शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

'स्माईल प्लिज' हे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात करा; सदिच्छा आपोआप मिळतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:07 IST

आनंद दिल्याने वाढतो असे म्हणतात; अनुभूती घेऊन तर बघा!

आपण केवळ कुठून काय, कधी मिळेल याचा सतत विचार करत असतो. त्यामुळे कुठे, कधी, काय द्यायचे हा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. कारण आपल्याला घेण्याची सवय लागलेली आहे, देण्याची नाही. दिल्याने गोष्टी कमी होतात आणि घेतल्याने वाढतात, एवढाच हिशोब आपल्याला माहित असतो. परंतु अशा दोन गोष्टी आहेत, ज्या दिल्याने वाढतात. त्याचा वापर आपण कधी केलाय का? त्या दोन गोष्टी म्हणजे सुहास्य आणि सदिच्छा! या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असतात पण आपण त्याचा वापर करत नाही. या दोन्ही गोष्टीची जगाला गरज आहे. कधी देऊन तर बघा, मोबदल्यात किती आनंद मिळतो ते कळेल!

एकदा एका बांधकामाच्या ठिकाणी अभियंता देखरेख ठेवत होता. काम सुरळीत चालले होते. अशातच त्या धुळीने माखलेल्या परिसरात एक बालमूर्ती डोक्यावर वीटांचा भार वाहून नेत होती. अभियंत्याने हाक मारून त्या मुलाला जवळ बोलावले. त्याला कोणी कामावर ठेवले म्हणून विचारणा केली. मुलगा घाबरला, तो हात जोडून म्हणाला, `मीच ठेकेदाराच्या हातापाया पडून हे काम मिळवले आहे, माझे काम काढून घेऊ नका.'

अभियंता म्हणाला, `बालमजरांकडून काम करून घेणे हा गुन्हा आहे. तुझे वय काम करण्याचे नाही, शाळेत जाण्याचे आहे. तू शाळेत जात नाहीस का? तुझ्या वडिलांनी तुला कामाला जा सांगितले का?'

मुलगा म्हणाला, `नाही, माझ्या आई वडिलांनी मला शाळेत पाठवले होते. तिथे खिचडी मिळते म्हणून. पण त्याने फक्त माझे एकट्याचे पोट भरले असते. ते दोघे उपाशी राहिले असते. म्हणून शाळेत न जाता मी इथे कामाला आलो. रोजंदारी मिळाली, तर आई वडिलांचेही पोट भरू शकेन.''तुझे वडील काम करत नाहीत का?'- अभियंता म्हणाला.'करतात ना, इथे तेच काम करत होते. परंतु गेल्या आठवड्यात सामानाची ने आण करताना अपघात झाला आणि त्यांचा पाय जखमी झाला. त्यामुळे ते कामाला येऊ शकले नाहीत आणि आमच्या घराचे अन्न पाणी बंद झाले. म्हणून मी कामावर आलो.'

मुलाचे बोल ऐकून अभियंत्याला आपले बालपण आठवले आणि कष्ट करून इथवर केलेला प्रवास आठवला. अभियंता म्हणाला, `तुला पाढे पाठ आहेत? कितीपर्यंत येतात? मला लिहून दाखवशील?' 

मुलगा हुशार होता. हो म्हणत लगेच त्याने कागद पेन्सिल घेऊन पंधरा पर्यंतचे पाढे स्वच्छ हस्ताक्षरात लिहून दाखवले. ते पाहून अभियंत्याने त्याची पाठ थोपटली आणि ठेकेदाराला बोलावून घेत पंधरा दिवसांचा पगार मुलाला द्यायला लावला. तसेच त्याच्या वडिलांच्या उपचाराची जबाबदारीही घ्यायला सांगितली. अभियंता मुलाला म्हणाला, 'बाळा, ही तुझी रोजंदारी नाही, तर हा पगार आहे. जो शिक्षण पूर्ण करून नोकरी केल्यावर मिळतो. तू इमानदारीने आणि हुशारीने पंधरा पाढे लिहिले, त्याचा पंधरा दिवसांचा पगार. पुढच्या पंधरा दिवसात १६-३० पाढे पाठ करून ये आणि आणखी पंधरा दिवसांचा पगार घेऊन जा. तोवर तुझे वडील बरे होतील आणि तुला मजुरी न करता शाळेत जाता येईल. तुझी खरी जागा शाळेत आहे. मेहनत घ्यायची तर शिक्षणात घे, बाकी गोष्टी आपोआप मिळतील. भविष्यात तूही माझ्यासारखा अभियंता होशील आणि दुसऱ्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व समजवून सांगशील.'

मुलगा आनंदाने घरी गेला. त्याचे आयुष्य सावरता आले, याचा अभियंत्याला आनंद झाला. त्याने एकाच वेळी सुहास्य आणि सदिच्छा यांची भेट देऊन मुलाला सन्मार्गाला लावले. तेच काम आपल्यालाही कोणाच्या बाबतीत करता आले तर किती बरे होईल ना?