शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

Swami Samartha : स्वामींना आपण जो विडा देतो, तो साधासुधा नाही तर त्यात सामावते अलौकिक शक्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 07:00 IST

Swami Samartha : ६ मे रोजी स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे, त्यांच्यासाठी प्रेमाने विडा घेऊन जाल, त्याआधी तो कसा बनतो हे लक्षात घ्या आणि त्याचे फायदेही जाणून घ्या!

भक्त आपल्या आवडीच्या गोष्टी भगवंताला अर्पण करतो आणि त्याची भक्ती पाहून भगवंत त्याचा स्वीकारही करतो. त्यानुसार आपण जसा देवाला नैवेद्य अर्पण करतो, तसा देवाला विडाही दिला जातो. रसिक भक्तांनी त्यावरही सुंदर कवने लिहिली आहेत. जसे की, 

विडा घ्या हो स्वामिराया l भक्तवत्सल करुणालया llदेतो हात जोडोनियां ll भावें वंदुनिया पायां ll धृ llज्ञानदृष्टी पुगिफळ ll तुमच्या कृपेचे हे बळ llमूळ आधार सोज्वळ ll पापी पतित ताराया ll १ llभक्तीदळ नागवल्ली ll पाने शुद्धही काढिली llनामबळे निर्मळ केली ll सिद्ध झालो जी अर्पाया ll २ llरंगी रंगला हा कात ll प्रेमभावाच्या सहित llत्याने केले माझे हित ll देह लावियला पायां ll ३ llचुना शांती निर्मळ ll त्वांचि दिले भक्तीबळ llकरुनी मनासी कोमळ ll चरणी घातली ही काया ll ४ llवेलची ज्ञानज्योत ll सर्व भूतांच्या विरहित llठेवुनी तुमच्या पायी हेत ll लागे मनासी वळवाया ll ५ llलवंग जाणां तिखट खरी ll घेउनी बुद्धीच्या चतुरी llक्रोध दवडीयला दूरी ll तूची समर्थ ताराया ll ६ llवैराग्याचे जायफळ ll तुम्ही दिले भावबळ llकरुनी विरक्त निर्मळ ll शिरी ठेवियेली छाया ll ७ llपत्री क्षमेची या परी ll बापा मिळविली बरी llसदा राहोनी अंतरी ll सुखे सुखविते देहा ll ८ llकाय बदामाची मात ll फोडुनि द्वैताचा हा हेत llवाढावया भक्तिपंथ ll सिद्ध केला करुणालया ll ९ llआत्महिताहित कस्तुरी ll घेउनी ज्ञानभक्तीपरी llधन्य हिची थोरी ll भविभवात ताराया ll १० llआनंद म्हणे केशर सत्य ll तुमचे पायी माझा हेत llपूर्ण केले मनोरथ ll कृतीकर्मासी वाराया ll ११ ll

कवनाचे शब्द लक्षात घेतले तर हा केवळ प्रापंचिक विडा नाही तर पारमार्थिक विडा असल्याचे लक्षात येईल. हा विडा अर्पण देवाला करायचा आणि त्यामुळे चढणारा भक्तिरंग भक्ताने अनुभवायचा हा त्यामागचा मूळ भावार्थ! त्यामुळे केवळ स्वामींनाच नाही तर दत्ताला, हनुमंताला, रामरायाला, विठुरायाला, साईनाथाला अशा अनेक देवांना विडा अर्पण केल्याची सुमधुर कवने आपल्याला आढळतील. हा झाला पारमार्थिक उद्धार, आता प्रापंचिक उद्धार कसा होतो तेही जाणून घेऊ!

कोणत्याही पूजेमध्ये विड्याचे पान वापरणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मात विड्याचे पान अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देवतांनी भगवान विष्णूची विड्याच्या पानांनी पूजा केली. तेव्हापासून पूजेत विड्याच्या वापर केला जातो. या पानांमध्ये देवी-देवता वास करतात असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रात विड्याच्या पानांशी संबंधित उपाय आणि युक्त्या खूप प्रभावी मानल्या गेल्या आहेत. विड्याची पाने केवळ कामात यश मिळवून देत नाहीत तर आपल्या कामातील अडथळेही दूर होतात. 

इच्छापूर्तीसाठी विड्याच्या पानाचे उपाय

>> इच्छापूर्तीसाठी दर मंगळवारी किंवा शनिवारी स्नान करून मंदिरात जावे. बजरंगबलीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. 

>> विड्याच्या पानांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. ही पाने नकारात्मक शक्तींना शोषून घेतात. म्हणून वास्तुशास्त्राने घरात नागवेलीच्या पानांचा अर्थात विड्याच्या पानांचा वेल लावावा असे सांगितले आहे. 

>> स्वामी समर्थांना आपण विडा अर्पण करतो तसा दर गुरुवारी दत्त गुरूंना स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून विडा अर्पण करावा. त्यामुळे प्रापंचिक कलह दूर होऊन कौटुंबिक नाते सुधारते. 

>> व्यवसाय वाढीसाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरून, जेवू घालून विडा द्यावा. तिने संतुष्ट होऊन आशीर्वाद दिले असता व्यवसाय वृद्धी होते तसेच लक्ष्मी प्रसन्न होते.