शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

Surya Grahan 2022 : तब्ब्ल १०० वर्षांनी पिता पुत्र येणार समोरासमोर; सोबतच जुळून येणार अनेक दुर्मिळ योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:12 IST

Solar Eclipse 2022 : ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलच्या शेवटी म्हणजेच ३० एप्रिल रोजी होत आहे. हे सूर्यग्रहण खूप खास आहे, कारण शनी अमावस्याही याच दिवशी येत आहे. एवढेच नाही तर शनी अमावस्येच्या एक दिवस आधी म्हणजेच २९ एप्रिलला शनि राशी बदलत आहे, ज्याचा सूर्यग्रहणासोबतच लोकांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे. ज्योतिषांच्या मते सूर्यग्रहणाच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग घडत आहे.

हिंदू नववर्ष विक्रम संवत २०७९ ची सुरुवात चैत्र मासाने झाली. तर चैत्र मासाचा शेवट अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहणाने होत आहे. ज्योतिषांच्या मते, हिंदू नववर्ष विक्रम संवत्सराचा राजा शनि ग्रह आहे. अशा स्थितीत शनीचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याच वेळी, ३० एप्रिलला शनी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचाही योग जुळून येत आहे. शनी हा सूर्य पुत्र आहे. या दोहोंचे स्थलांतर होत होत जवळपास १०० वर्षांनंतर पिता-पुत्राची समोरासमोर भेट होत आहे. 

ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होईल. जसे की शनी किंवा हनुमानाचा जप, पूजा, दानधर्म, देव दर्शन इ...

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी दुपारी १२. १५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४.०७ पर्यंत राहील. मात्र भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी होणार नाही. ग्रहणाचे वेध १२ तास आधी लागत असल्याने या काळातही शुभ कार्य केले जात नाही. 

सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक ग्रहांचा योगायोग

अमावास्येला सूर्यग्रहण तसेच अनेक ग्रहांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. २९ एप्रिल रोजी तीस वर्षांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्याचा फायदा मेष, वृषभ आणि धनु राशीला होईल. सूर्यग्रहण मेष राशीमध्ये होत आहे आणि राहू आधीच मेष राशीत चंद्रासोबत बसला आहे. या ग्रहांच्या एकत्र येण्याने बारा राशींच्या जीवनातही अनेक बदल घडणार आहेत. काही राशींना चांगले तर काहींना या सूर्यग्रहणाचे मध्यम फळ मिळेल. यासाठीच सर्व राशींनी या काळात उचित दक्षता घेतली पाहिजे. या ग्रहण काळात महत्त्वाची कामे काही काळ लांबणीवर टाकली तर लाभ होईल. यथाशक्ती दान धर्म करावा. ग्रहण काळ पार पडला की सर्वकाही आलबेल होईल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष