शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

मधल्या बोटात अंगठी घालावी की घालू नये? ज्योतिषशास्त्र काय सांगते? वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:55 IST

नीलमच्या अंगठीचा डोळस पणे वापर करावा आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानंतरच मधल्या बोटात अंगठी घालण्याचा निर्णय घ्यावा. 

मधल्या बोटात म्हणजे मध्यमात अंगठी घालू नये हा गैरसमज आहे. परंतु हे मात्र खरे आहे, की त्यात शोभेची अंगठी किंवा अन्य रत्नजडित अंगठी घातल्याचा लाभ होणार नाही. तर त्या बोटात विशिष्ट अंगठीच घालावी लागते. ती अंगठी कोणती, ते जाणून घेऊया. 

'मध्यमा' अर्थात मधले बोट हे शनीचे बोट मानले जाते. शनी ग्रहाची वृत्ती विलासी नाही. त्यामुळे सुखोपभोग वगैरे त्या ग्रहाला माहीतच नाही. त्यांना माहीत आहे, ती फक्त शिस्त, न्याय आणि प्रामाणिकपणा. ज्या व्यक्तीला हे तीन गुण आचरणात आणता येतील, त्यांनीच शक्यतो मधल्या बोटात आंगठी घालण्याचा अट्टाहास करावा. 

त्या अंगठीमध्ये शनीचे प्रिय रत्न नीलम परिधान करता येऊ शकते. हे रत्न अन्य बोटातील अंगठीमध्ये वापरून उपयोग नाही. तिची योग्य जागा मधल्या बोटात असते. म्हणून इतर कोणतीही शोभेची अंगठी वापरण्याऐवजी नीलम ची अंगठी वापरल्यास त्याचा लाभ होऊ शकतो. 

शोभेच्या किंवा सोन्या,चांदीच्या रत्न जडित अंगठ्या मधल्या बोटात वापरल्यास त्रास होऊ शकतो का? तर त्याचे उत्तर आहे हो, त्रास होऊ शकतो.  एकवेळ शोभेच्या अंगठीचा त्रास होणार नाही, कारण ती तात्पुरती वापरली जाते. याउलट सोन्या-चांदीच्या अंगठ्या कायमस्वरूपी घातल्या जातात.  त्या अंगठ्या घालण्याचे शास्त्र अथवा ज्योतिषी कारण समजावून घेतले नाही, तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हे बोट शनी देवांचे आहे. त्यांची विरक्त वृत्ती अशा चैनीच्या गोष्टींना विरोध दर्शवते. शनी ग्रहाचा साडेसातीशी आणि मृत्यूशी थेट संबंध असल्यामुळे विषाची परीक्षा न घेणे चांगले. वापरायची झाल्यास नीलम ची अंगठी वापरावी, ते सुद्धा तुम्हाला त्याची गरज असेल तरच! ज्योतिषी सल्ल्यानुसार ग्रहांना अनुकूल ठरणारे खडे वापरावेत. अकारण वापरल्यास त्याचा अतिरिक्त लाभ होत नाही. म्हणून रत्न असो किंवा रुद्राक्ष या गोष्टींचा ज्योतिष शास्त्राशी संबंध असल्यामुळे ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार त्यांचा केलेला वापर हितावह ठरतो. 

साडेसातीच्या काळात नीलम अंगठी वापरण्याचा सल्ला विशेषतः दिला जातो. त्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होऊन, ग्रहदशा अनुकूल होते. शनी ग्रहाची अनुकूलता लाभते. यासाठी नीलमच्या अंगठीचा डोळस पणे वापर करावा आणि ज्योतिषांच्या सल्ल्यानंतरच मधल्या बोटात अंगठी घालण्याचा निर्णय घ्यावा.