शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून आजही सणासुदीला केळीच्याच पानावर जेवण्याचा आग्रह धरला जातो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 12:26 IST

शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या पानांना अतिशय महत्त्व होते. मात्र आता पाने घेतो म्हटल्यावर ताटं वाट्या किंवा प्लास्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु, जो स्वाद आणि पोषणमूल्य पानांमध्ये आहे, तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू. 

जेवण झाले का? हा समाज माध्यमांवर गाजलेला प्रश्न! परंतु ही चौकशी म्हणजे केवळ औपचारिक संभाषणाची सुरुवात. मात्र, पूर्वीच्या काळी अतिथीला आपुलकीने हा प्रश्न विचारला जाई किंबहुना जेवूनच पाठवले जात असे. स्वयंपाक झाला, की लगोलग पाने घेतली जात. ही पाने कोणती? तर केळीची! कारण, दारोदारी केळीचे झाड असल्यामुळे दोन्हीवेळचे जेवण केळीच्या पानावर किंवा पत्रावळींवर होत असे. शास्त्रीयदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या या पानांना अतिशय महत्त्व होते. मात्र आता पाने घेतो म्हटल्यावर ताटं वाट्या किंवा प्लास्टिक प्लेट्स घेतल्या जातात. परंतु, जो स्वाद आणि पोषणमूल्य पानांमध्ये आहे, तो कचकड्याच्या भांड्यांमध्ये नाही, हे आपणही मान्य करू. 

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात. केळीच्या पानांवर जेवल्यास त्वचेच्या समस्या दूर होतात. केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात. त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.

केळीच्या पानावर जेवण ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचेही पोट भरते व कचऱ्याच्या ढिगाला आळा घालता येतो. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. 

काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अनेक पदार्थ अत्यंत चविष्ट लागतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. परदेशातील भारतीय उपहारगृहात विशेषकरून केळीच्या पानावर पारंपरिक जेवण वाढले जाते व त्यास पसंतीही मिळते. म्हणून शक्य तेव्हा आपणही केळीच्या पानावर जेवावे आणि जेवणाआधी हे दान पदरात टाकणाऱ्या ईश्वराचे आठवणीने स्मरण करावे.