शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

Surya Grahan 2022 : तब्ब्ल १०० वर्षांनी पिता पुत्र येणार समोरासमोर; सोबतच जुळून येणार अनेक दुर्मिळ योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 17:12 IST

Solar Eclipse 2022 : ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत.

या वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलच्या शेवटी म्हणजेच ३० एप्रिल रोजी होत आहे. हे सूर्यग्रहण खूप खास आहे, कारण शनी अमावस्याही याच दिवशी येत आहे. एवढेच नाही तर शनी अमावस्येच्या एक दिवस आधी म्हणजेच २९ एप्रिलला शनि राशी बदलत आहे, ज्याचा सूर्यग्रहणासोबतच लोकांच्या जीवनावरही परिणाम होणार आहे. ज्योतिषांच्या मते सूर्यग्रहणाच्या दिवशी एक अत्यंत दुर्मिळ योग घडत आहे.

हिंदू नववर्ष विक्रम संवत २०७९ ची सुरुवात चैत्र मासाने झाली. तर चैत्र मासाचा शेवट अमावस्येच्या दिवशी सूर्य ग्रहणाने होत आहे. ज्योतिषांच्या मते, हिंदू नववर्ष विक्रम संवत्सराचा राजा शनि ग्रह आहे. अशा स्थितीत शनीचा मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याच वेळी, ३० एप्रिलला शनी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचाही योग जुळून येत आहे. शनी हा सूर्य पुत्र आहे. या दोहोंचे स्थलांतर होत होत जवळपास १०० वर्षांनंतर पिता-पुत्राची समोरासमोर भेट होत आहे. 

ज्योतिषांच्या मते, पिता पुत्राची ही भेट अनेक राशींसाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडे साती आणि प्रभाव आहे त्यांनी शनी अमावस्येच्या दिवशी काही ज्योतिषीय उपाय अवश्य करावेत. त्यामुळे शनीचा अशुभ प्रभाव बऱ्याच अंशी कमी होईल. जसे की शनी किंवा हनुमानाचा जप, पूजा, दानधर्म, देव दर्शन इ...

वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी दुपारी १२. १५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४.०७ पर्यंत राहील. मात्र भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी होणार नाही. ग्रहणाचे वेध १२ तास आधी लागत असल्याने या काळातही शुभ कार्य केले जात नाही. 

सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक ग्रहांचा योगायोग

अमावास्येला सूर्यग्रहण तसेच अनेक ग्रहांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. २९ एप्रिल रोजी तीस वर्षांनी शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. त्याचा फायदा मेष, वृषभ आणि धनु राशीला होईल. सूर्यग्रहण मेष राशीमध्ये होत आहे आणि राहू आधीच मेष राशीत चंद्रासोबत बसला आहे. या ग्रहांच्या एकत्र येण्याने बारा राशींच्या जीवनातही अनेक बदल घडणार आहेत. काही राशींना चांगले तर काहींना या सूर्यग्रहणाचे मध्यम फळ मिळेल. यासाठीच सर्व राशींनी या काळात उचित दक्षता घेतली पाहिजे. या ग्रहण काळात महत्त्वाची कामे काही काळ लांबणीवर टाकली तर लाभ होईल. यथाशक्ती दान धर्म करावा. ग्रहण काळ पार पडला की सर्वकाही आलबेल होईल. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष