शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Swami Samarth Story: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 12:15 IST

Swami Samarth Story: एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांच्या सेवेत असलेल्या बऱ्याच सेवकांनी स्वामींच्या लीला केवळ जवळून पाहिल्या नाहीत, तर त्याची नोंदही करून ठेवली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध हे समाजासाठी नेहमीच लाभदायक ठरत असतात, याची प्रचिती आजही अनेकांना येत असल्याचे सांगितले जाते. एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

ठाकुरदास नावाचे एक प्रसिद्ध प्रबोधनकार होते. ते जेव्हा कीर्तन करायचे, तेव्हा लोकं साक्षात डोलायची. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही ते दुःखी होते. कारण त्याच्या अंगावरील कोड. त्यांना फक्त हाच प्रश्न होता की, आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? एक दिवस ते वैतागून निर्णय घेतात की, आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तिथेच काढावे. ते आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करावे, असा विचार ते करतात.

जायच्या आधी ते गावकऱ्यांच्या आग्रहाखातर दत्तप्रबोधन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचिती येते. ते स्वामी चरणी नतमस्तक होतो. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला?

स्वामी महाराज म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदास यांचा रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरीही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार. ठाकुरदास पुन्हा एकदा स्वामी चरणी नतमस्तक होतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक