शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंह सरस्वती हेच स्वामी समर्थ; नेमकी कोणती भक्ती खरी? महाराजांनी दिले कालातीत ज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 12:53 IST

Shree Swami Samarth Maharaj Preaching: स्वामी समर्थ महाराज यांनी खरी भक्ती कोणती? याबाबत भाविकांना कालातीत ज्ञान दिले.

Shree Swami Samarth Maharaj Preaching: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' आणि 'अशक्यही शक्य करतील स्वामी' ही दोन वचने स्वामीभक्तांसाठी एखाद्या दिव्यमंत्रांशिवाय कमी नाहीत. हे दोन आश्वासक मंत्र स्वामीभक्तांचे तारणहार बनतात, अशी सर्वसामान्य स्वामीभक्तांची श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांचा भक्तपरिवार खूप मोठा आहे. अगदी ठिकठिकाणी स्वामींचे मठ स्थापन करण्यात आले आहेत. अनेक जण स्वामी समर्थांचे सकारात्मक अनुभव आल्याचे आवर्जुन सांगत असतात. स्वामी दत्तावतार मानले जातात. अनेक प्रसंगांमधून खुद्द स्वामींनीच स्वतःची ओळख सांगितली आहे. अशाच एका प्रसंगात स्वामी समर्थ महाराजांनी आपणच नृसिंह सरस्वती असल्याचे सांगितले. तसेच खरी भक्ती नेमकी कोणती, याचेही कालातीत ज्ञान दिले.

एके दिवस सर्वजण स्वामींसमोर बसले असताना अचानक स्वामींना लहर येते आणि स्वामी विचारतात की, आम्ही कोण आहोत? स्वामींच्या प्रश्नावर चोळप्पा उत्तर देतात की, आपण त्रिभुवन नायक आहात! या उत्तरावर स्वामी संतुष्ट होत नाहीत आणि चोळप्पांना उद्देशून म्हणतात की, बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते. इकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असे त्याचे मत होते. 

काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना?

अक्कलकोटला पोहोचल्यावर तत्क्षणी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात की, काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना! आम्ही कोण, याची परीक्षा घ्यायला आलात ना? स्वामींच्या प्रश्नाने पुजारी चपापतो. पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात की, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? यावर पुजारी उत्तरतो की, श्रीनृसिंहसरस्वतीची! स्वामी म्हणतात की, आम्ही नरसिंहभान आहोत! नीट बघ आम्हाला! तेथेच पुजाऱ्याला साक्षात नरसिंहसरस्वती यांचे दर्शन घडते. पुजाऱ्याला गहिवरून येते. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते की, स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत. तो स्वामीचरणी नतमस्तक ठेऊन क्षमा मागतो आणि म्हणतो की, अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे.

नेमकी कोणती भक्ती खरी? स्वामींनी भाविकांना दिले कालातीत ज्ञान

एकदा स्वामी विश्राम करत असताना, बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात. तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात की, भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून, तन, मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती.

 

टॅग्स :shree swami samarthश्री स्वामी समर्थshree datta guruदत्तगुरुspiritualअध्यात्मिक