शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

Shani Dev: शनी देवाचे मकर राशीत मार्गस्थ होणे ठरणार लाभदायी; पाळा 'ही' पथ्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 12:39 IST

Astrology: गुरुंचे आपल्या आयुष्यात जे स्थान असते, तेच शनी देवाचे आपल्या कुंडलीत असते. त्यांच्या स्थलांतराचे महत्त्व जाणून घ्या!

>> संकलन: सौ. अस्मिता दीक्षित 

आपल्या आयुष्यात अनेक अचंबित करणाऱ्या अनाकलनीय घटना घडत असतात . अचानक माणसे आपल्या आयुष्यात येतात ,अचानक निघूनही जातात. एखाद्या व्यक्तीशिवाय आपण जगू शकणार नाही असे आपल्याला वाटत राहते त्या व्यक्तीला तितक्याच सहजपणे आपण कधी विसरून जातो ते आपल्यालाही समजत नाही. एखाद्या गोष्टीचा इतकं अट्टाहास करतो तीच गोष्ट काही दिवसांनी नकोशी वाटू लागते . एखादी मैत्री कमी काळात इतकी घट्ट होते आणि काही दिवसात ती जणू अळवावरचे पाणी ठरते .अनेकदा एखादी घटना हमखास घडणार असे वाटते पण तो आपला भ्रम ठरतो . ह्या सगळ्याचा वेध घेतला तर एक लक्ष्यात येते कि एक शक्ती आहे जी आपल्या अवकाल्नाच्या खूप पलीकडे आहे आणि तिच्या हातात सगळ्याची सूत्रे आहेत, मग त्या शक्तीला कुणी काहीही नाव द्या पण ती आहे. दिसत नाही पण अनुभवता येते . 

अध्यात्मात प्रचंड ताकद आहे. आपले सद्गुरू आपल्या मागे सदैव प्रत्येक क्षणी उभे असतात , जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग येणार असतो तेव्हा ते आपल्यासमोर उभे ठाकतात आणि सर्व निभावून नेतात .आपल्याला जे दिसत नाही ते त्यांना दिसते , आपल्याला जे ऐकू येत नाही ते त्यांना ऐकू येते आणि म्हणूनच ते आपल्यासाठी काहीतरी वेगळे प्लान करत असतात जे आपल्या भल्यासाठीच असतात . म्हणूनच एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून अचानक निघून गेली तर ती त्यांनीच केलेली लीला समजायला हरकत नाही . कारण ते त्रिकालज्ञानी आहेत सर्वेसर्वा आहेत . आपला त्यांच्यावरील विश्वास अभेद्य आणि अखंड असला पाहिजे .

ह्या सर्व घटनांमध्ये दडलेला विलक्षण अर्थ सर्व सामान्य व्यक्तीच्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना प्रचंड दुक्ख होते ,वाईट वाटते पण जसजशी आपली साधना वाढते तसे आपल्याला ह्या घटनांच्या मागील अर्थ उमगतो . दुसऱ्यामुळे आपले आणि आपल्यामुळे दुसऱ्याचे होणारे नुकसान त्यांनी थांबवलेले असते हे जाणवते आणि आपण मनात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. एखादी व्यक्ती अचानक आपल्या आयुष्यातून निघून का गेली ह्याचे उत्तर शोधण्यात आपल्या साधनेचा वेळ साधक घालवणार नाहीत . जे होते आहे आणि होणार आहे ते त्यांच्याच इच्छेने हि भावना म्हणजेच आपली सद्गुरूंवर असलेली निष्ठा होय .

एकदा एक माणूस आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी जाणार होता . सर्व तयारीनिशी त्याच्या गाडी जवळ येतो आणि बघतो तर त्याची गाडीच गायब . शेवटी त्याची तक्रार पोलिसात करून तो ट्रेनने रवाना होतो. चार दिवसांनी घरी आल्यावर त्याची गाडी नेहमी असते तिथेच उभी असलेली त्याला बघायला मिळते , एक थेंब सुद्धा पेट्रोल कमी झालेले नसते कि गाडीला एकही ओरखडा नसतो. आता सुज्ञास सांगणे न लगे . 

एकदा त्यांच्या शाळेत नाव घातले कि निर्धास्त राहायचे, चुकले तर माफी मागायचीही लाज वाटायला नको . संत हे त्रिकालज्ञानी आहेत आणि त्यांच्या तेजोमय अस्तित्वाने आपल्याला ते मार्गस्थ करत असतात.

आज शनी सारखा बलाढ्य ग्रह सुद्धा मकर राशीत मार्गस्थ होत आहे. मार्गी होणे म्हणजे तुमच्या अडलेल्या कामात तुम्हाला मार्ग मिळणे . शनीने आपल्या वक्री अवस्थेत सगळ्यांचे लगाम खेचून धरले होते आता सगळ्यांच्या कामाला गती येईल. अर्थात सचोटी , कष्ट , साधना , नम्रता आणि प्रयत्नांची पराकाष्टा करतील त्यांच्याच पाठीवार शनी सारख्या ग्रहाची शाबासकीची थाप पडेल. तुम्हा आम्हा सर्वांवर सद्गुरूंची कृपा अशीच बरसत राहुदे .

संपर्क : 8104639230

टॅग्स :Astrologyफलज्योतिष