शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उत्तराखंड येथील एका छोट्याशा गावात आजही कौरव-पांडवांचे वंशज असल्याचे म्हटले जाते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 19:31 IST

या गावाला पौराणिक इतिहास असल्यामुळे गावात महाभारतकालीन प्रसंगाशी संबंध सांगणारे उत्सव साजरे केले जातात.

उत्तराखंड ही देवभूमी म्हणून ओळखली जाते. तिथले निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची बारमाही रीघ लागलेली असते. तेथील एक छोटेसे गाव रामायण आणि महाभारताशी संबंधित आहे. एवढेच नाही तर तिथे आजही कौरव पांडवांचे वंशज राहतात असे म्हटले जाते. अशा गावी भेट द्यायला आपल्यापैकी प्रत्येकाला नक्कीच आवडेल, हो ना ? चला त्या गावाबद्दल अधिक जाणून घेऊया. 

उत्तराखंडच्या गढवाल येथे कलाप नावाचे गाव आहे. हे गाव इतर शहरी विभागापासून अलिप्त आहे. तिथे मानववस्तीदेखील विरळ आहे. त्यामुळे हे गाव पर्यटकांना फारसे परिचित नाही. परंतु हे गाव अनेक पौराणिक घटनांशी जोडलेले आहे. कलाप गाव एका लांब रुंद पसरलेल्या घाटात स्थित आहे. असे म्हणतात, की हे गाव महाभारताची जन्मभूमी आहे. एवढेच नाही तर या गावाशी रामायणाचाही संबंध आला होता असे म्हणतात. म्हणून इथले गावकरी आजही स्वतःला कौरव आणि पांडव यांचे वंशज असल्याचे सांगतात. 

या गावात आजही आधुनिक सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांचा उदर निर्वाह गावातले उद्योग धंदे यावर चालतो. अशा परिस्थितीमुळे हे गाव एकविसाव्या शतकातले वाटत नाही, तर ते पुराणकाळातलेच वाटते. परंतु, याच गोष्टीमुळे तेथील निसर्ग सौंदर्य अबाधित राहिले आहे. म्हणून पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने त्या गावापर्यंत दळणवळणाच्या सोयी सुविधा वाढवण्याचा पर्यटन क्षेत्राचा प्रयत्न सुरू आहे. 

या गावाला पौराणिक इतिहास असल्यामुळे गावात महाभारतकालीन प्रसंगाशी संबंध सांगणारे उत्सव साजरे केले जातात. तिथे दर दहा वर्षांनी महारथी कर्ण याचा उत्सव केला जातो. तसेच जानेवारीत पांडव नृत्याचा सोहळा होतो. महाभारत व रामायण कथांमधील विविध प्रसंग नाट्यरूपात सादर केले जातात. उत्सवाच्या वेळी तिथे गव्हाची कणिक आणि गूळ घातलेला गोड पदार्थ बनवला जातो. 

हे सर्व वर्णन वाचल्यावर तुम्हालाही तिथे जाण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले असेल ना? तर तिथे कसे जायचे पहा. कलाप दिल्ली पासून ५४० किमी दूर आहे. तर डेहरादून येथून २१० किमी दूर आहे. इथे वर्षभरात कधीही जाऊ शकता. तेथील हिमवृष्टीचा सोहळा अतिशय नयनरम्य असतो.