजी घेतली नाही तर घरातील शांतता नष्ट होते.

घरातील देव्हारा -वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्याची सर्वात योग्य दिशा म्हणजे ईशान्य बाजू. त्यामुळे घर बांधताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. तसेच देव्हारा थोड्या उंचीवर असावा.- त्याचबरोबर देवघरात कोणत्याही देवाच्या भंगलेल्या मूर्ती अजिबात ठेवू नयेत. अशा मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जा राहते. अशा भंगलेल्या मूर्ती लगेचच वाहत्या पाण्यात विसर्जन कराव्यात.

- देवांना कधीही शिळी फुलं वाहू नयेत. तसंच देवघरामध्ये आपल्या पूर्वजांचे फोटोही ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. देवघरात वापरली भांडी रोज स्वच्छ धुवून वेगळी ठेवली जावीत.

- घरात सकाळ-संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावल्याने धनलाभ होतो, तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर तेही मिळतात असं मानलं जातं.

तुमचा जर वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर देवघरासाठी या साध्यासोप्या टिप्स नक्की लक्षात ठेवा.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र