शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वेद केवळ ब्राह्मणांनी वाचावेत का? जाणून घ्या श्री श्री रविशंकर यांनी दिलेले सुंदर उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 10:52 IST

वेदांमध्ये काय आहे? ते कोणी वाचावेत? ते वाचल्याने ब्रह्मज्ञान प्राप्त होते म्हणतात, पण ते वाचण्याआधीच अनेकांच्या मनात शंका कुशंका घर करतात, त्यावर हे उत्तर!

हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. पुरातन धर्म आहे. याबद्दल कुठेही वाद नाही. वाद आहे तो प्राचीन म्हणजे किती प्राचीन, याबद्दल स्मृतिकार मनूने 'वेदोखिलं धर्ममूलं, स्मृतिशीले च तद्विदाम् आचारश्चैव साधूनाम् आत्मन: तुष्टिरेव च!' असे म्हटले आहे. या सुप्रसिद्ध श्लोकात प्रथमत: वेद प्रामाण्य, वेदानुसार करायचे आचार, साधुसंतांचे वागणे आणि धर्माचरण अशी सविस्तर माहिती मिळते. 

धर्म ही संकल्पना वेदकालापासून किंवा त्याच्याही आधीपासून आहे हे मानल्यानंतर स्वाभाविकच वेद किती प्राचीन असावेत हा प्रश्न निर्माण होतो. याबद्दल लोकमान्य टिळक, चिंतामणराव वैद्य, महामहोपाध्याय पा.वा.काणे इ. मान्यवरांच्या मते हा काळ इसवीसनापूर्वी चार ते पाच हजार वर्षांपूर्वीचा असावा. कृष्णशास्त्री राजवाडे यांच्यासारख्या संशोधकांनी मात्र वेदकाल हा ३५ हजार वर्षांहून प्राचीन असावा असे अनुमान केले आहे. 

अशा वेद ग्रंथांबद्दल उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविक आहे. जिथे कुतूहल तिथे शंका उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. अशीच एक शंका एका अनुयायीनी गुरु श्री श्री रविशंकर यांच्याकडे उपस्थित केली होती, ''वेदाचे पठण कोणी करावे? तो अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे का?' यावर ते उत्तरले, 'वेदांचे पठण कोणीही करू शकतो. त्याला धर्म जातीची बंधने नाहीत. वेदाभ्यास करून ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण झाला. ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नसून तो क्रियावाचक आहे. तीच बाब क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र यांचीही! ही कामानुसार ठरवलेली वर्णव्यवस्था आहे. तिला जातीव्यवस्था हे नाव दिल्यामुळे मूळ संकल्पनेत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे वकिलीचा अभ्यास करणारा वकील, डॉक्टरकीचा अभ्यास करणारा डॉक्टर होतो, तसा वेदांचा अभ्यास करून ब्रह्मज्ञान मिळवणारा ब्राह्मण होतो. उलट ते ज्ञान सर्वांनी घ्यावे आणि सुज्ञ व्हावे.'' 

इतक्या प्रदीर्घ कालावधीत तो धर्म अखंडितपणे सातत्याने टिकून राहिला त्या मूळ प्रवाहात अनेकानेक विचारांच्या उपप्रवाहांचा समावेश होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. वेदप्रामाण्य हा हिंदुधर्माचा प्रमुख निकष असला तरी वेदकाळात ज्यांची पुसटती कल्पनाही येणे शक्य नव्हते अशा बहुविध बदलांना आणि आघातांना मागील हजारो वर्षात मानवी समाजाला वारंवार सामोरे जावे लागले आणि त्या त्या वेळी समाजाला ययोग्य मार्गदर्शन करणे हेच ज्यांनी स्वत:चे जीवनकर्तव्य मानले अशा ऋषीमुनींनी भिन्न भिन्न काळी आपापल्या मतानुसार जे जुने यमनियम पुन्हा नव्याने सांगितले, प्रसंगी त्यात बदल केले अथवा नवीन नियम घालून दिले, तेच समाजासाठी जागरुक असलेले धर्मशास्त्रज्ञ पुढे स्मृतिकार म्हणून अखिल हिंदुना मार्गदर्शक ठरले. 

मूळ वेदातील धर्मविषयक वचनांना अनुसरून मधल्या काळात धर्मसूत्रे म्हटली जाणारी काही सूत्रे प्रचलित होती, काही कालौघात नष्ट झाली. नंतरच्या काळात विविध अग्रेसर मुनींनी जे सुबोध आणि आदर्शभूत ठरणारे स्मृतिग्रंथ लिहिले त्यांनाच विशेष महत्त्व प्रप्त झाले आणि ते महत्त्व आजपर्यंत अखंडपणे टिकून आहे.