शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

गोष्ट चाराण्याची, शिकवण लाखमोलाची; वाचा एका शेतकऱ्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 11:37 IST

समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण जाणून घ्या!

अनेक धनिक आपण पाहिले आहेत, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही, पण त्यांच्या वाट्याला चाराण्याचेही सुख नाही. ऐषारामी जीवन जगायला पैसे हवेत, परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसेल, तर ते पैसे मातीमोल ठरतात. अशा वेळी चाराणेच महत्त्वाचे ठरतात. ही शिकवण दिली, ती एका शेतकऱ्याने!

एक मोठा अधिकारी आपल्या गावाची पाहणी करत एका शेतावरून जात होता. शेतकरी कामात मग्न होता. त्याला थोडी आर्थिक मदत करावी या हेतूने अधिकाऱ्याने शेतकऱ्याला काही पैसे द्यायचे ठरवले. शेतकरी म्हणाला, `नको साहेब माझ्याकडे चाराणे आहेत. तेवढे मला पुरेसे आहेत.'

हे ऐकून अधिकारी चक्रावला व म्हणाला, `आताच्या काळात चाराण्यात कोणाचे भागणारे? चाराण्याचे नाणे बाद झाले. रस्त्यावरचे भिकारीसुद्धा पाच-दहा रुपयांच्या खाली पैसे घेत नाहीत आणि तू चाराण्यात समाधानी आहेस? मला कळले नाही...'

यावर शेतकरी म्हणाला, `साहेब, चाराणे म्हणजे माझ्या कमाईचा पाव हिस्सा, त्यात मी समाधानी आहे, असे म्हणालो.''कमाईचा पाव हिस्सा? मग पाऊण भागाचे काय?' अधिकारी विचारता झाला.

शेतकरी म्हणाला, 'चाराण्याच्या हिशोबात सांगायचे तर समजा, माझी कमाई १ रुपया आहे. तर त्यातील चाराणे मी माझ्या मुलांच्या, कुटुंबाच्या गरजांसाठी वापरतो, दुसरे चाराणे माझ्या वाडवडिलांनी कोणाकडून कर्ज घेतले असले किंवा मी कोणाला देणे लागत असेन तर त्यांच्यावर खर्च करतो. तिसरे चाराणे मी भविष्याची तरतूद म्हणून जमा करतो आणि या पाऊण भागाची व्यवस्था लागल्यावर मी स्वत:साठी पाव भाग वापरतो. तेच हे चाराणे!'

अधिकाऱ्याला शेतकऱ्याचा हेवा वाटला. तो म्हणाला, `तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण म्हणजे आपल्या कमाईचे नियोजन कसे करावे, कुठे थांबावे आणि कुठे समाधान मानावे, हे ज्याला कळले त्याला लाखभर रुपये मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी तो कायम आनंदी राहू शकतो, तुमच्यासारखा!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी