शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:18 IST

Shravan 2025: आजपासून श्रावण सुरु झाला, त्याबरोबरच व्रत कथा, कहाण्या वाचल्या जाणार, त्यात शेवटी येणारी ही ओळ काय सुचवते, ते जाणून घेऊ. 

श्रावण(Shravan 2025) मासात येणाऱ्या व्रत वैकल्यांचे पालन आपल्या आई आजीने केले, आताची पिढी देखील सगळी व्यवधाने सांभाळून आपली संस्कृती जपण्याचा, जाणून घेण्याचा, वाढवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे. पुढची पिढी अर्थात Gen Z यांनाही त्याबद्दल उत्सुकता आहे, मात्र त्यांच्यासमोर योग्य गोष्टी योग्य प्रकारे येणे गरजेचे आहे. 

कालच एका मैत्रिणीने फोन करून विचारलं, 'माझ्या लेकीला दिव्यांच्या अवसेची कथा आवडली, पण साठा उत्तराची कहाणी कोणती आणि ती सुफळ संपूर्ण म्हणजे काय हे नाही कळलं! तर तिला उत्तर काय देऊ तूच सांग!' 

मुळात आईने मुलीला दिव्यांच्या अवसेची कहाणी सांगितली, मुलीने ती ऐकून घेतली आणि त्यातून तिला प्रश्नही पडला याचंच मला अप्रूप वाटलं. तिच्या वयाला साजेसं उत्तर द्यायचं झालं तर गोष्टीची समरी किंवा सारांश असा त्याचा अर्थ सांग म्हटलं! त्यावर तिने विचारलं, 'तिच्या शंकेचं समाधान होईल पण माझ्या शंकेचं काय? मलाही याचं उत्तर हवं आहे.' त्यावर तिला दिलेलं उत्तर तुम्हीदेखील जाणून घ्या. 

'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' याचा अर्थ : 

'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा कथेचा शेवट चांगला आणि यशस्वी झाला आहे, असा होतो. विशेषतः व्रतकथा किंवा धार्मिक कथांच्या शेवटी हे वाक्य वापरले जाते. याचा अर्थ असा की, जी गोष्ट सांगितली जात आहे, ती पूर्ण झाली आहे आणि शेवट गोड झाला. 

शब्दश: अर्थ : 

साठा उत्तराची: याचा अर्थ असा होतो की, 'साठा' म्हणजे '६०' आणि 'उत्तराची' म्हणजे 'उत्तरे' किंवा 'भाग'. म्हणजे, ६० भागांमध्ये किंवा टप्प्यांमध्ये ती गोष्ट सांगितली जाते, ती 'पाचा' म्हणजे '५', उत्तरे म्हणजे उत्तर

सुफळ संपूर्ण:  'सुफळ' म्हणजे 'चांगली' आणि 'संपूर्ण' म्हणजे 'पूर्ण' किंवा 'यशस्वी'. याचा अर्थ असा की, ती गोष्ट चांगली झाली आहे आणि ती पूर्ण झाली आहे. 

म्हणजेच जी गोष्ट सांगायला बराच संदर्भ द्यावा लागणार होता ती थोडक्यात सांगून झाली आणि तिचा मतितार्थ  किंवा आशय लक्षात आल्याने ती सांगण्याचा हेतू सफल झाला. 

पौराणिक कथा या समाज प्रबोधनार्थी वाचल्या तर त्यामागचा आशय लक्षात येईल, गोष्टीतून घातलेले संस्कार कळतील, मनाला चांगले वळण मिळेल आणि अध्यात्मिक उन्नती होईल. 

हळू हळू ही ओळ वाकप्रचारासारखी वापरली जाऊ लागली. जसे की, एवढं समजवलं त्यामुळे तो सन्मार्गी लागला आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.  

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलTraditional Ritualsपारंपारिक विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणhistoryइतिहास