शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Scorpio Characteristics: सूडबुद्धीने डंख मारणारे पण कामाच्या बाबतीत प्रचंड मेहनती असतात वृश्चिक राशीचे लोक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 11:41 IST

Scorpio Characteristics: अनिश्चित स्वभाव, तापत वृत्ती मात्र प्रचंड मेहनती आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारे वृश्चिक राशीचे लोक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती!

वृश्चिक राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेले असते. वादविवादात साधक-बाधक गोष्टींची पर्वा करत नाहीत. अगदी स्पष्टवक्ते असतात. अनेकदा ते फारच कटू बोलतात. विनोदप्रिय असूनही स्वभाव वादग्रस्त असतो. भांडण झाल्यास स्वतःच्या नुकसानीचीदेखील काळजी करत नाहीत. आपलेच बोलणे पुढे रेटतात. 

वृश्चिक राशीचे लोक निर्भय असतात : कालपुरुषाच्या कुंडलीत वृश्चिक राशी आठव्या भावात येते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक स्वतः घाबरत तर नाहीच पण आपल्या कृतीतून दुसऱ्यांना घाबरवायचे काम जरूर करतात. त्यांच्या अनिश्चित स्वभावाची, वागण्या बोलण्याची आणि कामाच्या पद्धतीची इतरांना नेहमी भीती वाटते. 

खूप सावध असतात : या राशीचे लोक सर्वच बाबतीत सावध असतात. कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्या अंगाशी गोष्टी येणार नाहीत ना, याची पूर्ण काळजी घेतात. आले अंगावर घे शिंगावर अशीही त्यांची वृत्ती असते. मात्र कधी कधी तसे करण्याच्या नादात ते आपली विश्वासार्हता गमावून बसतात. 

कटू बोलण्याने समोरच्याला दुखावतात : वृश्चिक अर्थात विंचू. विंचू ज्याप्रमाणे डंख मारतो, तसे या राशीचे लोक रागाच्या भरात समोरच्याच्या वर्मावर घाव घालायला कमी करत नाहीत. कोणाला काय वाटेल याचा विचारही करत नाहीत. कधी कधी ते एवढे कठोर होतात की आपल्या कृतीपेक्षा आपल्या नुसत्या बोलण्याने देखील समोरच्याला दुखावतात. मात्र ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल एक अपशब्दही ऐकून घेत नाहीत. 

बदला घेण्यासाठी नेहमी तयार : हे लोक डोक्याने तापट तर असतातच, पण दीर्घकाळ मनात वैर ठेवतात. एवढेच नाही तर कोणी त्यांच्याशी वाईट वागले तर ते आठवणीने त्याचा बदला देखील घेतात. मग ती व्यक्ती त्यांच्यासाठी कितीही जिवलग असो, ते बोलून परतफेड केल्यावरच शांत होतात. वृश्चिक राशीची व्यक्ती इतर राशींवर वर्चस्व गाजवते. दुसऱ्यांचे दोष शोधायची त्यांना प्रचंड हौस असते. एवढे दोष असूनही कामाच्या बाबतीत म्हणाल तर ते प्रचंड मेहनती असतात. त्यांना लोकसंग्रह आवडतो. ते जिथे जातील तिथे मित्र जोडतात. 

गूढ विषयांमध्ये रस : वृश्चिक राशीच्या लोकांनी वृषभ राशीचा जोडीदार निवडल्यास त्यांचा परस्पर समन्वय चांगला राहतो. सूर्य, गुरू आणि चंद्र त्यांना अनुकूल परिणाम देतात तर बुध, शुक्र आणि शनि या राशीचे शत्रू मानले जातात. या लोकांना गूढ विद्येत, गूढ विषयात अधिक रस असतो. तसेच ज्योतिष शिकण्यातही त्यांचा कल दिसून येतो. 

दृढ निश्चयी असतात : हे लोक त्यांच्या निर्णयावर ठाम असतात. ते सहजासहजी विचलित होत नाहीत. त्यांना आपल्या गोष्टी जरा तिखट मीठ लावून सांगायला आवडतात. पण दुसऱ्याने केलेली फसवणूक त्यांना सहन होत नाही. अशा लोकांनी डोकं शांत ठेवण्यासाठी पोवळे धारण करावे. तसेच हनुमंताची उपासना करावी. यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवले तर त्यांचा उत्कर्ष नक्कीच होऊ शकतो.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष