शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ महाराजांची शिकवण : खरी भक्ती म्हणजे नेमके काय? वाचा

By देवेश फडके | Updated: February 4, 2021 15:47 IST

एका प्रसंगात खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याची शिकवण स्वामींनी दिली.

स्वामी समर्थ महाराजांना ब्रह्मांडनायक असे संबोधले जाते. अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्षे होते. या कालावधीत स्वामींनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्वरनिष्ठांची ओळख करून दिली. दुष्टांना सुष्ट बनविले. जगात सद्‌धर्म, सुसंस्कृती अन्‌ भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या, असे म्हटले जाते. एका प्रसंगात खरी भक्ती म्हणजे नेमके काय? याची शिकवण स्वामींनी दिली.

स्वामी विश्राम करत असताना, बाळप्पा त्यांची सेवा करत होते. तेवढ्यात स्वामींनी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी केली. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारला. बाळप्पांनी प्रांजळपणे स्वामींनाच त्याचे उत्तर द्यायला विनविले. स्वामी म्हणाले की, भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून, ईश्वराचे असे मानून, तन, मन आणि धन आदींनी केलेले समर्पण म्हणजे भक्ती.

ज्यावेळी सगळे प्रयत्न संपतात, तेव्हा देवावर भार टाकून निश्चिंत व्हा!

एक गोसावी एका गंभीर आजाराने ग्रस्त होता. त्यामुळे त्याच्या पोटात सदैव कळा यायच्या. पण द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन घ्यावे, अशी त्याची तीव्र इच्छा होती. मृत्युपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे, असा निश्चय गोसावी करतो. द्वारकेला जाताना रात्री स्वामी, संन्यासी रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात. काहीसा विचार करून गोसावी अक्कलकोटला येतो.

अक्कलकोटला आल्यावर गोसावी स्वामी दर्शनासाठी येतो. क्यो द्वारका जा रहे थे ना? यहा अक्कलकोट कैसे पहुचे? स्वामींच्या प्रश्नांनी गोसावी आश्चर्यचकीत होतो. गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की, हमने ही बुलाया था. खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कसे राहणार? श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात. गोसावी धन्य होतो. गोसावी म्हणतो की, माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही. मात्र, ती वेळ अजून आली नसल्याचे स्वामी त्याला सांगतात. अनन्य भाव-भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते. ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरू पूर्ण करतोच, असे स्वामी म्हणतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक