शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ऐतखाऊ गिधाडाची गोष्ट शिकवेल आयुष्यभराचा धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 13:37 IST

आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे.

गिधाडांची प्रजाती आता दुर्मिळ होत चालली आहे. शहरी भागात तर त्यांचे दर्शन सहसा होत नाहीच. मात्र एकदा जंगलात राहणारा गिधाडांचा एक समूह जंगलतोड होऊ लागल्याने उडत उडत एका निर्मनुष्य बेटावर पोहोचला. ते बेट निर्मनुष्य असले, तरी सागरी जीव, वन्य जीव तिथे मुबलक प्रमाणात होते. गिधाडांनी विचार केला काही काळ इथेच मुक्काम करू. 

जेवणाची, राहण्याची उत्तम सोय झाल्याने गिधाडं त्या वातावरणाला सरावली. त्यांच्यातल्या तरुण गिधाडांनी तर आमरण इथेच राहायचे असा संकल्प केला. तेव्हा बुजुर्ग गिधाड म्हणाले, तशी चूक कदापिही करू नका. आज इथे आयते अन्न मिळत आहे, भविष्यात मनुष्याने इथेही अतिक्रमण केले तर कुठे जाल?'त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ऐतखाऊ तरुण गिधाड जनावरांच्या मांसाचे लचके तोडत होते. 

काही काळाने बुजुर्ग गिधाडाने मुक्काम हलवायचा ठरवला. त्याच्याबरोबर दोन चार जुने साथीदार आले. त्यांना आपल्या प्रजातीची काळजी वाटू लागली. आपण आयुष्यभर कष्ट करून, अन्न शोधून आपली उपजीविका भागवली, पण या तरुणांना सगळे आयते मिळत राहिले तर यांना कठीण प्रसंगाची जाणीव कशी होणार? ते स्वत्व गमावून बसतील आणि सुस्त होऊन निकामी होतील. परंतु समजूत काढूनही कोणी त्यांची साथ न दिल्याने उरलेली गिधाडे बेटावर राहिली, बाकीची दुसऱ्या जंगलात निघून गेली.

 

काही काळाने आपल्या नातलगांच्या भेटीने बुजुर्ग गिधाडे बेटावर परत आली. तिथे पाहतो तर काय आश्चर्य? जवळपास सगळी गिधाडे मरणासन्न अवस्थेत पडली होती. त्यांची विचारपूस केली असता, जीर्ण आवाजात तो तरुण गिधाड म्हणाला, 'आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमचे ऐकले नाही त्याची शिक्षा आज भोगत आहोत. तुम्ही सांगीतल्या नुसार एकदिवस एक जहाज या बेटावर आले आणि त्या जहाजातून बिबटे सोडण्यात आले. त्यांनी इथले सगळे जीव खाऊन पोटं भरली आणि आम्ही उडण्याची क्षमता गमावून बसलो आहोत, प्रतीवर करण्याची आमच्यात ताकद राहिलेली नाही हे ओळखून त्यांनी आमच्यावरही वार केला.'

बुजुर्ग गिधाडाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षणाच्या लोभापायी ही गिधाडं ऐन तारुण्यात आपला आनंद गमावून बसली. आपली प्रजाती नष्ट झाली. ऐतखाऊपणा यांना नडला! आयुष्यात केवळ सुख उपभोगत राहिलात तर दुःखाची झळ सहन करायची ताकद राहणार नाही. म्हणून प्रत्येक जिवाने हर तऱ्हेच्या परिस्थितीत न डगमगडता परिस्थितीचा सामना करायला शिकले पाहिजे. तसेच एकाच ठिकाणी चिकटून न बसता नवनवे अनुभव घेत आयुष्य समृद्ध केले पाहिजे.