शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 11:18 IST

Solar Eclipse 2024: चंद्र ग्रहण असो नाहीतर सूर्यग्रहण मानवासकट पूर्ण सृष्टीवर त्याचे परिणाम दिसून येतात, अशा वेळी काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या. 

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

पत्रिकेतील समस्या आपल्याला समजते पण ती नक्की कशामुळे निर्माण झाली आहे हे समजणे महत्वाचे आहे. अनेकदा त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला खूप मागे जावे लागते . अनेकदा संततीचे प्रश्न घेवून पालक येतात . मुल ऐकत नाही , खूप त्रास देते किंवा विचित्र वागते , अभ्यास करत नाही , घरात वस्तूंची अगदी राग आला की आदळ आपट सुद्धा करते , अश्या मुलांना समजून घेता घेता पालक आजारी पडण्याची वेळ येते पण मुले ऐकत नाहीत . 

अशावेळी मुल जन्माला आले त्याच्या आधी ९ महिने म्हणजे गर्भधारणा झाली त्यावेळी कुठली कुठली ग्रहणे झाली ते बघितले तर आपले उत्तर मिळते . गर्भधारणा झाली त्यावेळी किंवा त्याच्या आसपास चंद्र सूर्य ग्रहणे असतील तर मातेच्या गर्भावर त्याचा परिणाम होतो , म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी ग्रहण बघू नये , बाहेर जाऊ नये असे शास्त्र सांगते . पण आपण उच्च शिक्षित लोक ह्याच शास्त्राला नाव ठेवतो . विज्ञान कितीही पुढे जाऊदे , शास्त्र त्याच्या जागी आहेच आणि ग्रहांचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम कुणीही थांबवू शकत नाही ते होतच राहणार . सूर्य उगवायचा तो उगवणारच आहे.  

ग्रहणामुळे होणारे परिणाम : 

ऑक्टोबर च्या २ तारखेला हस्त नक्षत्रात सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) होत आहे . ग्रहण रात्री ९ वाजून १३ मिनिटापासून पहाटे ३ वाजून १७ मिनिटापर्यंत असणार आहे . ही एक खगोलीय घटना आहे . हे ग्रहण भारतात जरी दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव असणार आहेच .  ग्रहण म्हणजे घेणे .ग्रहण हे अध्यात्मिक दृष्टीने चांगले असते. चंद्राच्या हस्त नक्षत्रात हे ग्रहण होत आहे . ज्यांची बुध किंवा चंद्राची दशा चालू आहे किंवा दशा स्वामी ह्या नक्षत्रात असेल तर त्यांनी अधिक उपासना करावी . चंद्र सूर्याची ताकद ग्रहण काळात कमी होते .  रोजच्या जीवनात कामात अडथळे अचानक निर्माण होतात . राहू हा तामसिक ग्रह असून सत्तेत उलथा पालथ करण्यास सुद्धा अती सामर्थ्यवान आहे.  राहूच्या मनमानी समोर कुणाचेही चालत नाही. कन्या राशीत चंद्र रवी बुध आणि केतू समोर मिनेतील राहू आहे. चंद्र मनाचा तर रवी आत्म्याचा कारक आहे. ह्या दोघांची क्षमता कमी होते ती ग्रहण काळात . सोबत बुद्धीचा कारक बुध आणि केतू जो सगळ्या ग्रहांची ताकद काढून त्यांचा शुष्क करणार आहे . शरीरातील हाडे , दृष्टी आणि पित्ताशय , पचनसंस्था  ह्यावर रवीचा अंमल आहे त्यामुळे ह्यासंबंधी काळजी घेणे आवश्यक आहे. तब्येत सांभाळ आणि आहार विहार सुद्धा सांभाळा. वाचेवर , शब्दांवर नियंत्रण ठेवा. बुध हा संवादाचा कारक आहे म्हणून बोलणे कमी असलेले उत्तम .

ग्रहणकाळातील उपाय :

ह्या काळात नामस्मरण हा एकमेव उपाय आहे . सूर्य आपली उजवी नाडी म्हणजे पिंगला तर चंद्र डावी इडा वर अंमल करतो , अमावास्येला सुषुम्ना चालू असते म्हणून अध्यात्मिकता वाढवा . सूर्य म्हणजेच रवी हा अग्नि तत्वाचा ग्रह आहे. रवी हा राजा आहे आणि त्याला थोडा अहंकार असतोच . त्यालाच आपलयाला जपायचे आहे , अहंकार खिशात ठेवा , वादात पडू नका . नवीन काम सुरु करू नका . ग्रहणात पित्त होते म्हणून गुळ खावा . गुळ गहू  दान करा , कुणाला ? चतुर्थ श्रेणीतील लोकांना करा.  आपला नेहमीचा जप नित्य करत राहा. 

संपर्क : 8104639230

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणAstrologyफलज्योतिष