शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Shravan 2021 : देवकार्यात घट्ट वनस्पती तूप निषिद्ध का मानले जाते? त्यामागील शास्त्रीय कारण वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 14:42 IST

Shravan 2021 : घट्ट वनस्पती तूप खाण्यात आणि होमातही वापरू नये. त्याऐवजी दोनदा गाळून स्वच्छ केलेल शेंगदाण्याचे, करडईचे तेल वापरावे.

वास्तविक नुसत्या देवकार्यातून व पितृकार्यातून घट्ट वनस्पती तुपाचा निषेध मानला गेला आहे असे नव्हे तर हा निषेध सर्वकालीन आहे. वास्तव अर्थाने घट्ट वनस्पती तेलापासून तयार करण्यात येणारा पदार्थ 'तूप' या नावाला कदापिही पात्र होऊ शकत नाही. त्याची निषिद्धता केवळ धार्मिक दृष्ट्याच आहे असे नाही. कारण धर्मात जे जे निषिद्ध मानले गेलेले असते, ते बहुतेक वैज्ञानिक व वैद्यकीय दृष्ट्याही निषिद्ध असतेच. 

घट्ट वनस्पती तुपाचा पहिला गुणधर्म म्हणजे त्यावर एका विशिष्ट वायूची प्रक्रिया करून ते घट्ट बनवण्यात आलेली असते. त्याचे द्रवात रुपांतर होण्यासाठी सामान्यत: १०८ फॅरनहॅट इतकी उष्णता लागते. माणसाचा जास्तीत जास्त ताप १०५ ते १०६ पर्यंत जाऊ शकेल. पण १०८ पर्यंत कधीच जाऊ शकत नाही. म्हणजे घट्ट वनस्पती तूप वितळवून द्रवरूपात आणले व ते पोटात गेले तरी पुन्हा थोडेफार घन अवस्थेत जाते असे सिद्ध होते आणि हा घन अवस्थेतील पदार्थ आतड्याच्या आतील सुरकुत्यांवर साचून त्याचा खडबडीतपणा कमी होते व पचनक्रिया मंदावते. म्हणून असे तूप खाणाऱ्या व्यक्तींना अग्निमांद्य विकाराला बळी पडावे लागते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पदार्थ नुसत्या शुद्ध शेंगतेलापासून केल्यास त्यावर वायुप्रक्रिया तितकीशी परिणामकारकरित्या होऊ शकत नाही. म्हणून त्यात प्राण्यांची चरबी मिसळावी लागते. अर्थात या चरबीतील अशुद्धांश पूर्णपणे काढलेला असतो. घट्ट वनस्पती तूपासाठी गायीच्या चरबीइतका सुयोग्य पदार्थ कोणताही नाही. म्हणजे पर्यायाने घट्ट वनस्पती तूप म्हणजे तेल आणि चरबी यांचे मिश्रण होय. देव पितृ कार्यालाच नव्हे तर कोणत्याही कार्याला चरबीयुक्त पदार्थ निषिद्ध होणे अपरिहार्य ठरते. 

तिसरी गोष्ट म्हणजे हे घट्ट वनस्पती तूप साजूक तुपापेक्षा स्वस्त म्हणून त्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. पण प्रयोगांती असे सिद्ध झाले आहे की, एकाच आकाराच्या पुऱ्या साजूक तुपात शंभर होत असतील तर घट्ट वनस्पती तुपात फक्त ऐंशी होतात. म्हणून तळप माध्यम म्हणूनही त्याचा उपयोग करताना स्वस्ताईचा निकष लावता येत नाही.. 

चौथी गोष्ट म्हणजे परदेशीय शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, हृदयरोगाच्या विविध प्रकारांपैकी एक प्रकार असा आहे, की हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिन्यात एखादा घट्ट कण अडकून बसतो व रक्तपुरवठा बंद पडतो. हा कण वायुप्रक्रिया केलेल्या चरबीतून जाण्याची शक्यता अधिक असते. याखेरीज काही संशोधकांना उंदरावर प्रयोग करता असेही आढळून आले आहे, की उंदराच्या सलग पिढ्यांना घट्ट वनस्पती तूप खाऊ घातले असता, जवळपास सातवी पिढी दृष्टीबधीर होते. 

अशा अनेक कारणांनी त्याज्य ठरलेले घट्ट वनस्पती तूप धर्मशास्त्रात निषिद्ध मानले तर त्यात नवल नाही. घट्ट वनस्पती तूप खाण्यात आणि होमातही वापरू नये. त्याऐवजी दोनदा गाळून स्वच्छ केलेल शेंगदाण्याचे, करडईचे तेल वापरावे.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलfoodअन्न