शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Shravan Vrat 2022: श्रावणमासात 'ही' पाच झाडं लावली असता, मरणोत्तर स्वर्गप्राप्ती होते असे म्हणतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 07:00 IST

Shravan Vrat 2022: मनुष्याला जिवंतपणाची कमी आणि मृत्यूपश्चात आपले काय होईल याची काळजी असते. त्यावर स्कंद पुराणाने दिले आहे पुढील उत्तर. 

श्रावणात सकल सृष्टी हिरवळ पांघरून नव्या नवरीसारखी टवटवीत दिसते. या सृष्टीत आपला खारीचा वाटा म्हणून वृक्षारोपणाचा संकल्प करावा, जेणेकरून आता कमावलेले पुण्य मरणोत्तरही कामी येईल असे स्कंद पुराण सांगते!

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असे म्हणत आपल्या संतांनी थेट वृक्ष वेलींशीं सोयरीक जोडली आहे. आपण त्यांचे अभंग म्हणतो परंतु त्यांनी दिलेला संदेश लक्षात घेत नाही. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यावर भर देत नाही मग अंगाची काहिली झाली, सावली मिळाली नाही, पाऊस वेळेत पडला नाही की रडत बसतो. म्हणूनच संत वचनाला स्कंद पुराणाची जोड देत वृक्ष लागवडीचे महत्त्व समजून घेऊ. 

सध्या आपण पाहतो, की रस्त्याच्या दुतर्फा परदेशी झाडांनी देशी झाडांची जागा व्यापून टाकली आहे. त्या झाडांचा ना सरणाला उपयोग ना सावलीला. केवळ पाला पाचोळा नि कचरा. त्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी नेहमी आंबा, वड, पिंपळ यांच्या लागवडीवर भर दिला. त्याला अध्यात्मिक तसेच शास्त्रीय आधार सुद्धा आहे. कसा ते जाणून घेऊ...   स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे:

अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्न्यग्रोधमेकम्  दश चिञ्चिणीकान् ।कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।

अश्वत्थः = पिपंळ,  पिचुमन्दः = कडूनिंब,  न्यग्रोधः = वट वृक्ष,  चिञ्चिणी = चिंच,  कपित्थः = कवठ,  बिल्वः = बेल, आमलकः = आवळा, आम्रः = आंबा (उप्ति = झाडे  लावणे) 

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही. असा या श्लोकाचा अर्थ आहे. यावरून आपल्याला वरील झाडांचे अध्यात्मिक महत्त्व तर कळलेच. शिवाय त्याचे भौगोलिक महत्त्व देखील समजून घेऊ. 

गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत. तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू. 

दुष्काळाचे खरे कारण 

पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. हे वाचुन आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे. पिंपळ कार्बन डाय ऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड  ८०% आणि कडुलिंब ७५% शोषतो आणि ही झाडे परिसराला गारवा निर्माण करतात तसेच प्राणवायू देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात. 

काही वर्षांपूर्वी यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात झाली. यूकेलिप्टस फार पटकन वाढते. दलदलीची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते.गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेली आहेत. त्यामुळे उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे. 

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात. त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -

मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!

पिंपळाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू, शाखांमध्ये महादेव यांचे वास्तव्य असते तर सर्व पानापानांमध्ये अन्य देवतांचे वास्तव्य असते. म्हणून पिंपळाला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. त्याची पूजादेखील केली जाते. विशेषतः हे झाड पक्ष्यांच्या विष्ठेमार्फत बीजारोपण होऊन रुजले जाते. पण काही लोक तेही खुडून टाकतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात. त्यांना रोखले पाहिजे आणि पिंपळाची सळसळ, चैतन्य वातावरणात रुजवली पाहिजे. 

आपण जितकी जास्त वड, पिंपळ, आंबा, कडुलिंब यांची झाडे लावू, तेवढा आगामी पिढीला त्याचा फायदा होणार आहे. देश प्रदूषण मुक्त होईल. पुढची पिढी आपले आभार मानेल. श्रावणात पुण्य संचयाच्या हेतूने या वृक्षाची लागवड करा. या पुण्यकर्माने जिवंतपणी तर नाहीच पण मरणोत्तरही नरकाचे तोंड बघावे लागणार नाही अशी स्कंद पुराणाने हमी दिली आहे!

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलNatureनिसर्ग