शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

गोष्ट चाराण्याची, शिकवण लाखमोलाची; वाचा एका शेतकऱ्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 11:37 IST

समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण जाणून घ्या!

अनेक धनिक आपण पाहिले आहेत, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही, पण त्यांच्या वाट्याला चाराण्याचेही सुख नाही. ऐषारामी जीवन जगायला पैसे हवेत, परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसेल, तर ते पैसे मातीमोल ठरतात. अशा वेळी चाराणेच महत्त्वाचे ठरतात. ही शिकवण दिली, ती एका शेतकऱ्याने!

एक मोठा अधिकारी आपल्या गावाची पाहणी करत एका शेतावरून जात होता. शेतकरी कामात मग्न होता. त्याला थोडी आर्थिक मदत करावी या हेतूने अधिकाऱ्याने शेतकऱ्याला काही पैसे द्यायचे ठरवले. शेतकरी म्हणाला, `नको साहेब माझ्याकडे चाराणे आहेत. तेवढे मला पुरेसे आहेत.'

हे ऐकून अधिकारी चक्रावला व म्हणाला, `आताच्या काळात चाराण्यात कोणाचे भागणारे? चाराण्याचे नाणे बाद झाले. रस्त्यावरचे भिकारीसुद्धा पाच-दहा रुपयांच्या खाली पैसे घेत नाहीत आणि तू चाराण्यात समाधानी आहेस? मला कळले नाही...'

यावर शेतकरी म्हणाला, `साहेब, चाराणे म्हणजे माझ्या कमाईचा पाव हिस्सा, त्यात मी समाधानी आहे, असे म्हणालो.''कमाईचा पाव हिस्सा? मग पाऊण भागाचे काय?' अधिकारी विचारता झाला.

शेतकरी म्हणाला, 'चाराण्याच्या हिशोबात सांगायचे तर समजा, माझी कमाई १ रुपया आहे. तर त्यातील चाराणे मी माझ्या मुलांच्या, कुटुंबाच्या गरजांसाठी वापरतो, दुसरे चाराणे माझ्या वाडवडिलांनी कोणाकडून कर्ज घेतले असले किंवा मी कोणाला देणे लागत असेन तर त्यांच्यावर खर्च करतो. तिसरे चाराणे मी भविष्याची तरतूद म्हणून जमा करतो आणि या पाऊण भागाची व्यवस्था लागल्यावर मी स्वत:साठी पाव भाग वापरतो. तेच हे चाराणे!'

अधिकाऱ्याला शेतकऱ्याचा हेवा वाटला. तो म्हणाला, `तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण म्हणजे आपल्या कमाईचे नियोजन कसे करावे, कुठे थांबावे आणि कुठे समाधान मानावे, हे ज्याला कळले त्याला लाखभर रुपये मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी तो कायम आनंदी राहू शकतो, तुमच्यासारखा!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी