शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका; वाचा, रंजक कथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:10 IST

स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात.

विश्वास. बहुतांश वेळेस माणून समोरची व्यक्ती काय सांगते, ते ऐकतो, त्याप्रमाणे कृती करतो. कारण त्याला समोरच्या व्यक्तीवर विश्वास असतो. समोरच्या व्यक्तीमुळे आपले नुकसान होणार नाही, आपले वाईट होणार नाही, असा विश्वास माणसाला वाटत असतो. मात्र, काही प्रसंगात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवल्यामुळे नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, याची शिकवण दिली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध कालातीत असून, ते समाजासाठी नेहमी उपयुक्त ठरत असतात. नेमके काय घडले जाणून घेऊया...

श्रीकृष्णाशिवाय ‘या’ ५ जणांना माहीत होते गीतारहस्य!

स्वामी आसनस्थ झालेले असतात. स्वामी चोळप्पांना म्हणतात की, जसा राजा तसी प्रजा. राजाला सुद्धा कळत नाही, कुणावर विश्वास ठेवावा. तिकडे राजा खंडेराव यांचा कारभारी दाजीबा यांना इंग्रज अटक करतात. दाजीबाचा स्वभाव फार कठोर असल्यामुळे तो इंग्रजांशी उर्मटपणे वागतो. राजा खंडेराव जामीन आणि दंड भरून दाजीबाला सोडवून आणतात. एवढेच नव्हे, तर त्याला प्रमुख कारभारी नियुक्त करतात. न्यायनिवाडा दाजीबाच्या हातात दिला जातो. दाजीबा अविवेकाने किरकोळ, क्षुल्लक अपराधासाठी कठोर शिक्षा करतात. स्वामींच्या कानावर दाजीबाची सर्व हकीकत येते.

मूर्तीपूजा का केली जाते? ‘असे’ पटवून दिले स्वामी विवेकानंदांनी महत्त्व

दाजीबा आपल्या कर्माचे फळ भोगणार आणि त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवणारा राजालाही भोगावे लागणार, असे स्वामी सांगतात. गावकरी जाऊन राजाची भेट घेतात आणि राजाला सांगतात की, प्रजा सुखी नाही, न्यायपदाधिकाऱ्यांमुळे प्रजा हैराण झालेली आहे. या तक्रारीवर राजा फारसे लक्ष देत नाही. आमचे रयतेवर पूर्णपणे लक्ष्य आहे. आम्ही योग्यच माणसाची नेमणूक केलेली आहे, असे सांगून राजा गावकऱ्यांचे बोलणे फेटाळून लावतो. काही दिवसांनी इंग्रजांचा संस्थानाच्या जप्तीबाबत राजाला खलित येतो. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो स्वामींना शरण जातो.

स्वप्न पूर्ण होवो न होवोत, स्वप्न पाहत राहा, तरच होतील ‘हे’ फायदे!

स्वामी राजाची चांगलीच हजेरी घेतात. त्याला खडे बोल सुनावून कानउघडणी करतात आणि म्हणतात की, चुकीचा माणूस अटक झाल्यावर सावध होण्याऐवजी त्याला सोडवून बढती का देण्यात आली? त्याचाच हा परिणाम आहे. प्रजेला खूपच सोसावे लागत आहे. दाजीबा स्वामींची क्षमा मागतो. स्वामी म्हणतात की, तुला क्षमा नाही. तुला इंग्रज शिपाई पकडून नेतील. स्वामींचे वाक्य संपायचाच अवकाश की, इंग्रज शिपाई दाजीबाला अटक करतात. राजा, आपण गुरुपदेश मानला नाही. शेवटी आपल्या मनाचं केले. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये. सारासार विचार करून निर्णय घ्यावा, अशी शिकवण स्वामी देतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी