शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मौनामुळे इच्छाशक्ती प्रबळ होते, पण ते कसे, कधी आणि किती वेळ पाळायचे ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 14:32 IST

बोलून चार चौघात शोभा करण्यापेक्षा योग्य ठिकाणी मौन पाळण्याचे कसब अंगी बाणायला हवे, कसे ते वाचा!

सामान्य भाषेत मौन म्हणजे तोंडाने न बोलणे इतकाच अर्थ सीमित झालेला आहे. पण इतका तोकडा अर्थ घेतला तरीसुद्धा मौनाचे मोठमोठे फायदे आहेत. कारण ज्यावेळी तोंडातून शब्दांचा उच्चार होतो, त्यावेळी मेंदूमधील स्मृती, प्रत्यभिज्ञा, अनुभव इ. विविध दालने कार्यरत होऊन शरीरातील बरीच ऊर्जा खर्च होत राहते. शिवाय दुसऱ्याशी बोलण्याचा ऐकणाऱ्याच्या मनावर होणाऱ्या परिमाणातून फायदे तोटे होतात ते निराळेच. म्हणून निदान वाचिक मौन पाळले तरी बरेच फायदे दिसून येतात. सर्वात मुख्य फायदा म्हणजे इच्छाशक्ती प्रबळ होते, कशी ते पहा... 

वाचिक मौन पाळताना काही जण पाटीवर, वहीवर लिहून दाखवतात किंवा हाताने, चेहऱ्याने खुणा करन मनातील आशय व्यक्त करतात. हा प्रकार म्हणजे मौनधारणाचा भंग होय. म्हणून शास्त्रानुसार मौन पाळावयाचे झाल्यास तोंडाने न बोलणे, हे जितके आवश्यक आहे तितकेच कोणत्याही व्यावहारिक गोष्टीचा विचार न करणे हेही आवश्यक आहे. 

परमार्थसिद्धीसाठी व्यावहारिक गोष्टी नुसत्या वरवर टाळून चालत नाहीत, तर त्यांचा मनावर पुसटसाही विचार येऊ नये हा मौनाचा खरा अर्थ आहे. मौन काळात साधना, चिंतन, मनन या गोष्टी भरपूर प्रमाणात व्हाव्यात अशी अपेक्षा असते. 

काही लोक अष्टमी, एकादशी, अमावस्या, पौर्णिमा अशांपैकी एखाद्या दिवशी मासिक मौन पाळतात. काहीजण पाक्षिक, तर काही जण साप्ताहिक मौन पाळतात. विशेषत: मौनादिवशी उपास घडल्यास ते मौन अधिक प्रभावी ठरते. काही जण दिवसातील एखाद तास मौन पाळतात. काही प्रगत साधक चातुर्मास अथवा एक किंवा बारा वर्षांचे मौन पाळतात. 

मौन ही साधना प्राचीन तपश्चर्येचे छोटे रूप आहे. मौन धारण करणाऱ्या साधकाच्या अंगी एक प्रकारची दैवी शक्ती बाणते. त्याची इच्छाशक्ती व मनोबल अत्यंत प्रभावशाली बनल्यामुळे त्यांच्या ठायी काही सिद्धीचा वास दिसून येतो. प्रगतीनुसार अल्प, लघु, क्षुद्र अथवा महा सिद्धींचा लाभ त्यांना होत राहतो. ज्यावेळी व्यवहारिक समस्या उभी ठाकते तेव्हा मौन धारण केल्यास 'आतील आवाज' ऐकू येतो व योग्य दिशेने पाऊल उचलणे, योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते. 

मौनाचे महत्त्व पाहता दिवसातून एक तास नाहीतर किमान पंधरा मिनिटे तरी कायिक, वाचिक आणि मानसिक मौन पाळा आणि फरक अनुभवा.