शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

Shiv Jayanti 2024: प्रत्येक शिवप्रेमीला 'ही' शिवस्तुती पाठ असायलाच हवी, तरच ती खरी शिववंदना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 10:47 IST

Shiv Jayanti 2024: कवी भूषण यांनी केलेली शिवस्तुती प्रत्येक शिवप्रेमीला अर्थासह तोंडपाठ असलीच पाहिजे; तरच शिवरायांचे मावळे घडत राहतील!

आज फाल्गुन वद्य तृतीया, तिथीनुसार शिवजयंती. आपल्या पराक्रमाने दाहीदिशा उजळून टाकणाऱ्या आणि हिंदुधर्म रक्षिणाऱ्या महापराक्रमी शिवसूर्याची आज जयंती. महाराजांसारखा युगपुरुष जन्माला येणे हे तर भारत भूमीचे सौभाग्य. महाराजांनी आपल्या कृतीतून, उक्तीतून, व्यक्तिमत्त्वातून भारत मातेचा सुपुत्र कसा असावा याचा आदर्श घालून दिला. त्याची उजळणी म्हणून शिवजयंतीचे औचीत्त्य! केवळ शिवाजी महाराज की जय म्हणून शिवजयंती साजरी होणार नाही, त्यानिमित्ताने महाराजांच्या चरित्राची वारंवार उजळणी होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी कवी भूषण यांनी चारोळीत केलेली शिवस्तुती आपण तोंडपाठ करायला हवी आणि मुलांकडून पाठ करून घ्यायला हवी. अजय-अतुल यांनी त्याला सुंदर चाल दिली आहे, शिवाय लता दीदींच्या आवाजातही ही शिवस्तुती ऐकता येते. पण ती ऐकण्याबरोबर तोंडपाठ असेल तरच त्या शब्दांचे चैतन्य अनुभवता येईल. 

इंद्र जिम जंभ पर बाड़व ज्यौं अंभ पर रावन सदंभ पर रघुकुलराज है। 

पौन बारिबाह पर संभु रतिनाह पर ज्यौं सहस्रबाहु पर राम द्विजराज है। 

दावा द्रुमदंड पर चीता मृगझुँड पर भूषन बितुंड पर जैसे मृगराज है। 

तेज तम-अंस पर कान्ह जिम कंस पर यौं मलेच्छ-बंस पर सेर सिवराज है॥ 

अर्थ : भूषण कवी म्हणतो, की ज्या प्रकारे इंद्राने जंभासुर राक्षसावर हल्ला करून त्याचा वध केला होता आणि ज्याप्रकारे अग्नी समुद्राच्या पाण्याला जाळून शोषून घेतो, त्याप्रमाणे श्रीरामांनी गर्विष्ठ व कपटी रावणावर हल्ला केला होता. ढगांवर वाऱ्याचा जसा प्रभाव असतो तसा त्यांचा प्रभाव होता. परशुरामाने ज्याप्रमाणे सहस्रबाहू (कार्त्तवीर्य) राजावर हल्ला करून वध केला, त्याचप्रमाणे भगवान शिवाने रतीचा पती कामदेव याला जाळून टाकले होते. ज्याप्रमाणे जंगलातील आग झाडांवर आपला क्रोध दाखवते आणि ज्याप्रमाणे वनराज सिंहाची हरणांच्या कळपाला दहशत असते किंवा मृगराज सिंह बलाढ्य हत्तीवर नियंत्रण मिळवतो,  सूर्यकिरणांनी अंधार नाहीसा होतो, दुष्ट कंसाचा श्रीकृष्ण वध करतो. अशाच सिंहाप्रमाणे शौर्य आणि पराक्रम असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघल राजवटीवर दहशत निर्माण केली. मुघलांना कडाडून विरोध केला आणि त्यांच्यावर शौर्याने, पराक्रमाने हल्ला करून त्यांचा सर्वनाश केला, अशी सिंहगर्जना करणारे शिवराय शत्रूसाठी कायम कर्दनकाळ ठरले. 

ही केवळ शिवस्तुती नाही, तर पराक्रम कसा गाजवायचा याचा वस्तूपाठ आहे. आपल्या क्षेत्रात आपले स्थान कसे निर्माण करायचे, आपल्या व्यक्तीत्त्वाची छाप कशी पाडायची याचा धडा आहे. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे रोज देवाचे श्लोक म्हणतो तसे हे स्तोत्र समजून नित्य पठन करावे. जेणेकरून नैराश्य, मरगळ दूर होईल आणि चैतन्य निर्माण होऊन स्वत:ला सिद्ध करण्याची जिद्द निर्माण होईल आणि शिवरायांप्रमाणे आपले विचार, कृती, आचरण शुद्ध होऊन आपणही नैतिकतेने विजय प्राप्त करू. जय भवानी, जय शिवाजी!

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज