शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Shiv Temple: संजीवनी मंत्राचा उच्चार शुक्राचार्यांनी ज्या ठिकाणी केला होता, ते गोदावरी तीरावर वसलेले शुक्राचार्य मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 15:11 IST

Travel: शुक्राचार्य हे असुरांचे गुरु असले तरी ते शिवभक्त होते, म्हणून जाणून घ्या त्यांच्या नावे स्थापित असलेल्या अतिप्राचीन मंदिराविषयी!

>> जगन्नाथ मनोहर चव्हाण 

शुक्राचार्य मंदिर हे कोपरगाव येथे गोदावरीच्या तीरावर वसलेले भारतातील एकमेव शक्तिशाली व पवित्र स्थान आहे. या मंदिराला अती प्राचीन, पौराणिक व धार्मिक संदर्भ आहे. या पवित्र भूमीचे अस्तित्व आध्यात्मिकच नाही तर दैवी स्वरूपाचे आहे. या जागेवर वर्षानुवर्षांपासून सिद्ध होत असलेले महामृत्युंजय याग, होमहवन, लघुरुद्र-महारुद्र, यज्ञकार्य यांच्या पवित्र कंपनांमुळे निर्माण झालेली ऊर्जाशक्ति अद्भुत आहे. त्यामुळे लाखों भक्तगण येथे नतमस्तक होतात. 

शुक्राचार्यांनी भगवान शिवाची उपासना करून 'संजीवनी विद्या' प्राप्त करून या मंत्राची  सिद्धता या स्थानी केली. पौराणिक संदर्भानुसार ब्रह्मदेवाचे पौत्र अंगिरस ऋषी यांचे पुत्र बृहस्पती हे देवांचे गुरु होते. तसेच ब्रह्मदेवाचे दुसरे पौत्र भार्गव ऋषी यांचे पुत्र शुक्राचार्य हे असुरांचे गुरु होते. बृहस्पती यांचे पुत्र कच व शुक्राचार्य यांची कन्या देवयानी यांची प्रेमकथा येथेच फुलली.

सूर आणि असुर यांच्या युद्धात अनेक वेळा असुर देवांवर विजय मिळवत असत. कारण शुक्राचार्य संजीवनी मंत्राचे उच्चारण करून असुरांना जिवंत करत. म्हणून संजीवनी मंत्राची प्राप्ती करण्यासाठी कच यांस शुक्राचार्य यांच्याकडे पाठविले. शुक्राचार्यांनी त्याचा स्वीकार करून कच यांस संजीवनी मंत्र येथेच शिकविला. अशी एक थोर गुरु-शिष्य परंपरा या स्थानास लाभलेली आहे.

ज्यावेळी राजा ययातीने देवयानीचे पाणिग्रहण केले त्यावेळी सिंहस्थ काळ सुरु होता व ग्रहनक्षत्र अनुकूल नव्हते. तेव्हा शुक्राचार्यांनी येथे एक महायज्ञ करून संपूर्ण भूमी आपल्या तपोबलाने पावन केली व ग्रहनक्षत्र अनुकूल करून घेतले तेव्हा ययाति देवयानी विवाह संपन्न झाला. तसेच त्यांनी या भूमीला वरदान दिले की, येथे कुठलाही शुभ मुहूर्त नसला तरी येथे विवाह संपन्न होऊन यशस्वी होतील. 

टॅग्स :Templeमंदिर