शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवावी, पण अंधश्रद्धा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 12:55 IST

स्वामी समर्थ महाराजांनी एका प्रसंगात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, अशी शिकवण दिली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. एकूणच भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते. कोणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी देवावर श्रद्धा ठेवतो. तर कोणी दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवतो. आपल्याकडील जवळपास सर्वच संतांनी थोतांड, चुकीच्या चालिरिती यांवर जोरदार प्रहार केला आहे. सत्कर्म करण्यासह चुकीच्या रुढी, परंपरा, चालिरिती यांना तिलांजली द्यावी, असा उपदेशही संतांनी केला आहे. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांनी वेळोवेळी अंधश्रद्धा, थोतांड, बुवाबाजी यांवर आसूड ओढलेले दिसते. 

अक्कलकोटात अनेकविध ठिकाणांहून माणसे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येत असत. असेच गणपतीबुवा नामक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला आली होती. स्वामींनी त्यांना तेथून जायला सांगितले. स्वामींच्या या कृतीचे गणपतीबुवांना फार वाईट वाटले. त्याचवेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णास्वामी आलेले असतात. आपण साक्षात कृष्णाचा अवतार असल्याचे कृष्णास्वामी लोकांना भासवत असत. कृष्णास्वामीच्या गोड बोलण्याला गणपतीबुवा अगदी भूलले आणि त्यांच्या आहारी गेले.

महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा

सावधगिरी बाळगा. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊ नका, असे स्वामी नेहमी सांगत. मात्र, स्वामींची ही शिकवण गणपतीबुवा विसरले. कालांतराने गणपतीबुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला. कृष्णास्वामीवर अगाध श्रद्धा असल्याने गणपतीबुवांनी मुलाला वैद्यांकडेही नेले नाही. एकदा कृष्णास्वामीचे प्रबोधन सुरू असताना स्वामी समर्थ तिथे गेले. आपल्यासमोर स्वामी काहीच नाही, असा आविर्भाव मिरवत स्वामींचा अपमान केला जातो. स्वामींनी आपल्याशी शास्त्रार्थ करावे, असे आव्हान कृष्णास्वामी देतात. मात्र, स्वामी एकही शब्द न बोलता तेथून निघून जातात.

गावकरी कृष्णास्वामीचा जयजयकार करतात. हा सर्व प्रकार पाहून गणपतीबुवाची कृष्णास्वामीवरची श्रद्धा वाढते. यानंतर, तुम्ही मला धन, संपदा दान करा. त्याबदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल, असे कृष्णास्वामी सांगत फिरू लागतात. दुसरीकडे काही केल्या गणपतीबुवाच्या मुलाचा आजार बरा होत नाही. उलट परिस्थिती गंभीर बनते. चोळप्पा कळकळीनी त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात. मात्र, ते काहीही ऐकत नाहीत. तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज तेथे येतात. 

सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक

स्वामी गणपतीबुवांवर चिडतात आणि म्हणतात की, अरे माणसा, अजून तुला अक्कल आलेली नाही. इतके अनुभव घेऊनही चांगल्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतोस? तरीही, गणपतीबुवा काही ऐकायला तयार नसतात. मग स्वामी आपल्या साधनेच्या बळावर सर्व लोकांना कृष्णास्वामींची दुसरी बाजू दाखवतात. कृष्णास्वामी स्त्री शिष्यांसोबत नृत्य करतात. मद्यपान करतात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर मौज करताना दिसतात, असे सर्वांच्या दृष्टीस पडते. 

ती दृश्ये पाहून गणपतीबुवांसकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाडकन उघडतात. गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. स्वामींमुळे गणपतीबुवांचा मुलगाही बरा होतो. दुसरीकडे, सर्व गावकरी कृष्णास्वामीला चोप देतात. कृष्णास्वामी स्वामी महाराजांना शरण येतो आणि शरमेने मान खाली घाऊन गाव सोडतो. स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की, श्रद्धा जरूर ठेवा. पण अंधश्रद्धा ठेऊ नका.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी