शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पन्हाळगड काबीज केल्यावर महाराजांनी सोमेश्वर महादेवावर केला होता लक्ष सोनचाफ्याचा अभिषेक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:05 IST

Shiv Jayanti 2025: आज शिव जयंती निमित्त शिवरायांची शिवभक्ती जाणून घेऊया आणि त्यानिमित्त आपणही तो क्षण महाराजांसवे अनुभवूया.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. आई जिजाऊंमुळे महाराजांवर बालपणापासूनच देव, देश, धर्माचे संस्कार झाले होते. एकीकडे शस्त्राचे तर दुसरीकडे शास्त्राचे प्रशिक्षण ते घेत होते. त्यांच्या देशभक्तीला देवभक्तीची जोड होती. 'हे राज्य व्हावे ही तर श्रीं ची इच्छा' हे त्यांचे भावोद्गार होते. बालपणी आईबरोबर कथा कीर्तनाला जात असल्यामुळे त्यांच्यावर रामायण, महाभारत, भागवत, हरीकथेचे संस्कार झाले होते. त्यांना उंच डोंगरावर असलेले देवीचे मंदिर, दऱ्याखोऱ्यात असलेले शिवालय विशेषतः आवडत असे. तिथे गेल्यावर ते ध्यानमग्न होत असत. अशाच एका शिवालयाचा प्रसंग जाणून घेऊया. 

Shiv Jayanti 2025: शिवाजी महाराज होते थोर रामभक्त; जिजाऊंनी बालशिवबावर घातलेले रामकथेचे संस्कार!

स्वराज्याची मोहीम सुरू असताना पन्हाळगड ताब्यात घेण्याची जबाबदारी महाराजांनी आपले निष्ठावंत सरदार कोंडाजी फ़र्जंद यांच्यावर सोपवली होती. कोंडाजींनी मावळ्यांच्या छोट्याशा तुकडीसह मोठ्या शिताफीने गड ताब्यात घेतला आणि महाराजांना विजय वार्ता कळवली. पन्हाळगड प्रिय असल्याने महाराज स्वतः अभिनंदन करण्यासाठी गडावर पोहोचले. या विजयोत्सवाच्या निमित्ताने महाराजांनी पन्हाळ गडावरील सोमेश्वर महादेवाच्या मंदिरात एक लक्ष सोनचाफ्याच्या फुलांचा अभिषेक करण्याचा संकल्प केला आणि त्यानुसार तजवीज घडवून संकल्पपूर्ती करवून घेतली. शिवाजी महाराजांची भगवंतावरील दृढ श्रद्धा आणि भक्तिभावाचे दर्शन घडवणारा हा सुगंधी प्रसंग, कायमच स्मरणात राहणारा आहे. 

पन्हाळा गडाचे पुराणकाळातील नाव 'ब्रम्हगिरी' असे होते. यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की, ब्रम्हदेवाने प्रजा उत्पन्न 'करण्याच्या हेतूने येथे 'सोमेश्वर लिंग' व 'सोमेश्वर सरोवर' निर्माण करून तपश्चर्या केली म्हणून या गडाचे नाव 'ब्रम्हगिरी' असे पडले.जुन्या शिलालेखातील वर्णनानुसार पन्हाळगडाचे नाव 'प्रणालक' किंवा 'पद्मनाल' असे आले आहे. यातून 'पनाला' शब्दाची उत्पत्ती झाली असावी. पन्हाळगड विजापूरकरांच्या ताब्यात आल्यावर या गडाचे नाव 'शहानबी- दुर्ग असे ठेवले होते. पुढे शिवाजी महाराजांच्याकडे या गडाचा ताबा आल्यावर तो 'पन्हाळा' या नावाने ओळखला जात होता. शिवकाळातील भूषण  कवीने आपल्या काव्यात यास 'परनालगड' असे म्हटले आहे. गडाच्या नावात अनेक भेदाभेद झाले तरी पन्हाळा अभेद्य राहिला, सोमेश्वरही आशीर्वाद देत राहिला आणि त्याच्यावर सोनचाफी अभिषेक करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासही संस्मरणीय ठरला.  

टॅग्स :Shivjayantiशिवजयंती