शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांगले तेवढे घ्या, वाईट असेल ते सोडून द्या, तरच जीवनात उत्कर्ष साधाल! - भगवान बुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 07:00 IST

मनुष्यस्वभाव असा आहे, की जे वाईट तेच उगाळत बसतो. त्यापेक्षा चांगल्या गोष्टीची उगाळत राहा, म्हणजे चंदनासारख्या त्या सुगंध देतील!

एकदा भगवान बुद्ध विहार करण्यासाठी निघाले. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा शिष्यवर्ग जायला निघाला. भगवान म्हणाले, `मी मोठ्या परिक्रमेसाठी जात आहे, तुम्ही सर्वांनी येऊ नका, इथेच मठात राहून इथली व्यवस्था पहा. मी काही दिवसात परत येतो.'

भगवानांनी केलेल्या सूचनेनुसार शिष्यगण मठात राहिले आणि भगवान एकटेच भ्रमंतीसाठी निघाले. भगवानांना ओळखणारा अनुयायी वर्ग मोठ्या प्रमाणात गावोगावी होता. काही जण त्यांना प्रत्यक्ष ओळखत होते, तर काही जणांनी त्यांची केवळ ख्याती ऐकली होती. 

लोकांचे अभिवादन स्वीकारत भगवान जात होते. एका सकाळी एका गावातून जात असताना दारु प्यायलेला एक माणूस स्वत:च्याच घरासमोर उभा राहून घरच्यांना शिवीगाळ करत होता. भगवान तिथून जात होते. त्या व्यक्तीने भगवानांना पाहिले. हा कोण गोसावी भिक्षा मागायला आला, अशा विचाराने तो त्यांच्याशी उद्धटपणे बोलू लागला. त्याने भगवानांना बरेच काही सुनावले. गाव गोळा झाले. भगवानांनी शांतपणे ऐकून घेतले व ते निघाले.

सायंकाळी त्याची नशा उतरल्यावर गावातल्या बुजूर्ग व्यक्तीने त्या व्यक्तीला चूक निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला, `पण मी ज्याला बोल सुनावले ते भगवान बुद्ध नव्हतेच, ते कायम आपल्या शिष्यांबरोबर असतात.' बुजूर्ग व्यक्ती म्हणाली, `यंदा, भगवान एकटेच निघाले होते, पण तू नशेत असल्यामुळे तू त्यांना ओळखू शकला नाहीस. तुझ्याकडून मोठे पाप घडले आहे. तू त्यांची क्षमा मागितली पाहिजे.'

दारुड्या माणसाला त्याची चूक उमगली. भविष्यात दारूला स्पर्शही करायचा नाही असा त्याने पण केला आणि भगवान बुद्धांचा शोध घेत तो निघाला. वाटेत लोकांना विचारत विचारत दुसऱ्या दिवशी तो जवळच्या गावात पोहोचला, तिथे एका वटवृक्षाखाली भगवान ध्यानस्थ बसले होते. ते समाधीतून बाहेर यायची वाट बघत तो मनुष्य जमीनिवर बसून राहीला.

भगवान बुद्धांनी डोळे उघडले. ते पुढच्या प्रवासाला जायला निघाले, तो समोर असलेला मनुष्य त्यांचे पाय धरत गयावया करू लागला. भगवान म्हणाले, `तू का रडतोस? कसली क्षमा मागतोस?'

तो म्हणाला, `काल सकाळी मी तुम्हाला नशेच्या भरात वाटेल ते बोललो. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझी चूक लक्षात घेऊन यापुढे नशा करणार नाही, असा पण मी केला आहे. पण माझ्या हातून घडलेल्या चुकीबद्दल मला माफ करा.'

भगवान बुद्धांनी त्याला उठून उभे केले आणि म्हणाले, `तू नशा सोडलीस हे चांगलेच झाले, परंतु तू सांगत असलेला प्रसंग मला आठवतही नाही. मी विसरलो, तसा तूही विसरून जा. चांगले आयुष्य जग. माणसाने भूतकाळातील चुकांचा विचार न करता भविष्यात कोणत्या चूका टाळता येतील, याचा विचार केला पाहिजे आणि कायम वर्तमानात जगले पाहिजे.'