शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

Swami Samartha: स्वामींच्या तारक मंत्रातले निदान पहिले दोन शब्द रोज न विसरता म्हणा; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 11:47 IST

Swami Samartha: आज स्वामी समर्थांच्या प्रगटदिनानिमित्त संकल्प करूया, तो म्हणजे संपूर्ण तारक मंत्र नाही तर निदान पहिले दोन शब्द रोज म्हणण्याचा; वाचा महत्त्व!

स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र आपल्या सर्वांना मुखोद्गत आहे. परंतु तो केवळ म्हणून भागणार नाही, तो समजून म्हटला पाहिजे. वास्तविक पाहता सर्व स्तोत्रांचे सार काव्याच्या शेवटी असते. परंतु, स्वामींच्या तारक मंत्रात सुरवातीलाच स्तोत्राचे सार वाचता येते. तेही अवघ्या दोन शब्दांत!

ते दोन शब्द कोणते? तर... नि:शंक हो... निर्भय हो मना रे...!

अध्यात्म मार्गात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे भगवंताप्रती अतूट विश्वास. हा विश्वास मनात निर्माण झाला, तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते, तेव्हा मन आपोआप निर्भय अर्थात भयमुक्त होते. 

प्रश्न असा, की हा विश्वास आपण देवावर दाखवतो का? माझा देवावर विश्वास आहे, हे म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात विश्वास दाखवणं वेगळं. 

एकदा स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या पत्नीबरोबर नावेतून प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना नाव नदीच्या मध्यापर्यंत पोहोचली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले, मी तुला या नदीत ढकलून दिले, तर कोणीच तुला वाचवू शकणार नाही. 

हे ऐकून शारदा माता हसल्या. 

रामकृष्ण म्हणाले, तुला जीवे मारण्याची मी धमकी देतोय आणि तू हसतेय?

यावर शारदा माता म्हणाल्या, तुम्ही तसे करणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. जर मला तुमच्या वागणुकीबद्दल शंका वाटत नाही, तर भीती कुठून वाटणार?

याला म्हणतात अतूट विश्वास. असा विश्वास नात्यांमध्ये आणि भक्त भगवंतामध्ये निर्माण झाला, की आपोआप प्रचिती येते... प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे! 

हे ही वाचा : Swami Samartha : कितीही मोठे संकट असो, त्यातून हमखास मार्ग मिळवण्यासाठी म्हणा स्वामींचा 'हा' खास मंत्र