शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका; वाचा, रंजक कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:10 IST

स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात.

विश्वास. बहुतांश वेळेस माणून समोरची व्यक्ती काय सांगते, ते ऐकतो, त्याप्रमाणे कृती करतो. कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही, आपले वाईट होणार नाही, असा विश्वास माणसाला वाटत असतो. मात्र, काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, याची शिकवण दिली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. नेमके काय घडले जाणून घेऊया...

श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य!

स्वामी आसनस्थ झालेले असतात. स्वामी चोळप्पांना म्हणतात की, जसा राजा तसी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही, कुणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात. एवढेच नव्हे, तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकाने किरकोळ, क्षुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकीकत येते.

मूर्तीपूजा का केली जाते? ‘असे’ पटवून दिले स्वामी विवेकानंदांनी महत्त्व

दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजालाही भोगावे लागणार, असे स्वामी सांगतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की, प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे. या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही. आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष्य आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे, असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थानाच्या जप्तीबाबत राजाला खलित येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो.

स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!

स्वामी राजाची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कानउघडणी करतात आणि म्हणतात की, चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली? त्याचाच हा परिणाम आहे. प्रजेला खूपच सोसावे लागत आहे. दाजीबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की, तुला क्षमा नाही. तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचाच अवकाश की, इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा, आपण गुरुपदेश मानला नाही. शेवटी आपल्या मनाचं केले. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा, अशी शिकवण स्वामी देतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी