शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

शनीवर पाय ठेवून बसणे रावणाला पडले महाग; सत्ता-संपत्ती गेली आणि जीवही गेला; वाचा तो प्रसंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:18 IST

पौराणिक कथांकडे रूपक कथा म्हणून पाहिले तरी त्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे; वानगीदाखल ही कथा पहा. 

शनी देवाकडे प्रत्यक्ष न पाहता किंवा थेट समोर उभे न राहता बाजूला उभे राहून त्याची पूजा करावी असे म्हणतात. कारण त्याची वक्र दृष्टी पडली, की भल्याभल्यांची अवस्था पालटते. अर्थात तो अकारण शिक्षा करणारा देव नाही. जे चुका करतात त्यांना शिकवणारे शिक्षक असा शनी देवाचा खाक्या आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सहसा कोणी वर नजर करून पाहत नाही. त्यांना घाबरून असतात. एवढेच काय तर कुंडलीत आपल्या राशीला शनी देव आले या विचारानेही अनेक जण गर्भगळीत होतात. मात्र जे लोक प्रामाणिकपणे वागतात, विनम्रतेने सेवा करतात, दान धर्म करतात, दुसऱ्यांची मदत करतात अशा लोकांना शनी देव कधीच त्रास देत नाहीत, याउलट उन्मत्त झालेल्या लोकांना ते सोडतही नाहीत. त्यांच्याबद्दल अशीच एक पौराणिक कथा सांगितली जाते ती रामायणकाळातली. 

रावण हा हुशार, विद्वान, शंकर भक्त आणि शूरवीर असूनसुद्धा अहंकाराने उन्मत्त बनलेला होता. शनीचा आणि इतर ग्रहांचा पराभव केल्यावर त्यांना उलटे झोपवून त्याच्यावर पाय ठेऊन तो कायम सिंहासनावर बसलेला असे. 

एकदा नारद रावणाच्या भेटीला आले असता त्यांनी या ग्रहांची दशा बघितली, आणि विशेषत: शनीला ते म्हणाले, 'काय रे, इतरांना धडे देतोस, जाब विचारतोस  आणि इथे रावणापुढे का  नांगी टाकून बसला आहेस?'

त्यावर शनी नारदाला म्हणतात, 'मी पालथा असल्याने रावणावर माझी दृष्टी पडत नाहीये. काही तरी करा आणि मला उपडे झोपावा. मग माझी दृष्टी रावणावर पडली की मजा बघा. '

मग नारद रावणाकडे जाऊन  त्याला म्हणतात, अरे तू या  ग्रहांच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर बसतोस हे ठीक आहे, पण खरी मजा तेव्हाच येईल जेव्हा तू त्यांच्या छाताडावर पाय देऊन बसशील. उन्मत्त रावणाला हे पटते आणि तो सगळ्या ग्रहांना उपडे झोपवतो आणि त्यात शनी देवालाही वळवतो आणि त्यांच्या छाताडावर पाय ठेवून बसतो. तेव्हा शनी देवाचा जळजळीत कटाक्ष त्याच्यावर पडतो आणि रावणाचा ऱ्हास होण्याचा काळ सुरू होतो. 

तात्पर्य हेच, की विजय मिळाला तरी त्याचा उन्माद योग्य नाही. आपल्यावर मात करणारी व्यक्ती आपल्याला भेटतच असते. त्यामुळे आपल्याला शास्त्राची शिकवण आहे, 'विद्या विनयेन शोभते!'