शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

गोष्ट चाराण्याची, शिकवण लाखमोलाची; वाचा एका शेतकऱ्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 11:37 IST

समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण जाणून घ्या!

अनेक धनिक आपण पाहिले आहेत, ज्यांच्याकडे पैशांची कमतरता नाही, पण त्यांच्या वाट्याला चाराण्याचेही सुख नाही. ऐषारामी जीवन जगायला पैसे हवेत, परंतु पैशांचे सुयोग्य नियोजन नसेल, तर ते पैसे मातीमोल ठरतात. अशा वेळी चाराणेच महत्त्वाचे ठरतात. ही शिकवण दिली, ती एका शेतकऱ्याने!

एक मोठा अधिकारी आपल्या गावाची पाहणी करत एका शेतावरून जात होता. शेतकरी कामात मग्न होता. त्याला थोडी आर्थिक मदत करावी या हेतूने अधिकाऱ्याने शेतकऱ्याला काही पैसे द्यायचे ठरवले. शेतकरी म्हणाला, `नको साहेब माझ्याकडे चाराणे आहेत. तेवढे मला पुरेसे आहेत.'

हे ऐकून अधिकारी चक्रावला व म्हणाला, `आताच्या काळात चाराण्यात कोणाचे भागणारे? चाराण्याचे नाणे बाद झाले. रस्त्यावरचे भिकारीसुद्धा पाच-दहा रुपयांच्या खाली पैसे घेत नाहीत आणि तू चाराण्यात समाधानी आहेस? मला कळले नाही...'

यावर शेतकरी म्हणाला, `साहेब, चाराणे म्हणजे माझ्या कमाईचा पाव हिस्सा, त्यात मी समाधानी आहे, असे म्हणालो.''कमाईचा पाव हिस्सा? मग पाऊण भागाचे काय?' अधिकारी विचारता झाला.

शेतकरी म्हणाला, 'चाराण्याच्या हिशोबात सांगायचे तर समजा, माझी कमाई १ रुपया आहे. तर त्यातील चाराणे मी माझ्या मुलांच्या, कुटुंबाच्या गरजांसाठी वापरतो, दुसरे चाराणे माझ्या वाडवडिलांनी कोणाकडून कर्ज घेतले असले किंवा मी कोणाला देणे लागत असेन तर त्यांच्यावर खर्च करतो. तिसरे चाराणे मी भविष्याची तरतूद म्हणून जमा करतो आणि या पाऊण भागाची व्यवस्था लागल्यावर मी स्वत:साठी पाव भाग वापरतो. तेच हे चाराणे!'

अधिकाऱ्याला शेतकऱ्याचा हेवा वाटला. तो म्हणाला, `तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. समाधान हे मानण्यावर असते. लोकांकडे लाख लाख पगार असूनही ते संतुष्ट नसतात. समाधानी नसतात. याचे कारण म्हणजे आपल्या कमाईचे नियोजन कसे करावे, कुठे थांबावे आणि कुठे समाधान मानावे, हे ज्याला कळले त्याला लाखभर रुपये मिळाले तरी आणि नाही मिळाले तरी तो कायम आनंदी राहू शकतो, तुमच्यासारखा!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी