शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samartha: स्वामींच्या तारक मंत्रातील 'या' दोन ओळींचा १०८ वेळा जप सुरु करा; लाभच लाभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 11:19 IST

Swami Samartha: स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे, संपूर्ण मंत्र १०८ वेळा म्हणणे शक्य नाही, त्यामुळे दिलेल्या दोन ओळींचा जप अवश्य करा आणि लाभ घ्या. 

तारक मंत्र पाठ नाही असा एकही स्वामी भक्त आढळणार नाही. मन कितीही उद्विग्न असू दे, पण स्वामी समर्थांचा तारक मंत्र (Swami Samartha Tarak Mantra) नुसता म्हंटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होते हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे. मात्र, हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का? तर नाही! हा मंत्र रोज म्हणायला हवा तोही १०८ वेळेला! संपूर्ण तारक मंत्र १०८ वेळेला म्हणणे शक्य नाही, म्हणून त्यातील दोनच ओळी १०८ वेळा म्हटल्या तरी स्वामींची उपासना पूर्ण होईल. 

तारक मंत्रातल्या जप करण्यासाठी उपयुक्त दोन ओळी :

नि:शंक हो, निर्भय हो मना रे,प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे! 

या दोन ओळीच का? तर या ओळींच्या पहिल्या दोन शब्दांमध्ये तारक मंत्राचे सार सामावले आहे. अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. या दोन्ही अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते...प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे! स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही. 

मंत्र विधी : 

उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा. जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज एकाच वेळी, एकाच जागी बसून करता तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते. म्हणून ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे. मन शांत असताना ही उपासना करणे लाभदायी ठरते. म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रात:काळची असावी असे सुचवले आहे. त्यावेळी मनात शून्य विचार असतात. आजूबाजूला लोकांचा, वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरु असते. हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते. अशा वेळी उठून आसन घालून, स्वामींची प्रतिमा समोर ठेवून, उदबत्ती लावून नामजप सुरु केलात तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल. मन शांत, आरोग्य स्वास्थ्य आणि आर्थिक बरकत होऊ लागेल. 

मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईलच असे नाही. उपासनेत बंधनं नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच ठिकाणी एकाच वेळी बसून जप केलात तरी त्याचा लाभ होईल. 

जप १०८ वेळा का करायचा?

संत नामदेव म्हणाले तसं, 'कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुख' म्हणजेच भजन, कीर्तन, नामःस्मरण करताना पुढच्या पाच मिनिटांत आपल्याला ग्लानी येऊ लागते, याउलट टीव्ही पाहताना, चित्रपट पाहताना, गाणी ऐकताना झोप येत नाही. त्यात आपण रंगून जातो. मात्र त्या सुखाचा काही काळाने कंटाळा येऊ शकतो, परंतु नामःस्मरणाचा कंटाळा कधीही येणार नाही. मात्र ती गोडी अनुभवण्यासाठी आधी जिभेला आणि मनाला जप करण्याचा सराव करवून घ्यावा लागेल. एक-दोनदा नाम घेऊन ती सवय लागणार नाही. त्यासाठी १०८ वेळा जप करा म्हटले आहे. एवढ्या वेळा नामःस्मरण करू तेव्हा कुठे एकदा मन नामाशी एकरूप होईल. बाकीचे १०७ विरून जातील पण ते १ नाम कामी येईल आणि पुण्य संचय होईल. 

घरातील आजारपण, आर्थिक समस्येवर उपाय :

स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटावर मात करणारा आहे. जर घरात कोणाचे आजारपण असेल, आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामःस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा. तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नांतून वाट मिळेल. एवढे नामजपात सामर्थ्य आहे, त्याचा अनुभव मनोभावे नक्की घेऊन बघा. 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiपूजा विधी