शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेडसर दिसणाऱ्या माणसाकडून स्वामी विवेकानंदांना मिळाला तणाव नियंत्रणाचा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:41 IST

देहाला झालेल्या जखमा भरून निघतीलही परंतु मनाला झालेल्या जखमांवर कोणते मलम लावावे, वाचा...

सद्यस्थितीत सभोवताली घडणाऱ्या घटना मन विचलित करणाऱ्या आहेत. अशा वातावरणात मन शांत ठेवायचे असेल, तर समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले 'मनाचे श्लोक' यांचे नित्यपठण करायला हवे. मनावर नियंत्रण मिळवले, की देहाला झालेल्या वेदना मनावर विपरित परिणाम घडवू शकत नाहीत. देहाला झालेले कष्ट, हाल, निंदा, वेदना या क्षणिक आहेत. त्या जखमा भरून निघतीलही, परंतु मनाच्या जखमा दीर्घकाळ टिकतात. यासाठीच, मनाला देहापासून अपिप्त ठेवावे, असे समर्थ रामदास स्वामी सुचवतात. देही असोनि विदेही राहणे, ही अवस्था कशी असते, हे श्लोकातून आणि स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगातून जाणून घेऊया.

मना मानसी दु:ख आणू नको रे,मना सर्वथा शोक चिंता नको रे,विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी,विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी।

परमपूज्य रामकृष्ण परमहंसांशी भेट होण्यापूर्वी स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील घटना...नरेंद्र एका प्रापंचिक चिंतेने हैराण होऊन शोकाकूल अवस्थेमध्ये रस्त्यातून एकटाच फिरत होता. कितीही नाही म्हटले, तरी परमार्थच करायचा हा निश्चय ठाम असताना अजून `सद्गुरु' न मिळाल्याने प्रापंचिक देहबुद्धी दु:ख देतच होती. इतक्यात एक विचित्र दृष्य त्यांच्या नजरेस पडले. वेडसर दिसणारा एक माणूस रस्त्यातून हातवारे करत चालला होता. इतक्यात काही टवाळखोर पोरांनी त्याला दगड मारण्यास सुरुवात केली. मुलांच्या दगड मारण्याने तो विक्षिप्त माणूस आनंदाने अधिकच चेकाळत होता.आता तर अतिमाराने त्याच्या अंगामधून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. जोराजोराने धावत तो माणूस गावाबाहेर जाऊन एका झाडाखाली बसला. त्याची दयनीय अवस्था नरेंद्रला बघवेना. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या जखमांवर ममतेने हात फिरवून नरेंद्रने त्याला विचारले. `बाबा, फार लागले का? त्या वात्रट मुलांनी तुम्हाला बराच त्रास दिला. तुमच्या देहाला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. मी वनस्पतीचा रस काढून लावतो.'

त्यावर खदाखदा हसत तो माणूस म्हणाला, `कोण मुलं? कुठला देह? त्या भगवंताच्या लीलेने मी तर पार मोहून गेलो आहे. आनंदून गेलो आहे. किती सुंदर रीतीने भगवंत माझ्याशी दगडाचा खेळ खेळत होता. खूप मजा आली. हाहाहाहा.

त्याच्या या वागण्या बोलण्यावरून नरेंद्रच्या लक्षात आले, देहबुद्धीचे भान हरपलेला, विचार विकारांपासून दूर गेलेला, विदेही अवस्थेमध्ये असलेला जीव वेडा नसून ज्ञानी आहे. उन्मनी अवस्थेतील अनुपम सुख भोगीत आहे. विवेकबुद्धीने मुक्त होण्याचे जीवनातील त्याचे ध्येय निश्चित झाले आहे. मनाला शोक, चिंता, दु:ख हे देहबुद्धी प्रबळ असल्याने होते. विवेकाने विदेही अवस्था प्राप्त होते व जीव मुक्त होतो. 

आपल्यालाही विदेही अवस्था प्राप्त करण्याचा सराव करायला हवा. तो कसा करायचा? तर त्यावर सोपा उपाय म्हणजे, दिवस चांगले असोत की वाईट, मनाला एकच सूचना द्यायची, 'हे ही दिवस जातील.' मग आपोआप विदेही अवस्थेकडे वाटचाल सुरु होईल. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य