शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Somvati Amavasya 2022: भयकथांमध्ये अमावस्येचीच रात्र का निवडली जाते? ती रात्र खरोखरच अशुभ असते का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 14:36 IST

Somvati Amavasya 2022: अनेकदा आपण वाचतो, भयकथेची सुरुवात अमावस्येच्या रात्रीने होते. एवढे काय गूढ त्या रात्रीत दडले असते ते जाणून घ्या!

अमावस्या या तिथीला अनेक जण अशुभ मानतात. उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही. निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो. जगण्याला उम्मेद देतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो, तसा बीजेचा चंद्र शीतल वाटतो. अमावस्येला तो नाहीसा होतो. कलेकलेलने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवालासुद्धा आहे, हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवते! 

ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही. मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात. सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र ही स्थिती देखील फार काळात राहत नाही. कलेकलेने चन्द्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसा होतो, तसेच मनुष्याचेही होते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून आल्यानंतरही ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे. 

सूर्याच्या अनुपस्थितीत चन्द्र पृथ्वीला प्रकाश देण्याचे काम करतो. सूर्य दिवस- रात्र तळपत राहिला असता तर आपल्याला जगणे असह्य झाले असते. सूर्य-चन्द्र दोघेही महत्त्वाचे. सुदैवाने आपल्या देशातून दोहोंचे नियोजित वेळी दर्शन होते. ज्या देशांमध्ये सहा सहा महिने सूर्यदर्शनच होत नाही, त्यांची स्थिती विचारा! त्यामुळे सूर्याची प्रखरता जेवढी महत्त्वाची तेवढीच चंद्राची शीतलताही महत्त्वाची! सुर्याइतके तेज नसले तरी चंद्राचे येणे हवेहवेसे वाटते. त्याच्या उगवण्याने सकल जीवांना काही काळ शांतता लाभते. रात्रीच्या अंधारात चंद्राचे शीतल चांदणे पथदर्शक ठरते. मात्र अमावस्येच्या रात्री मिट्ट अंधारात पाऊल टाकणे भयावह वाटते. ती भयाण रात्र कोणत्याही विपरीत घटनांशिवाय पार पडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी अमावस्येच्या रात्री धार्मिक कृत्यांचा आग्रह धरला आहे. त्यानिमित्ताने जागृत राहणे हे अपेक्षित असते.

 

आता सर्वत्र वीज आल्याने पौर्णिमा- अमावस्या आपल्याला सारख्या वाटतात. मात्र ग्रामीण भागात आजही लोक निसर्गचक्रावर विसंबून आहेत. एवढेच काय तर शहरी माणसाचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निसर्गाशी संबंध येतच असतो. चंद्राच्या तिथीवर समुद्राची भरती ओहोटी अवलंबून असते आणि एवढेच काय तर महिलांचे निसर्ग चक्र, मानसिक स्थिती यांचाही चन्द्र तिथीशी घनिष्ट संबंध असतो. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्नवदनीं असणारी गृहिणी अमावस्येला चिडचिडी, रागीट, भांडखोर असल्यासारखी जाणवते, ते निसर्ग चक्रामुळेच! प्रकृती आणि स्त्री यांचा जवळचा संबंध असल्याने निसर्गाचे पडसाद स्त्री मनावर चटकन उमटतात. या सर्व गोष्टी भौगोलिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत. म्हणून धर्मानेही त्यांना अनुष्ठान दिले आहे. 

म्हणून अमावस्येला अशुभ न मानता, त्या रात्री सूर्य आणि चन्द्राच्या अनुपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल यादृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे. तसेच अमावस्येच्या तिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधःकारावर प्रकाश टाकला पाहिजे!