शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

Surya Grahan 2022 : तब्ब्ल १०० वर्षांनी पिता पुत्र येणार समोरासमोर; सोबतच जुळून येणार अनेक दुर्मिळ योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:12 IST

Solar Eclipse 2022 : ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलच्या शेवटी म्हणजेच ३० एप्रिल रोजी होत आहे. हे सूर्यग्रहण खूप खास आहे, कारण शनी अमावस्याही याच दिवशी येत आहे. एवढेच नाही तर शनी अमावस्येच्या एक दिवस आधी म्हणजेच २९ एप्रिलला शनि राशी बदलत आहे, ज्याचा सूर्यग्रहणासोबतच लोकांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे. ज्योतिषांच्या मते सूर्यग्रहणाच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग घडत आहे.

हिंदू नववर्ष विक्रम संवत २०७९ ची सुरुवात चैत्र मासाने झाली. तर चैत्र मासाचा शेवट अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहणाने होत आहे. ज्योतिषांच्या मते, हिंदू नववर्ष विक्रम संवत्सराचा राजा शनि ग्रह आहे. अशा स्थितीत शनीचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याच वेळी, ३० एप्रिलला शनी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचाही योग जुळून येत आहे. शनी हा सूर्य पुत्र आहे. या दोहोंचे स्थलांतर होत होत जवळपास १०० वर्षांनंतर पिता-पुत्राची समोरासमोर भेट होत आहे. 

ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होईल. जसे की शनी किंवा हनुमानाचा जप, पूजा, दानधर्म, देव दर्शन इ...

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी दुपारी १२. १५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४.०७ पर्यंत राहील. मात्र भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी होणार नाही. ग्रहणाचे वेध १२ तास आधी लागत असल्याने या काळातही शुभ कार्य केले जात नाही. 

सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक ग्रहांचा योगायोग

अमावास्येला सूर्यग्रहण तसेच अनेक ग्रहांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. २९ एप्रिल रोजी तीस वर्षांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्याचा फायदा मेष, वृषभ आणि धनु राशीला होईल. सूर्यग्रहण मेष राशीमध्ये होत आहे आणि राहू आधीच मेष राशीत चंद्रासोबत बसला आहे. या ग्रहांच्या एकत्र येण्याने बारा राशींच्या जीवनातही अनेक बदल घडणार आहेत. काही राशींना चांगले तर काहींना या सूर्यग्रहणाचे मध्यम फळ मिळेल. यासाठीच सर्व राशींनी या काळात उचित दक्षता घेतली पाहिजे. या ग्रहण काळात महत्त्वाची कामे काही काळ लांबणीवर टाकली तर लाभ होईल. यथाशक्ती दान धर्म करावा. ग्रहण काळ पार पडला की सर्वकाही आलबेल होईल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष