शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

Shakambhari Purnima 2023: अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा, म्हणून शाकंभरी पौर्णिमेला करा 'हा' नैवेद्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 11:06 IST

Paush Purnima 2023: शाकंभरी अर्थात धन धान्य, भाजी पाला देणारी अन्नपूर्णा देवी आणि तिच्या नवरात्रीचा समाप्तीचा सोहळा विशेष नैवेद्याने करूया आणि तिचा आशीर्वाद घेऊया!

पौष शुक्ल सप्तमीला सुरू झालेले शाकंभरी देवीचे नवरात्र पौष पौर्णिमेला समाप्त होते. म्हणून या पौर्णिमेला 'शाकंभरी पौर्णिमा' म्हटले जाते. यंदा ६ जानेवारी रोजी पौष पौर्णिमा अर्थात शाकंभरी पौर्णिमा आहे. या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा, साठ प्रकारच्या कोशिंबिरींचा नैवेद्य मोठ्या प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक दाखवला जाते. हा एक कुळाचार म्हणून देखील काही घरांमध्ये पाळला जातो. मात्र कालानुरूप त्यातही बदल झाले आहेत. कसे ते पाहू... 

पूर्वी घराघरांमध्ये आक्का, मावशी, आत्या, आजी, काकू, ताई, आई, माई असा भरपूर मोठा गोतावळा असे. घरात पुरुषवर्गाइतका महिलावर्गाचा राबता असे. शिवाय हाताशी गडी माणसेदेखील कामाला असत. तसेच आतासारखे नोकरी व्यवसाय ही जबाबदारी नसल्यामुळे घरातील महिला वर्ग कुळाचाराला पुरेपूर न्याय देऊ शकत असे. परंतु जसजशी कुटुंबे विभक्त होऊ लागली, तसतशी कुळधर्म, कुळाचार सोपस्कार बनून राहिला. करणारी बाई एक आणि खाणारी तोंडं दहा असली, तर तिचा एकटीचा निभाव कसा लागणार? म्हणून हळूहळू कुळाचार घरापुरते मर्यादित रूप घेऊ लागले. त्यात सोयीस्कर बदल होऊ लागले. 

नवरात्र म्हटली की पुरणावरणाचा स्वयंपाक आला. परंतु आजकाल नोकरी, शिक्षण, व्यवसायामुळे घराबाहेर पडलेल्या महिलांना स्वयंपाकासाठी एवढी उसंत मिळत नाही आणि अनेक जणींना तेवढी आवडही उरलेली नाही. त्यावर उपाय म्हणून आताच्या महिला विकतच्या पुरणपोळ्या आणून घरी वरण भाताचा कुकर लावून बोळवण करतात. त्यामुळे पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो आणि जिचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे, तिच्याही व्यवसायाला हातभार लागतो. त्यामुळे कालानुरुप झालेले बदल आक्षेपार्ह नाहीत, फक्त त्यातला भक्तिभाव ओसरून जाऊ नये, एवढी माफक अपेक्षा आहे. 

नियम, परंपरा, रूढी यांची चौकट आपल्या जीवनाला सुयोग्य वळण मिळावे याकरीता आहे, त्यात अडकून राहावे यासाठी नाही. हे लक्षात घेता सण-उत्सवाचा उद्देश लक्षात घेऊन भक्तीभावाने आपण देवीला दाखवलेला नैवेद्य ती निश्चितच स्वीकारेल आणि आपल्याला तसेच सर्वांना कसलीही कमतरता पडू देणार नाही.  शेवटी देवी ही आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक भूल पदरात घेते. फक्त आपण तिच्याप्रती आदरभाव ठेवायला हवा. असे पूर्ण विचारांचे चांदणे मनात प्रतिबिंबित झाले, तरच ही शाकंभरी पौर्णिमा साजरी झाली, असे म्हणता येईल. 

टॅग्स :Navratriनवरात्रीfoodअन्न