शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

भक्तीमुळेच आध्यात्मिक उन्नती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:55 IST

देव मानले तर महान पण अदृश्य शक्ती आहे, त्याचे तरंग आपल्या कमार्नुसार चांगले- वाईट परिणाम देत असतात.

मन:शांती बरोबरच मन:शक्ती वाढविण्यासाठी आध्यात्माचा मार्ग उपयोगी पडू शकतो. सुखात असो वा दु:खात आपण आपल्या श्रद्धा असलेल्या देवी- देवतांच्या अधीन होतो, आणि सर्वकाही त्याला अर्पण करतो. ही श्रद्धा, ही भक्ती व्यक्तीला अधिक उन्नत होण्यास नक्कीच मदत करत असते. तसेच निस्वार्थपणे आणि श्रद्धेने केलेले नामस्मरण आपल्या आयुष्याचा हा भवसागर तरून जाण्यास साह्य  करते. आयुष्य म्हटले की चढउतार हे आलेच. कधी हा चढउताराचा झोका आकाशाच्या उंचीवर घेऊन जातो, तर कधी अगदी स्वत:ला स्वत:च्याही नजरेतून उतरवतो. या यशापयशाला, मानापमानांना समोर जाण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. कुणी जीवनातील बदलांना धीराने समोर जातात, तर कोणी एखाद्या छोट्याशा धक्क्यानेदेखील कोसळतात. म्हणून मनुष्यजन्म पार करण्यासाठी शरीराच्या सोबत मनाचे सशक्तीकरण आवश्यक आहे. ते साधण्यासाठी आपल्याकडे प्रार्थना, पूजापाठ, स्तोत्र पठण इत्यादी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. नियोजित काम उत्तम पद्धतीने पार पाडणे ही एक प्रकारची देवपूजा आहे.  देव मानले तर महान पण अदृश्य शक्ती आहे, त्याचे तरंग आपल्या कमार्नुसार चांगले- वाईट परिणाम देत असतात. म्हणून चुकीच्या अथवा स्वार्थी श्रद्धेने केलेली भक्ती आपल्याला जन्माची अद्दल घडवू शकते. म्हणून भक्ती, श्रद्धा शुद्ध आणि प्रामाणिक असायला हवी.आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो. पशुपक्षी वनस्पती यांना या आनंदाची जाणीव नसते. परिचय नसतो. पण मानवाच्या बाबतीत आनंद मिळवणं, आनंदात राहणं, आनंदी असणं झ्र जगणं हा त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. यासाठी बाहेरचे प्रयत्न नकोत. आतूनच सागराच्या लाटांसारखा सर्वकाळ हेलावणारा आनंद ज्यानं त्यानं आतच उपभोगायचा असतो. मन:शांतीचा मार्ग मनाकडून  मनातून शांतीकडे जातो.  आनंद हे परमेश्वराचं स्वरूप आहे. आनंद हा कशावरही अवलंबून नसतो. म्हणजेच तो निरालंब असतो. स्वयंभू असतो.  आनंद प्रत्येकाच्या अंतरंगात असतो.

- वेदांताचार्य राधेराधे महाराजबर्डेश्वर संस्थान, तरवाडी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक