शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वश्रेष्ठ भक्त कोण? सर्वोच्च कर्म कोणते? स्वामी समर्थ महाराजांचा उपदेश, म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 07:07 IST

Swami Samarth Maharaj Teachings: अनेकदा सर्वश्रेष्ठ भक्त कोण, यासाठी अनुयायांमध्ये चढाओढ असलेली पाहायला मिळते. अशावेळी स्वामींचा उपदेश वेगळी शिकवण देतो, असे सांगितले जाते.

Swami Samarth Maharaj Teachings: दत्तगुरुंच्या अवतारांपैकी एक आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचा मानणारा लाखोंचा समुदाय आहे. लाखो अनुयायी आहेत. स्वामी समर्थ महाराज यांच्या कृतीतून, उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो, असे भक्तगण सांगतात. स्वामींची उपासना न चुकता करतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा अनेकांचा अनुभव आहे. स्वामींवरील अनेक साहित्यातून स्वामींशी निगडीत घटना, गोष्टी याची माहिती होते. तर स्वामींशी अनेक कथाही सांगितल्या जातात. यातून नेमका तो बोध घ्यावा, असे म्हटले जाते. एकदा स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण, अशी पैज लागली होती. यावेळी स्वामींनी केलेला उपदेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

एका कथेनुसार, स्वामींच्या श्रेष्ठ भक्ताला संपूर्ण एका महिन्यापर्यंत नैवेद्य अर्पण करण्याचा मान मिळणार असल्याची वार्ता पसरते. एक सावकार, एक हलवाई सदाशिव आणि एक गावकरी आपापला दावा करतात. हे तिघे जण स्वामींकडे येऊन आपल्याला हा मान मिळावा, अशी विनंती करतात. यावेळी, पुढील सात दिवसांत तुम्ही अशी कृती करा, जी सर्वोच्च असेल, अशी अट स्वामी ठेवतात. सावकार स्वामींची मूर्ती घडवायची, असे ठरवतात. हलवाई उत्तम मिठाई तयार करण्यासाठी कामाला लागतात. एके दिवशी सावकार आणि हलवाई रस्त्यात भेटतात. एकामेकांची निंदा करतात. आपलीच कृती सर्वोच्च ठरेल, असा दावाही करतात. 

तेवढ्यात गावकरी एका घरात जाताना या दोघांना दिसतो. गावकरी त्या घरातून बाहेर पडल्यावर, आमचा मित्र इथे येऊन काय करत होता, असा प्रश्न ते दोघे घरातील एका व्यक्तीला विचारतात. यावर, आमच्यासोबत बसतात. गप्पा, गोष्टी होतात. चहा-पाणी घेऊन ते निघून जातात. बाकी काही नाही, असे उत्तर मिळते. ते दोघेही मनोमन आनंदून जातात. मुदत संपल्यावर स्वामी तिघांकडे जातात. 

स्वामी प्रथम सावकाराकडे जाऊन त्यांनी घडवलेली मूर्ती पाहतात. मग हलवाईकडे जाऊन मिठाईची चव पाहतात. मग गावकऱ्याकडे जातात आणि विचारतात, तू काय केलेस? यावर, स्वामी मी काय विशेष करणार. मी फक्त तुमच्याबद्दल, तुमच्या लीलांबद्दल आणि तुमच्या सामर्थ्याबाबत लोकांना माहिती दिली. तुम्ही जो उपदेश करता, त्याबाबत लोकांना समजवून सांगितले. नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमची शिकवण समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही प्रयत्न केले, असे गावकरी उत्तरतो.

यानंतर स्वामी गावकऱ्याला नैवेद्य अर्पण करायचा मान देत आहोत, असे जाहीर करतात.  स्वामी गावकऱ्याला शाबासकीही देतात. सावकार आणि हलवाई यांना आश्चर्य वाटते. स्वामी त्यांना म्हणतात की, अरे संत-महंतांना देव का पाठवतो? अज्ञानी लोकांना सद्मार्गाचा रस्ता दाखवायला. त्यांना मार्गदर्शन करायला. प्रपंच करताना ईश्वराचे विस्मरण होऊ नये, ही आठवण करुन द्यायला. या गावकऱ्याने या कामात शक्य तसा हातभार लावला. अज्ञानी लोकांना सद्मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. आमची शिकवण ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत ती पोहचवली. गुरूला मूर्तीचा काय लोभ? संत मिष्ठान्न ग्रहण करतात, ते भक्तांच्या समाधानासाठी. आम्हाला जे अपेक्षित होते, ते या गावकऱ्याने केले. म्हणून त्याची कृती सर्वश्रेष्ठ ठरली.

||श्री स्वामी समर्थ||

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक