शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पन्हाळगड काबीज केल्यावर महाराजांनी सोमेश्वर महादेवावर केला होता लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:05 IST

Shiv Jayanti 2025: आज शिव जयंती निमित्त शिवरायांची शिवभक्ती जाणून घेऊया आणि त्यानिमित्त आपणही तो क्षण महाराजांसवे अनुभवूया.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंमुळे महाराजांवर बालपणापासूनच देव, देश, धर्माचे संस्कार झाले होते. एकीकडे शस्त्राचे तर दुसरीकडे शास्त्राचे प्रशिक्षण ते घेत होते. त्यांच्या देशभक्तीला देवभक्तीची जोड होती. 'हे राज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा' हे त्यांचे भावोद्गार होते. बालपणी आईबरोबर कथा कीर्तनाला जात असल्यामुळे त्यांच्यावर रामायण, महाभारत, भागवत, हरीकथेचे संस्कार झाले होते. त्यांना उंच डोंगरावर असलेले देवीचे मंदिर, दऱ्याखोऱ्यात असलेले शिवालय विशेषतः आवडत असे. तिथे गेल्यावर ते ध्यानमग्न होत असत. अशाच एका शिवालयाचा प्रसंग जाणून घेऊया. 

Shiv Jayanti 2025: शिवाजी महाराज होते थोर रामभक्त; जिजाऊंनी बालशिवबावर घातलेले रामकथेचे संस्कार!

स्वराज्याची मोहीम सुरू असताना पन्हाळगड ताब्यात घेण्याची जबाबदारी महाराजांनी आपले निष्ठावंत सरदार कोंडाजी फ़र्जंद यांच्यावर सोपवली होती. कोंडाजींनी मावळ्यांच्या छोट्याशा तुकडीसह मोठ्या शिताफीने गड ताब्यात घेतला आणि महाराजांना विजय वार्ता कळवली. पन्हाळगड प्रिय असल्याने महाराज स्वतः अभिनंदन करण्यासाठी गडावर पोहोचले. या विजयोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनी पन्हाळ गडावरील सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात एक लक्ष सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक करण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार तजवीज घडवून संकल्पपूर्ती करवून घेतली. शिवाजी महाराजांची भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा सुगंधी प्रसंग, कायमच स्मरणात राहणारा आहे. 

पन्हाळा गडाचे पुराणकाळातील नाव 'ब्रम्हगिरी' असे होते. यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न 'करण्याच्या हेतूने येथे 'सोमेश्वर लिंग' व 'सोमेश्वर सरोवर' निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव 'ब्रम्हगिरी' असे पडले.जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव 'प्रणालक' किंवा 'पद्मनाल' असे आले आहे. यातून 'पनाला' शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव 'शहानबी- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो 'पन्हाळा' या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषण  कवीने आपल्या काव्यात यास 'परनालगड' असे म्हटले आहे. गडाच्या नावात अनेक भेदाभेद झाले तरी पन्हाळा अभेद्य राहिला, सोमेश्वरही आशीर्वाद देत राहिला आणि त्याच्यावर सोनचाफी अभिषेक करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही संस्मरणीय ठरला.  

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती