शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

ऐतखाऊ गिधाडाची गोष्ट शिकवेल आयुष्यभराचा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 13:37 IST

आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे.

गिधाडांची प्रजाती आता दुर्मिळ होत चालली आहे. शहरी भागात तर त्यांचे दर्शन सहसा होत नाहीच. मात्र एकदा जंगलात राहणारा गिधाडांचा एक समूह जंगलतोड होऊ लागल्याने उडत उडत एका निर्मनुष्य बेटावर पोहोचला. ते बेट निर्मनुष्य असले, तरी सागरी जीव, वन्य जीव तिथे मुबलक प्रमाणात होते. गिधाडांनी विचार केला काही काळ इथेच मुक्काम करू. 

जेवणाची, राहण्याची उत्तम सोय झाल्याने गिधाडं त्या वातावरणाला सरावली. त्यांच्यातल्या तरुण गिधाडांनी तर आमरण इथेच राहायचे असा संकल्प केला. तेव्हा बुजुर्ग गिधाड म्हणाले, तशी चूक कदापिही करू नका. आज इथे आयते अन्न मिळत आहे, भविष्यात मनुष्याने इथेही अतिक्रमण केले तर कुठे जाल?'त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऐतखाऊ तरुण गिधाड जनावरांच्या मांसाचे लचके तोडत होते. 

काही काळाने बुजुर्ग गिधाडाने मुक्काम हलवायचा ठरवला. त्याच्याबरोबर दोन चार जुने साथीदार आले. त्यांना आपल्या प्रजातीची काळजी वाटू लागली. आपण आयुष्यभर कष्ट करून, अन्न शोधून आपली उपजीविका भागवली, पण या तरुणांना सगळे आयते मिळत राहिले तर यांना कठीण प्रसंगाची जाणीव कशी होणार? ते स्वत्व गमावून बसतील आणि सुस्त होऊन निकामी होतील. परंतु समजूत काढूनही कोणी त्यांची साथ न दिल्याने उरलेली गिधाडे बेटावर राहिली, बाकीची दुसऱ्या जंगलात निघून गेली.

 

काही काळाने आपल्या नातलगांच्या भेटीने बुजुर्ग गिधाडे बेटावर परत आली. तिथे पाहतो तर काय आश्चर्य? जवळपास सगळी गिधाडे मरणासन्न अवस्थेत पडली होती. त्यांची विचारपूस केली असता, जीर्ण आवाजात तो तरुण गिधाड म्हणाला, 'आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमचे ऐकले नाही त्याची शिक्षा आज भोगत आहोत. तुम्ही सांगीतल्या नुसार एकदिवस एक जहाज या बेटावर आले आणि त्या जहाजातून बिबटे सोडण्यात आले. त्यांनी इथले सगळे जीव खाऊन पोटं भरली आणि आम्ही उडण्याची क्षमता गमावून बसलो आहोत, प्रतीवर करण्याची आमच्यात ताकद राहिलेली नाही हे ओळखून त्यांनी आमच्यावरही वार केला.'

बुजुर्ग गिधाडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणाच्या लोभापायी ही गिधाडं ऐन तारुण्यात आपला आनंद गमावून बसली. आपली प्रजाती नष्ट झाली. ऐतखाऊपणा यांना नडला! आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. तसेच एकाच ठिकाणी चिकटून न बसता नवनवे अनुभव घेत आयुष्य समृद्ध केले पाहिजे.