शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (उत्तरार्ध)

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 1:06 PM

५ मार्च रोजी गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि चरित्राचा आढावा.

गजानन महाराजांचे चरित्र अनेक चमत्कारिक प्रसंगांनी भरलेले आहे. 

एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम भरून दिली आणि विस्तव आणण्यास म्हणून बंकटलालने त्यांना गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठवले. सोन्याचांदीचा त्याचा मोठा धंदा होता. नळी फुंकीत तो बसला होता. मुलांनी त्याच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला. विस्तव देत नाही, असे त्याने मुलांना स्पष्ट सांगितले आणि महाराजांची त्याने निंदा केली. मुलांना त्याने घालवून दिले. मुले रिकामी परत आली. सोनार विस्तव देत नाही असे म्हणाली. तेव्हा महाराज म्हणाले, `अरे चिलमीवर काडी धरा, विस्तव येईल.' बंकटलालने महाराजांच्या चिलमीवर काडी धरताच चिलमित तात्काळ विस्तव पेटला. महाराजांच्या मुखातून धूर निघाला.

इकडे जानकीराम सोनाराच्या घरी पितृ श्राद्धाचे जेवणकरी जेवावयास बसले होते. त्यांना चिंचवणे वाढताना त्या वाढप्यांना किडे दिसले. त्यांनी ते चिंचवणे जानकीरामाला दाखवले. त्याला कोडे उलगडले. गजनान राजेश्वर चिंतामणीला मी भिकारी मानले, त्यांना वेडा ठरवले त्याचेच मला हे प्रायश्चित्त मिळाले. जानकीराम बंकटलालच्या घरी गेला. भीत भीत त्याने महाराजांना दंडवत घातले. `दयाघना, तुला माझी करुणा येवो. मी अपराधी आहे, मला क्षमा कर. तू साक्षात उमानाथ आहेस. शेगावी नांदत आहेस. देवा तू अनाथांचा वाली आहेस.' असे जानकीरामाने उद्गार काढले. त्याची ही दीनवाणी ऐवूâन, त्याला पश्चात्ताप झाला. महाराज म्हणाले, `जानकीराम, तू घरी सुखाने जा. चिंचवणे पंगतीला वाढ. त्यात कीडे नाहीत.' जानकीराम घरी आला. चिंचवणे पाहू लागला. त्यात त्याला काहीच आढळले नाही. ते शुद्ध, स्वच्छ दिसले. पंगतीत बसलेल्या सर्वांना महाराजांचे महत्त्व कळले. 

शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त त्यांच्या चरित्रातील निवडक प्रसंग (पूर्वार्ध)

चंद्रमुकीन हा शेगावचा गजानन माराजांचा निस्सीम भक्त होता. महाराजांच्या सभोवती भक्त मंडळी जमली होती. कोणी महाराजांच्या गळ्यात हार घालत होते, कुणी खडीसाखर वाटत होते, कुणी पंख्याने वारा घालीत होते. कुणी आंबे कापून फोडी हातात देत होते. महाराज चंद्रमुकीनला म्हणाले, `चंदू, तू घरी जाऊन दोन कान्होले आण. नवीन काही करू नको. कोठे शेजारी मागू नको. कोठे दुसरीकडे पाहू नको. उतरंडीत आहेत ते, आण जा!

चंद्रमुकीन घरी गेला. पत्नीला सांगू लागला. `महिन्यापूर्वी कान्होले केले होते. महाराजांसाठी दोन काढून ठेवले होते.' असे म्हणून त्याची पत्नी उतरंडीत पाहू लाली. तिला त्यात एका बाजूस ठेवलेली पुडी दिसली. एक महिना झाला. नासून गेले असतील म्हणून तिने पुडी सोडून पाहिली. कान्होले जसेच्या तसे होते. चंद्रमुकीन याने ते घेतले व महाराजांना आणून दिले. महाराजांना संतोष वाटला. एक त्यांनी स्वत: खाल्ला, दुसरा प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिला. महाराजांची त्या सर्वांवर कृपादृष्टी झाली. अशीच कृपादृष्टी आपणा सर्वांवर होवो म्हणून महाराजांनी दिलेला मंत्र म्हणा... गण गण गणात बोते!