शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका; वाचा, रंजक कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:10 IST

स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात.

विश्वास. बहुतांश वेळेस माणून समोरची व्यक्ती काय सांगते, ते ऐकतो, त्याप्रमाणे कृती करतो. कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही, आपले वाईट होणार नाही, असा विश्वास माणसाला वाटत असतो. मात्र, काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, याची शिकवण दिली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. नेमके काय घडले जाणून घेऊया...

श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य!

स्वामी आसनस्थ झालेले असतात. स्वामी चोळप्पांना म्हणतात की, जसा राजा तसी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही, कुणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात. एवढेच नव्हे, तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकाने किरकोळ, क्षुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकीकत येते.

मूर्तीपूजा का केली जाते? ‘असे’ पटवून दिले स्वामी विवेकानंदांनी महत्त्व

दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजालाही भोगावे लागणार, असे स्वामी सांगतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की, प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे. या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही. आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष्य आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे, असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थानाच्या जप्तीबाबत राजाला खलित येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो.

स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!

स्वामी राजाची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कानउघडणी करतात आणि म्हणतात की, चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली? त्याचाच हा परिणाम आहे. प्रजेला खूपच सोसावे लागत आहे. दाजीबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की, तुला क्षमा नाही. तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचाच अवकाश की, इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा, आपण गुरुपदेश मानला नाही. शेवटी आपल्या मनाचं केले. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा, अशी शिकवण स्वामी देतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी