शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:18 IST

Shravan 2025: आजपासून श्रावण सुरु झाला, त्याबरोबरच व्रत कथा, कहाण्या वाचल्या जाणार, त्यात शेवटी येणारी ही ओळ काय सुचवते, ते जाणून घेऊ. 

श्रावण(Shravan 2025) मासात येणाऱ्या व्रत वैकल्यांचे पालन आपल्या आई आजीने केले, आताची पिढी देखील सगळी व्यवधाने सांभाळून आपली संस्कृती जपण्याचा, जाणून घेण्याचा, वाढवण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे. पुढची पिढी अर्थात Gen Z यांनाही त्याबद्दल उत्सुकता आहे, मात्र त्यांच्यासमोर योग्य गोष्टी योग्य प्रकारे येणे गरजेचे आहे. 

कालच एका मैत्रिणीने फोन करून विचारलं, 'माझ्या लेकीला दिव्यांच्या अवसेची कथा आवडली, पण साठा उत्तराची कहाणी कोणती आणि ती सुफळ संपूर्ण म्हणजे काय हे नाही कळलं! तर तिला उत्तर काय देऊ तूच सांग!' 

मुळात आईने मुलीला दिव्यांच्या अवसेची कहाणी सांगितली, मुलीने ती ऐकून घेतली आणि त्यातून तिला प्रश्नही पडला याचंच मला अप्रूप वाटलं. तिच्या वयाला साजेसं उत्तर द्यायचं झालं तर गोष्टीची समरी किंवा सारांश असा त्याचा अर्थ सांग म्हटलं! त्यावर तिने विचारलं, 'तिच्या शंकेचं समाधान होईल पण माझ्या शंकेचं काय? मलाही याचं उत्तर हवं आहे.' त्यावर तिला दिलेलं उत्तर तुम्हीदेखील जाणून घ्या. 

'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' याचा अर्थ : 

'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण' म्हणजे एखाद्या गोष्टीचा किंवा कथेचा शेवट चांगला आणि यशस्वी झाला आहे, असा होतो. विशेषतः व्रतकथा किंवा धार्मिक कथांच्या शेवटी हे वाक्य वापरले जाते. याचा अर्थ असा की, जी गोष्ट सांगितली जात आहे, ती पूर्ण झाली आहे आणि शेवट गोड झाला. 

शब्दश: अर्थ : 

साठा उत्तराची: याचा अर्थ असा होतो की, 'साठा' म्हणजे '६०' आणि 'उत्तराची' म्हणजे 'उत्तरे' किंवा 'भाग'. म्हणजे, ६० भागांमध्ये किंवा टप्प्यांमध्ये ती गोष्ट सांगितली जाते, ती 'पाचा' म्हणजे '५', उत्तरे म्हणजे उत्तर

सुफळ संपूर्ण:  'सुफळ' म्हणजे 'चांगली' आणि 'संपूर्ण' म्हणजे 'पूर्ण' किंवा 'यशस्वी'. याचा अर्थ असा की, ती गोष्ट चांगली झाली आहे आणि ती पूर्ण झाली आहे. 

म्हणजेच जी गोष्ट सांगायला बराच संदर्भ द्यावा लागणार होता ती थोडक्यात सांगून झाली आणि तिचा मतितार्थ  किंवा आशय लक्षात आल्याने ती सांगण्याचा हेतू सफल झाला. 

पौराणिक कथा या समाज प्रबोधनार्थी वाचल्या तर त्यामागचा आशय लक्षात येईल, गोष्टीतून घातलेले संस्कार कळतील, मनाला चांगले वळण मिळेल आणि अध्यात्मिक उन्नती होईल. 

हळू हळू ही ओळ वाकप्रचारासारखी वापरली जाऊ लागली. जसे की, एवढं समजवलं त्यामुळे तो सन्मार्गी लागला आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण झाली.  

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलTraditional Ritualsपारंपारिक विधीspiritualअध्यात्मिकIndian Festivalsभारतीय उत्सव-सणhistoryइतिहास