शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

नरसोबा वाडीचे प. पु.टेंबे स्वामी यांची आज पुण्यतिथी; वाचा त्यांच्या बाबतीत घडलेला चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:20 IST

मूर्तिपूजा का करावी, याबाबत प. पु. टेंबे स्वामी महाराजांनी त्यांच्या बाबतीत घडलेला चमत्कार वानगीदाखल सांगितला आहे, वाचा.

एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे सन १८५४ ते १९१४ ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय.  नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज्यांचे स्मृतिमंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय. त्यांच्या सान्निध्यात राहून अनेक दत्त भक्तांनी स्वतःचा लौकिक आणि पारमार्थिक उत्कर्ष करून घेतला. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्विचाराचे कण वेचून आपणही पावन होऊया.  

टेंबे स्वामी सांगतात, मूर्तीपूजा हा केवळ उपचार नसून ते देवाशी एकरूप होणे आहे. जी व्यक्ती मन लावून मूर्तीपूजा करते, त्या परमेश्वराची मूर्ती त्या भक्ताची अंकित होते. एकनिष्ठ भक्ताशिवाय मूर्ती राहू शकत नाही. भक्ताच्या मनात देवाला भेटण्याची आत्यंतिक इच्छा जशी उत्पन्न होते व देवाला भेटल्याशिवाय तो राहू शकत नाही, तसेच देवसुद्धा भक्ताला भेटल्याशिवाय राहू शकत नाही. उलट तो एकनिष्ठ भक्ताची वाट पाहतो. 

जेव्हा भक्त देवाला संपूर्णपणे वाहून घेतो, तेव्हा देवही भक्ताची काळजी वाहतात. त्याच्या कामात मदत करतात. काम करत असताना देवाचे चिंतन मनातल्या मनात सुरू असेल तर काम कधी संपते हे लक्षातही येत नाही. अशा रितीने देवच अप्रत्यक्षपणे मदत करतो. सतत नामस्मरण करत राहिल्यास अंत:चक्षुसमोर देवाची मूर्ती येऊ शकते. ज्या व्यक्तीच्या प्रयत्नाने मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे, अशी मूर्ती त्या व्यक्तीला सोडून राहत नाही आणि ती व्यक्तीही त्या मूर्तीला सोडून राहू शकत नाही. 

ते एकदा नदीत स्नान करीत होते, तेव्हा एका चिकित्सक माणसाने विचारले, `देव जर निर्गुण, निराकार आहे, तर आपण रोज देवाच्या मूर्तीची पूजा का करता? आपण संन्यासी असताना, आपल्याला देवाच्या मूर्तीची आवश्यकता काय?' श्री टेंबे स्वामींनी उत्तर दिले, `नित्य एकाग्र मनाने पूजा केल्यामुळे मी व मूर्ती एकरूप झालो आहोत. मी देवाच्या मूर्तीशिवाय राहू शकत नाही आणि मूर्तीही माझ्याशिवाय राहू शकत नाही. तुम्हाला पहायचे असेल, तर पलीकडे असलेली मूर्ती घेऊन जा!' 

टेंबे स्वामींनी मूर्ती त्या माणसाच्या स्वाधीन केली व ते पुढे चालू लागले. तो माणूसही स्वत:च्या मार्गाने चालू लागला. एक-दीड मैल पुढे गेल्यावर त्याने मूर्तीकडे पाहिले, तर मूर्ती अदृष्य झाली होती. तो परत स्वामींकडे आला आणि त्याने ही घटना स्वामींना सांगितली. स्वामींनी त्याला मागे बघायला सांगितले. ती मूर्ती स्वामींच्या मागे येत होती. 

हा केवळ चमत्कार नाही, तर ही ईश्वर भक्तीप्रती वाहिलेली आत्मीयता आहे. आपणही रोजच्या देवपूजेत तल्लीन होऊ लागलो, की देवघरातल्या मूर्तींचे बदलते भाव आपल्याला लक्षात येतात. ही सुखद अनुभूती म्हणजेच ईश्वरी चैतन्य!