शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samarth Story: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 12:15 IST

Swami Samarth Story: एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांच्या सेवेत असलेल्या बऱ्याच सेवकांनी स्वामींच्या लीला केवळ जवळून पाहिल्या नाहीत, तर त्याची नोंदही करून ठेवली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध हे समाजासाठी नेहमीच लाभदायक ठरत असतात, याची प्रचिती आजही अनेकांना येत असल्याचे सांगितले जाते. एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

ठाकुरदास नावाचे एक प्रसिद्ध प्रबोधनकार होते. ते जेव्हा कीर्तन करायचे, तेव्हा लोकं साक्षात डोलायची. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही ते दुःखी होते. कारण त्याच्या अंगावरील कोड. त्यांना फक्त हाच प्रश्न होता की, आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? एक दिवस ते वैतागून निर्णय घेतात की, आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तिथेच काढावे. ते आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करावे, असा विचार ते करतात.

जायच्या आधी ते गावकऱ्यांच्या आग्रहाखातर दत्तप्रबोधन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचिती येते. ते स्वामी चरणी नतमस्तक होतो. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला?

स्वामी महाराज म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदास यांचा रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरीही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार. ठाकुरदास पुन्हा एकदा स्वामी चरणी नतमस्तक होतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक