शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

महत्त्वाच्या कामाला जाताना 'या' गोष्टींचे दिसणे शुभ मानावे की अशुभ? ज्योतिष शास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:24 IST

घराबाहेर पडल्यावर अनेक गोष्टी नजरेस पडतात. ऐकीव माहितीनुसार त्या गोष्टींचे दिसणे शुभ मानावे की अशुभ, हा संभ्रम मनात निर्माण होतो. त्यासाठी ही माहिती... 

घराच्या चार भिंतींच्या आड अनेक गोष्टी आपण टाळू शकतो. परंतु घराबाहेर पडल्यावर घडणाऱ्या, दिसणाऱ्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. त्यात पूर्वापार ऐकत आलेल्या गोष्टींमुळे मनात शंकेची पाल चुकचुकते. एकदा का मनात नकारात्मक भाव निर्माण झाले की होणारे कामही होत नाही, असा आपल्याला अनुभव येतो. यासाठीच ज्योतिष शास्त्राने काही सूचना केल्या आहेत, त्या ध्यानात ठेवून आपण सकारात्मकतेने कामाची सुरुवात केल्यास अन्य अडचणी येणार नाहीत. 

ज्योतिष शास्त्रात घरातून बाहेर पडताना काही नियम सांगण्यात आले आहेत. घराबाहेर पडताना किंवा प्रवासाला जाताना देवाचा, वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा असे म्हणतात. त्यामुळे कामात अडथळे येत नाहीत. मात्र बाहेर पडल्यावर अनपेक्षित गोष्टी नजरेस पडतात, ज्यामुळे शुभ आणि अशुभ संकेत मिळतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

घरातून बाहेर पडताना कोणाची अंत्ययात्रा दिसली तर ती घटना अशुभ असली तरी देवाघरी जाणाऱ्या व्यक्तीचे दर्शन घडणे शुभ चिन्ह मानले जाते. त्यामुळे ती बाब अशुभ मानू नका. गेलेल्या व्यक्तीला दुरूनच नमस्कार करून तुमच्या कामाला निघा. कदाचित अडलेल्या कामाला गती आल्याचेही लक्षात येईल. 

सकाळी सकाळी दारात भिकाऱ्याचे येणे आपल्याला त्रासदायक वाटते. परंतु अशा व्यक्तीला टाळण्यापेक्षा गरजेच्या वस्तू, जसे की अन्न, कपडे, चपला अशा गोष्टी दान कराव्यात. पैसे देण्यापेक्षा अशा गोष्टी दिल्याने ती व्यक्ती खरंच गरजू असेल तर तिची गरज भागेल आणि पैशांसाठी भीक मागत असेल तर परत येणे बंद करेल. त्यामुळे त्रागा करू नका तर तोडगा काढा. 

कामासाठी बाहेर जाताना गोमातेचे दर्शन होणे शुभ संकेत मानले जातात. त्यातही वासराला दूध पाजणारी वत्सल गोमाता दिसणे त्याहून शुभ ठरते. असा प्रसंग दिसणे म्हणजे आजवर अडलेल्या कामांना गती मिळणार असल्याचे संकेत मानले जातात. 

घराबाहेर पडताना मंदिरातून घंटानाद कानावर पडणे अतिशय शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ तुमच्यावर देवाची कृपा होणार आणि तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी देवाचे सहकार्य मिळणार हे निश्चित!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष