शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Shiv Puja: सुंदर, सुकोमल केतकीचे फुल शापित का मानले जाते? महादेवाला ते का वाहू नये? वाचा त्यामागची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:48 IST

Shiv Puja: महादेवाची पूजा करताना आपण बेल आणि पांढरे फुल वाहतो, मात्र त्यात केतकीच्या फुलांचा समावेश नसावा असे सांगितले जाते. 

महादेवांना बेलाचे पान आणि पांढरी फुले प्रिय असतानाही केतकी अप्रिय का? त्यामागे सांगितली जाते एक कथा... 

एक दिवस ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात वाद झाला की दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? न्यायनिवाडा करण्यासाठी ते महादेवांकडे आले. निर्णय सुनावण्याआधी त्यांनी दोघांची परीक्षा घ्यायची असे ठरवले. महादेवांनी एक शिवलिंग प्रगट केले आणि दोघांना सांगितले, की या शिवलिंगाचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो सर्वश्रेष्ठ ठरेल. 

ब्रह्मदेव निघाले पृथ्वी आणि पाताळाच्या दिशेने तर विष्णू देव निघाले स्वर्गाच्या सप्तपुरीमध्ये! बराच प्रवास विष्णूंना उत्तर न सापडल्याने ते हार पत्करून परत आले. तर ब्रह्मदेव स्पर्धा जिंकण्याच्या नादात पाताळात शिवलिंगाचा उगम आहे असे सांगत कैलासाकडे आले. येताना त्यांनी केतकीचे फुल साक्षीदार म्हणून आले. 

स्पर्धा जिंकण्यासाठी ब्रह्मदेवांनी खोटे बोलले हे महादेवांना आवडले नाही, म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे शीर धडावेगळे केले आणि खोटी साक्ष देणाऱ्या केतकीच्या फुलाला शाप दिला, की तू कितीही सुंदर असलीस तरी माझ्या पूजेमध्ये तुझा समावेश होणार आहे. 

तेव्हापासून केतकीचे फुल इतर पूजेमध्ये समाविष्ट केले जाते पण चुकूनही महादेवांना वाहिले जात नाही. या पौराणिक कथेची सत्यअसत्यता माहित नाही पण कथेचे तात्पर्य हेच सांगते की आपला स्वार्थ साधायचा म्हणून कधीही खोटे बोलू नका, तसे करणे तुमच्या हिताचे तर नसतेच शिवाय परमेश्वरालाही ते आवडत नाही!