शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

महत्त्वाच्या कामाला जाताना 'या' गोष्टींचे दिसणे शुभ मानावे की अशुभ? ज्योतिष शास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:24 IST

घराबाहेर पडल्यावर अनेक गोष्टी नजरेस पडतात. ऐकीव माहितीनुसार त्या गोष्टींचे दिसणे शुभ मानावे की अशुभ, हा संभ्रम मनात निर्माण होतो. त्यासाठी ही माहिती... 

घराच्या चार भिंतींच्या आड अनेक गोष्टी आपण टाळू शकतो. परंतु घराबाहेर पडल्यावर घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. त्यात पूर्वापार ऐकत आलेल्या गोष्टींमुळे मनात शंकेची पाल चुकचुकते. एकदा का मनात नकारात्मक भाव निर्माण झाले की होणारे कामही होत नाही, असा आपल्याला अनुभव येतो. यासाठीच ज्योतिष शास्त्राने काही सूचना केल्या आहेत, त्या ध्यानात ठेवून आपण सकारात्मकतेने कामाची सुरुवात केल्यास अन्य अडचणी येणार नाहीत. 

ज्योतिष शास्त्रात घरातून बाहेर पडताना काही नियम सांगण्यात आले आहेत. घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला जाताना देवाचा, वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा असे म्हणतात. त्यामुळे कामात अडथळे येत नाहीत. मात्र बाहेर पडल्यावर अनपेक्षित गोष्टी नजरेस पडतात, ज्यामुळे शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

घरातून बाहेर पडताना कोणाची अंत्ययात्रा दिसली तर ती घटना अशुभ असली तरी देवाघरी जाणाऱ्या व्यक्तीचे दर्शन घडणे शुभ चिन्ह मानले जाते. त्यामुळे ती बाब अशुभ मानू नका. गेलेल्या व्यक्तीला दुरूनच नमस्कार करून तुमच्या कामाला निघा. कदाचित अडलेल्या कामाला गती आल्याचेही लक्षात येईल. 

सकाळी सकाळी दारात भिकाऱ्याचे येणे आपल्याला त्रासदायक वाटते. परंतु अशा व्यक्तीला टाळण्यापेक्षा गरजेच्या वस्तू, जसे की अन्न, कपडे, चपला अशा गोष्टी दान कराव्यात. पैसे देण्यापेक्षा अशा गोष्टी दिल्याने ती व्यक्ती खरंच गरजू असेल तर तिची गरज भागेल आणि पैशांसाठी भीक मागत असेल तर परत येणे बंद करेल. त्यामुळे त्रागा करू नका तर तोडगा काढा. 

कामासाठी बाहेर जाताना गोमातेचे दर्शन होणे शुभ संकेत मानले जातात. त्यातही वासराला दूध पाजणारी वत्सल गोमाता दिसणे त्याहून शुभ ठरते. असा प्रसंग दिसणे म्हणजे आजवर अडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे संकेत मानले जातात. 

घराबाहेर पडताना मंदिरातून घंटानाद कानावर पडणे अतिशय शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा होणार आणि तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी देवाचे सहकार्य मिळणार हे निश्चित!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष