शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

Swami Samarth Story: स्वामी समर्थ महाराज म्हणतात, सद्कर्माची कास कधीही सोडू नये; वाचा, प्रेरक बोधकथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 12:15 IST

Swami Samarth Story: एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांच्या सेवेत असलेल्या बऱ्याच सेवकांनी स्वामींच्या लीला केवळ जवळून पाहिल्या नाहीत, तर त्याची नोंदही करून ठेवली आहे. स्वामी समर्थ महाराजांची शिकवण, उपदेश, बोध हे समाजासाठी नेहमीच लाभदायक ठरत असतात, याची प्रचिती आजही अनेकांना येत असल्याचे सांगितले जाते. एका प्रसंगात सद्कर्माची कास कधीही सोडू नये, असा बोध स्वामी करतात. नेमके काय घडले? जाणून घेऊया...

ठाकुरदास नावाचे एक प्रसिद्ध प्रबोधनकार होते. ते जेव्हा कीर्तन करायचे, तेव्हा लोकं साक्षात डोलायची. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही ते दुःखी होते. कारण त्याच्या अंगावरील कोड. त्यांना फक्त हाच प्रश्न होता की, आयुष्यभर एवढी अनन्य भावांनी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला? एक दिवस ते वैतागून निर्णय घेतात की, आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तिथेच काढावे. ते आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशीला जायची तयारी करतात. मात्र, त्यापूर्वी गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करावे, असा विचार ते करतात.

जायच्या आधी ते गावकऱ्यांच्या आग्रहाखातर दत्तप्रबोधन करतात. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात की, काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने ते काशीला न जाता अक्कलकोटला जातात. स्वामी महाराज त्याला पाहताच म्हणतात की, हमारी कस्तुरी लाओ! ठाकुरदासना स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचिती येते. ते स्वामी चरणी नतमस्तक होतो. ठाकुरदास स्वामींना म्हणतात की, जीवनभर दत्त उपासना करूनही मला कुष्ठरोग का झाला?

स्वामी महाराज म्हणतात की, हे तुझे भोग आहेत. वेळ आले की, ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदास यांचा रोग बरा होतो. स्वामी बोध करतात की, कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले, तरीही सद्कर्माची कास कधीही सोडू नये. उपासना पंथ सांडू नये. भोग आपली वेळ आली की, आपोआप संपणार. ठाकुरदास पुन्हा एकदा स्वामी चरणी नतमस्तक होतात. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक