शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराजांची शिकवण: श्रद्धा जरूर ठेवावी, पण अंधश्रद्धा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 12:55 IST

स्वामी समर्थ महाराजांनी एका प्रसंगात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, अशी शिकवण दिली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. एकूणच भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. एखाद्या व्यक्तीची अनेक गोष्टींवर श्रद्धा असू शकते. कोणी आपल्या कामावर श्रद्धा ठेवतो, तर कोणी देवावर श्रद्धा ठेवतो. तर कोणी दोन्ही गोष्टींवर श्रद्धा ठेवतो. आपल्याकडील जवळपास सर्वच संतांनी थोतांड, चुकीच्या चालिरिती यांवर जोरदार प्रहार केला आहे. सत्कर्म करण्यासह चुकीच्या रुढी, परंपरा, चालिरिती यांना तिलांजली द्यावी, असा उपदेशही संतांनी केला आहे. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थांनी वेळोवेळी अंधश्रद्धा, थोतांड, बुवाबाजी यांवर आसूड ओढलेले दिसते. 

अक्कलकोटात अनेकविध ठिकाणांहून माणसे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला येत असत. असेच गणपतीबुवा नामक व्यक्ती स्वामींच्या दर्शनाला आली होती. स्वामींनी त्यांना तेथून जायला सांगितले. स्वामींच्या या कृतीचे गणपतीबुवांना फार वाईट वाटले. त्याचवेळी अक्कलकोटमध्ये एक साधू कृष्णास्वामी आलेले असतात. आपण साक्षात कृष्णाचा अवतार असल्याचे कृष्णास्वामी लोकांना भासवत असत. कृष्णास्वामीच्या गोड बोलण्याला गणपतीबुवा अगदी भूलले आणि त्यांच्या आहारी गेले.

महाभारत युद्धात भीष्म व कर्णा यांचं काय चुकलं? श्रीकृष्णाने सांगितलं नेमकं कारण; वाचा

सावधगिरी बाळगा. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊ नका, असे स्वामी नेहमी सांगत. मात्र, स्वामींची ही शिकवण गणपतीबुवा विसरले. कालांतराने गणपतीबुवांचा मुलगा अकस्मात आजारी पडला. कृष्णास्वामीवर अगाध श्रद्धा असल्याने गणपतीबुवांनी मुलाला वैद्यांकडेही नेले नाही. एकदा कृष्णास्वामीचे प्रबोधन सुरू असताना स्वामी समर्थ तिथे गेले. आपल्यासमोर स्वामी काहीच नाही, असा आविर्भाव मिरवत स्वामींचा अपमान केला जातो. स्वामींनी आपल्याशी शास्त्रार्थ करावे, असे आव्हान कृष्णास्वामी देतात. मात्र, स्वामी एकही शब्द न बोलता तेथून निघून जातात.

गावकरी कृष्णास्वामीचा जयजयकार करतात. हा सर्व प्रकार पाहून गणपतीबुवाची कृष्णास्वामीवरची श्रद्धा वाढते. यानंतर, तुम्ही मला धन, संपदा दान करा. त्याबदल्यात तुम्हाला दुप्पट धनप्राप्ती होईल, असे कृष्णास्वामी सांगत फिरू लागतात. दुसरीकडे काही केल्या गणपतीबुवाच्या मुलाचा आजार बरा होत नाही. उलट परिस्थिती गंभीर बनते. चोळप्पा कळकळीनी त्यांना मुलाला स्वामींकडे नेण्याची विनंती करतात. मात्र, ते काहीही ऐकत नाहीत. तेवढ्यात स्वामी समर्थ महाराज तेथे येतात. 

सुखमय, समृद्ध जीवनासाठी गौतम बुद्धांच्या ‘या’ ५ गोष्टींचे आचरण आवश्यक

स्वामी गणपतीबुवांवर चिडतात आणि म्हणतात की, अरे माणसा, अजून तुला अक्कल आलेली नाही. इतके अनुभव घेऊनही चांगल्या-वाईटाची पारख तुला कशी येत नाही. डोळे बंद करून असा कुणावर कसा विश्वास ठेवतोस? तरीही, गणपतीबुवा काही ऐकायला तयार नसतात. मग स्वामी आपल्या साधनेच्या बळावर सर्व लोकांना कृष्णास्वामींची दुसरी बाजू दाखवतात. कृष्णास्वामी स्त्री शिष्यांसोबत नृत्य करतात. मद्यपान करतात आणि गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर मौज करताना दिसतात, असे सर्वांच्या दृष्टीस पडते. 

ती दृश्ये पाहून गणपतीबुवांसकट सर्व गावकऱ्यांचे डोळे खाडकन उघडतात. गणपतीबुवा स्वामींची करुणा भाकतात. स्वामींमुळे गणपतीबुवांचा मुलगाही बरा होतो. दुसरीकडे, सर्व गावकरी कृष्णास्वामीला चोप देतात. कृष्णास्वामी स्वामी महाराजांना शरण येतो आणि शरमेने मान खाली घाऊन गाव सोडतो. स्वामी पुन्हा एकदा उपस्थित गावकऱ्यांना उपदेश करतात की, श्रद्धा जरूर ठेवा. पण अंधश्रद्धा ठेऊ नका.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी